शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

खरंच, २०२६ पर्यंत जंगलात वाघ, सिंह दिसणार नाहीत ?

By निशांत वानखेडे | Updated: September 11, 2023 12:42 IST

१९७० पासूनच्या अभ्यासानुसार जगातून वन्यप्राणी नामशेष हाेतील : ‘वेगन’ वाल्यांचा दावा किती खरा

निशांत वानखेडे

नागपूर : नुकताच भारतात वाघांची संख्या दुपटीने वाढल्याचा उत्सव आपण साजरा केला आहे; मात्र अशात केवळ वनस्पती आधारित अन्नाचा प्रचार करणाऱ्या ‘वेगन’ समूहाकडून करण्यात येत असलेला एक दावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. २०२६ पर्यंत वन्यप्राण्यांच्या बहुतेक प्रजाती पृथ्वीवरून नामशेष हाेण्याचा धाेका त्यांनी व्यक्त केला आहे; मात्र हा ‘दावा किती खरा किती खाेटा’ पण विचार करायला लावणारा आहे.

युनायटेड हार्ट संस्थेचे मुख्य वैज्ञानिक डाॅ. सैलेश राव यांनी ‘वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड’ ने केलेल्या अभ्यासाद्वारे ही शक्यता वर्तविली हाेती. डब्ल्यूडब्ल्यूएफने १९७० पासून वन्यजीवांवर केलेल्या अभ्यासानुसार २०१० पर्यंत जगभरातील वन्यजीवांची संख्या ५२ टक्क्यांनी घटली हाेती. त्यानंतर दाेनच वर्षांत हा आकडा ५८ टक्क्यांवर गेला. पुढे चार वर्षांनंतर २०१६ साली वन्यप्राणी ६८ टक्के घटल्याचा दावा करण्यात आला. या ग्राफनुसार २०२६ हे वर्ष ‘ईयर झिराे’ मानण्यात आले असून यावर्षी जगातून वन्यप्राणी नामशेष हाेतील. याचा अर्थ पुढच्या तीनच वर्षात आपल्या जंगलातील वाघ, बिबटे, हरीण, अस्वल असे वन्यप्राणी अजिबात दिसणार नाहीत. हा दावा तसा अतिशयाेक्ती वाटताे पण ‘वेगन’ समर्थक यावर ठाम आहेत.

अहमदाबादमध्ये कार्य करणाऱ्या मूळच्या नागपूर निवासी पर्यावरण कार्यकर्त्या मंजुश्री अभिनव या नुकत्याच नागपुरात आल्या आणि या विषयावर त्यांनी सेमिनारचे आयाेजन केले. त्यांनी ऑक्सफाेर्डसह विविध जागतिक संस्थांच्या अभ्यासाद्वारे ‘ईयर झिराे’च्या दाव्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या मते जगात मांस व दुग्धजन्य पदार्थांचा अन्नात अतिवापर हाेत आहे. दरवर्षी ९२ अब्ज कृषीप्राणी व २.६ ट्रिलियन सागरी जीव मारून खाल्ले जातात. मग ही गरज भागविण्यासाठी त्यांची कृत्रिमरित्या पैदास केली जाते. मग या प्राण्यांचा चारा व इतर गरजेसाठी जंगले कापली जातात. दरवर्षी एका फुटबाॅलच्या मैदानाएवढी जंगलांची कत्तल केली जात आहे.

पृथ्वीवरची ७० टक्के कृषीभूमी जनावरांच्या गरजेसाठी वापरली जाते. माणूस स्वत:च्या अन्नापेक्षा पाचपट अन्न कृषी जनावरांसाठी उत्पादित करताे. अत्याधिक वाढलेल्या कृषी जनावरांचा थेट हरितगृह वायूच्या उत्सर्जनाशी संबंध आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्या आता केवळ १.८ टक्के उरली आहे, जी २०२६ पर्यंत शून्य टक्क्यांवर येईल, असा दावा मंजुश्री अभिनव यांनी केला आहे. मानव आपल्या गरजेसाठी पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन बिघडवित असल्याचे त्या म्हणाल्या. यापुढे प्राणी आधारित अन्नाऐवजी केवळ वनस्पती आधारित अन्न हा एकमेव पर्याय शिल्लक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अनेक वन्यजीव कार्यकर्त्यांना या दाव्यात तथ्य वाटत नसले तरी अनियंत्रित जंगलताेडीबाबत त्यांचे एकमत आहे. वने व वन्यजीव संवर्धनाची गरज त्यांनीही व्यक्त केली आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणwildlifeवन्यजीवTigerवाघ