शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पेंच व्याघ्र संरक्षित क्षेत्रातील गोलपहाडीत परतले वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:40 IST

पेंच व्याघ्र संरक्षित क्षेत्रातील गोलपहाडी भागात वाघांचे पुन्हा दर्शन होऊ लागले आहे

ठळक मुद्देअवैध मासेमारीवर पूर्णत: नियंत्रण

ऑनलाईन लोकमत नागपूर : पेंच व्याघ्र संरक्षित क्षेत्रातील गोलपहाडी भागात वाघांचे पुन्हा दर्शन होऊ लागले आहे. तोतलाडोह संरक्षित क्षेत्रात होत असलेल्या अवैध मासेमारी व त्यातून होत असलेल्या शिकारीतून परिसरातील वाघांसह वन्यजीव नाहीसे झाले होते. परंतु वन विभागाने राबवलेल्या विशेष अभियानामुळे या परिसरातील मासेमारीच्या नावावर सुरू असलेल्या वन्यजीवांच्या शिकारीवर पूर्णत: नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. त्याचाच परिणाम या परिसरात पुन्हा वाघ परतले आहेत. शुक्रवारी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट दिली . तेव्हा हा सुखद क्षण प्रत्यक्ष अनुभवता आला.एसीएफ भागवत यांनी सांगितले की, पेंच व्याघ्र प्रकल्पातील तोडलाडोह परिसरात असलेल्या गोलपहाडी येथे अनेक दशकांपासून अवैध मासेमारी सुरू होती. मासेमारी करण्यासाठी येणारे लोक केवळ माशांचीच शिकार करीत नव्हते तर ते हरीण, ससे यासारख्या गवत खाणाऱ्या प्राण्यांचीही शिकार करायचे. वाघांसह मगरीचीही शिकार केली जात होती. हे एक मोठे रॅकेट होते. नागपूर ते सिवनीपर्यंत त्याचे तार जुळले होते. मासेमारी करणाºया स्थानिकांच्या मदतीने वन्यप्राण्यांची शिकार केली जात होती. यासाठी मासेमारी करण्यासाठी काही लोकांना वेतनसुद्धा दिले जात होते. काही महिन्यांपूर्वी या परिसरात जेव्हा दोन शिकाऱ्यांना वाघाच्या हाडासह पकडण्यात आले. तेव्हा त्या प्रकरणाची चौकशी दरम्यान स्थानिक मासेमारी करणाऱ्यांचाही समावेश असल्याचे दिसून आले. त्यातून अनेक मासेमारी करणाऱ्यांना अटक केली. तेव्हा हे रॅकेट उघडकीस आले. या अवैध मासेमारी व शिकारीची जवळपास १२० कोटी रुपयाची वार्षिक उलाढाल असल्याचे तेव्हा उघडकीस आल्याचे वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.त्यामुळे ही मासेमारी बंद करणे एक आव्हान होते. यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. परंतु जेव्हा कधी कारवाई केली जात होती. तेव्हा मासेमारी करणारे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले करीत होते. पेट्रोल बॉम्बने ते हल्ले करायचे.फिल्ड डायरेक्टर ऋषिकेश रंजन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर यासाठी पुढाकार घेतला. एसआरपीएफ आणि स्पेशन टायगर प्रोटेक्शन फोर्स यांनी ८० जणांची एक विशेष टीम तयार केली. विशेष योजना तयार करण्यात आली. संपूर्ण परिसरात नेटवर्क तयार करण्यात आले. पेट्रोलिंग बोटीसह दोन अतिरिक्त बोटी मागवण्यात आल्या. ४५ दिवस हे अभियान राबवण्यात आले. या अभियानात मासेमारीसाठी लपवून ठेवण्यात आलेल्या १५० बोटी आणि मासेमारी व वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लपविण्यात आलेले पाच हजार जाळ्या पकडून त्या नष्ट करण्यात आल्या. बोट तयार करणाऱ्या स्थानिकांना बोटीची संपूर्ण माहिती ठेवण्यास सांगण्यात आले. परिणामी या परिसरातील मासेमारीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. त्यामुळे आता येथे पुन्हा वन्यजीव सुरक्षित झाले आहे. वाघही परतले आहेत.

 

टॅग्स :Tigerवाघnagpurनागपूर