शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

इस बार ईद 'सादगी' से...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 7:18 PM

पवित्र रमजान सुरु होण्यापूर्वी पासूनच सगळीकडे रमजानच्या आगमनाची उत्सुकता दिसून येते. 'रमजान' हिजरी कालगणनेतील दहाव्या महिन्याचे नाव आहे. हिंदू संस्कृतीत जसे श्रावण महिन्याचे पवित्र व मोठे स्थान आहे अगदी तसेच रमजानला हिजरी कालगणनेत महत्व दिले गेले आहे.

ठळक मुद्देइस्लामचे कलमा, नमाज, रोजा, हज आणि जकात हे पाच प्रमुख स्तंभ (अरकान) आहेत. कलमा हा मंत्र जपाप्रमाणे सदोदित म्हणत राहिले पाहिजे. दिवसातून पाच वेळा नमाज अदा केली पाहिजे तर वर्षातून एक महिना उपवास ठेवायला हवे. ज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे त्याने आयुष्यात कि

आमीन चौहानलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: पवित्र रमजान सुरु होण्यापूर्वी पासूनच सगळीकडे रमजानच्या आगमनाची उत्सुकता दिसून येते. 'रमजान' हिजरी कालगणनेतील दहाव्या महिन्याचे नाव आहे. हिंदू संस्कृतीत जसे श्रावण महिन्याचे पवित्र व मोठे स्थान आहे अगदी तसेच रमजानला हिजरी कालगणनेत महत्व दिले गेले आहे. हिजरी कालगणना संपूर्णत: चांद्रभ्रमणावर अवलंबून आहे. म्हणून हिजरीतील महिना हा चंद्र दर्शनावर बदलत असतो. चंद्रदर्शनानेच रमजानची सुरवात होते. चांद नजर आ गया... असं म्हणत प्रत्येकजण रमजान प्रारंभाचा आनंद व्यक्त करीत असतो.रात्रीच्या म्हणजे इशाच्या नमाजसोबत रमजान महिन्यात जास्तीची 20 रकात नमाज अदा करावी लागते. तिला 'तरावीह' असे म्हणतात. या नमाजमध्ये इमाम साहेब कुराणाच्या ओवींचे सलग पठण करतात. अशा प्रकारे प्रत्येक मुस्लिमाच्या कानावर वषार्तून किमान एकवेळ कुराणाचा पवित्र संदेश पडत असतो. प्रत्येक मशिदीमध्ये तरावीहच्या नमाजची विशेष व्यवस्था केली जाते. काही ठिकाणी लोकांची गर्दी पाहता दोन पाळीत 'ही' नमाज अदा केली जाते.रोजा हा रमजानचा आत्मा होय. रोजा म्हणजे उपवास असा ठळक अर्थ काढल्या जातो. पण उपवास एवढा मर्यादित अर्थ रोज्यांचा नाही. जो कोणी रोजा म्हणजे फक्त उपवास असा मोघम अर्थ घेऊन रोजा ठेवत असेल त्याला अल्लाह फक्त फाका (उपाशी राहणे) मानेल. रोजा ही एक जीवन पध्दती आहे. ती एक आचारसंहिता आहे. रमजान एक प्रशिक्षण आहे. जगावे कसे? वागावे कसे? सामाजिक, धार्मिक, आर्थिक जीवन कसे असावे? याचा घालून दिलेला वस्तूपाठ म्हणजे रमजान. माणूस जीवन जगत असताना बराच वेळा बिनधास्त होवून जगत असतो. या बिनधास्त जगण्याला वेसण घालणे म्हणजे रमजान होय. देशाचा सैनिक जसा अतिशय कठिण प्रशिक्षणातून स्वत:ला सिध्द करित असतो अगदी तसेच इस्लामचे आचरण करणारा प्रत्येक व्यक्ती या वार्षिक प्रशिक्षणातून तावून सुखावून निघावा आणि एक चांगला माणूस म्हणून त्याने जीवन जगावे अशी या मागे धारणा आहे.या वर्षीचे रोजे हे परिक्षा पाहणारेच होते. सर्वाधिक काळ अन्न व पाण्याविना यावेळी रोजेदारांना राहावे लागले. दरवेळी 13 ते 14 तास उपवासाचा काळ असतो. यावर्षी तब्बल पावणे पंधरा तास उपवास चालला.