शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

पेंच व्याघ्र संरक्षित क्षेत्रातील गोलपहाडीत परतले वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:40 IST

पेंच व्याघ्र संरक्षित क्षेत्रातील गोलपहाडी भागात वाघांचे पुन्हा दर्शन होऊ लागले आहे

ठळक मुद्देअवैध मासेमारीवर पूर्णत: नियंत्रण

ऑनलाईन लोकमत नागपूर : पेंच व्याघ्र संरक्षित क्षेत्रातील गोलपहाडी भागात वाघांचे पुन्हा दर्शन होऊ लागले आहे. तोतलाडोह संरक्षित क्षेत्रात होत असलेल्या अवैध मासेमारी व त्यातून होत असलेल्या शिकारीतून परिसरातील वाघांसह वन्यजीव नाहीसे झाले होते. परंतु वन विभागाने राबवलेल्या विशेष अभियानामुळे या परिसरातील मासेमारीच्या नावावर सुरू असलेल्या वन्यजीवांच्या शिकारीवर पूर्णत: नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. त्याचाच परिणाम या परिसरात पुन्हा वाघ परतले आहेत. शुक्रवारी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट दिली . तेव्हा हा सुखद क्षण प्रत्यक्ष अनुभवता आला.एसीएफ भागवत यांनी सांगितले की, पेंच व्याघ्र प्रकल्पातील तोडलाडोह परिसरात असलेल्या गोलपहाडी येथे अनेक दशकांपासून अवैध मासेमारी सुरू होती. मासेमारी करण्यासाठी येणारे लोक केवळ माशांचीच शिकार करीत नव्हते तर ते हरीण, ससे यासारख्या गवत खाणाऱ्या प्राण्यांचीही शिकार करायचे. वाघांसह मगरीचीही शिकार केली जात होती. हे एक मोठे रॅकेट होते. नागपूर ते सिवनीपर्यंत त्याचे तार जुळले होते. मासेमारी करणाºया स्थानिकांच्या मदतीने वन्यप्राण्यांची शिकार केली जात होती. यासाठी मासेमारी करण्यासाठी काही लोकांना वेतनसुद्धा दिले जात होते. काही महिन्यांपूर्वी या परिसरात जेव्हा दोन शिकाऱ्यांना वाघाच्या हाडासह पकडण्यात आले. तेव्हा त्या प्रकरणाची चौकशी दरम्यान स्थानिक मासेमारी करणाऱ्यांचाही समावेश असल्याचे दिसून आले. त्यातून अनेक मासेमारी करणाऱ्यांना अटक केली. तेव्हा हे रॅकेट उघडकीस आले. या अवैध मासेमारी व शिकारीची जवळपास १२० कोटी रुपयाची वार्षिक उलाढाल असल्याचे तेव्हा उघडकीस आल्याचे वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.त्यामुळे ही मासेमारी बंद करणे एक आव्हान होते. यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. परंतु जेव्हा कधी कारवाई केली जात होती. तेव्हा मासेमारी करणारे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले करीत होते. पेट्रोल बॉम्बने ते हल्ले करायचे.फिल्ड डायरेक्टर ऋषिकेश रंजन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर यासाठी पुढाकार घेतला. एसआरपीएफ आणि स्पेशन टायगर प्रोटेक्शन फोर्स यांनी ८० जणांची एक विशेष टीम तयार केली. विशेष योजना तयार करण्यात आली. संपूर्ण परिसरात नेटवर्क तयार करण्यात आले. पेट्रोलिंग बोटीसह दोन अतिरिक्त बोटी मागवण्यात आल्या. ४५ दिवस हे अभियान राबवण्यात आले. या अभियानात मासेमारीसाठी लपवून ठेवण्यात आलेल्या १५० बोटी आणि मासेमारी व वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लपविण्यात आलेले पाच हजार जाळ्या पकडून त्या नष्ट करण्यात आल्या. बोट तयार करणाऱ्या स्थानिकांना बोटीची संपूर्ण माहिती ठेवण्यास सांगण्यात आले. परिणामी या परिसरातील मासेमारीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. त्यामुळे आता येथे पुन्हा वन्यजीव सुरक्षित झाले आहे. वाघही परतले आहेत.

 

टॅग्स :Tigerवाघnagpurनागपूर