यंदाचा रमाजान एप्रिल आणि मे महिन्यात वाटल्या गेला होता. पुढील वर्षीही रमजान एप्रिल आणि मे महिन्यातच असेल. दरवर्षी रमजान गेल्या वर्षीच्या 10 दिवस आधी येतो. अशा प्रकारे 10 दिवसाने रमजान मास दरवर्षी पुढे सरकतो. त्यामुळे कुण्या एका विशिष्ट ऋतू पुरता मर्यादित न राहता रमजान वर्षाच्या प्रत्येक महिण्यात, प्रत्येक ऋतूत अनुभवता येतो. जसा तो सध्या उन्हाळ्यात येतो आहे तसा तो पुढे काही वर्षांनी थंडीत सुध्दा असेल आणि त्याहीपुढे काही वर्षांनी तो पावसाळ्यात पण येईल. 35 ते 40 वर्षांनी रमजानचे एक चक्र पूर्ण होते. प्रत्येक महिण्यात आणि प्रत्येक ऋतूत रमजानचे असे फिरणे हे त्याचे 'अद्वितीय' असे वैशिष्ट्य होय.रमजान मधील सर्वात महत्वाची आणि खऱ्या अर्थाने माणसाला माणूसपण शिकविणारी गोष्ट म्हणजे जकात होय. जकात म्हणजे टॅक्स. तुम्हाला समाजात जगायचे असेल तर समाजातील बºया, वाईट प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागेल अशी शिकवण रमजान देतो. समाजातील प्रत्येक लहानमोठा घटक समाजासाठी महत्वाचा असून समाजातील लहानांचा सांभाळ करण्याची जबाबदारी समाजातील मोठ्यांची असते असा स्पष्ट उल्लेख कुराणात आहे.कोरोनाचा कठिण काळ यावेळी रमजानमध्ये अनुभवायला मिळाला. इस्लाममध्ये पुरुषांनी एकत्र येवून नमाज अदा करण्याला मोठं महत्व आहे. दिवसातून पाच वेळा, आठवड्यातून एकदा आणि वषार्तून दोनदा असं एकत्र येवून सामुहिक नमाज अदा केल्या जातात. पण अशा एकत्र येण्यावरच कोरोनात बंदी असल्याने मुस्लिमांच्या संयंमाची मोठी परीक्षा घेणारा हा रमजान ठरला. या रमजानमध्ये पहिल्यांदा सामुहिक नमाज पूर्णत: बंद ठेवण्यात आली. रमजान मधील प्रत्येक रात्रीची तरावीहची नमाज सर्वां(जमात)सोबत अदा करण्याचा आनंद आणि पुण्य ही मोठं! पण कोरोनामुळे यावेळी तरावीह घरीच अदा करावी लागली. यावेळी पहिल्यांदाच पवित्र रमजान ईदची नमाज सुध्दा एकत्रित अदा केली जाणार नाही.इफ्तार (उपवासाचे पारणे) आणि सेहरी (सकाळची न्याहरी) एकत्र करणे या सर्व बाबी टाळाव्या लागल्या. इफ्तार पार्ट्यांना पूर्ण विराम देणे या रमजान मध्ये क्रमप्राप्तच होते. मुसाफा (दोन्ही हाताचा शेकहँड), अलिंगन या इस्लामी वागणूकीच्या काही बाबी. पण त्यांनाही कोरोनामुळे मुस्लिम बांधवांना मुकावे लागले. तसेच रमजान आणि ईदच्या आनंदाला बाजूला सारत मोठ्या प्रमाणात गरीबांना जेवण, आवश्यक धान्यादी साहित्य वाटप करुन मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात मदतीचा हात समाजातील गोरगरीब, गरजू, निराधार, महिला, वृध्द, अनाथ, अपंग, बेरोजगार आणि प्रवासी मजुरांना दिला आहे. आपल्या रमजान आणि ईदच्या खरेदीमुळे बाजारातील अनावश्यक गर्दी वाढेल आणि कोरोना वाढीस आणखी एक कारण मिळेल यामुळे कहो हर आदमी से, इसबार ईद सादगी से असा ट्रेंड समाजातील काहींनी जाणीवपूर्वक समाज माध्यमांमधून सर्वदूर पसरविला... आणि त्याला कधी नव्हे तो उदंड प्रतिसाद मुस्लिम समाजातून मिळाला. 

टॅग्स :Muslimमुस्लीम