शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

खरंच, २०२६ पर्यंत जंगलात वाघ, सिंह दिसणार नाहीत ?

By निशांत वानखेडे | Updated: September 11, 2023 12:42 IST

१९७० पासूनच्या अभ्यासानुसार जगातून वन्यप्राणी नामशेष हाेतील : ‘वेगन’ वाल्यांचा दावा किती खरा

निशांत वानखेडे

नागपूर : नुकताच भारतात वाघांची संख्या दुपटीने वाढल्याचा उत्सव आपण साजरा केला आहे; मात्र अशात केवळ वनस्पती आधारित अन्नाचा प्रचार करणाऱ्या ‘वेगन’ समूहाकडून करण्यात येत असलेला एक दावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. २०२६ पर्यंत वन्यप्राण्यांच्या बहुतेक प्रजाती पृथ्वीवरून नामशेष हाेण्याचा धाेका त्यांनी व्यक्त केला आहे; मात्र हा ‘दावा किती खरा किती खाेटा’ पण विचार करायला लावणारा आहे.

युनायटेड हार्ट संस्थेचे मुख्य वैज्ञानिक डाॅ. सैलेश राव यांनी ‘वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड’ ने केलेल्या अभ्यासाद्वारे ही शक्यता वर्तविली हाेती. डब्ल्यूडब्ल्यूएफने १९७० पासून वन्यजीवांवर केलेल्या अभ्यासानुसार २०१० पर्यंत जगभरातील वन्यजीवांची संख्या ५२ टक्क्यांनी घटली हाेती. त्यानंतर दाेनच वर्षांत हा आकडा ५८ टक्क्यांवर गेला. पुढे चार वर्षांनंतर २०१६ साली वन्यप्राणी ६८ टक्के घटल्याचा दावा करण्यात आला. या ग्राफनुसार २०२६ हे वर्ष ‘ईयर झिराे’ मानण्यात आले असून यावर्षी जगातून वन्यप्राणी नामशेष हाेतील. याचा अर्थ पुढच्या तीनच वर्षात आपल्या जंगलातील वाघ, बिबटे, हरीण, अस्वल असे वन्यप्राणी अजिबात दिसणार नाहीत. हा दावा तसा अतिशयाेक्ती वाटताे पण ‘वेगन’ समर्थक यावर ठाम आहेत.

अहमदाबादमध्ये कार्य करणाऱ्या मूळच्या नागपूर निवासी पर्यावरण कार्यकर्त्या मंजुश्री अभिनव या नुकत्याच नागपुरात आल्या आणि या विषयावर त्यांनी सेमिनारचे आयाेजन केले. त्यांनी ऑक्सफाेर्डसह विविध जागतिक संस्थांच्या अभ्यासाद्वारे ‘ईयर झिराे’च्या दाव्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या मते जगात मांस व दुग्धजन्य पदार्थांचा अन्नात अतिवापर हाेत आहे. दरवर्षी ९२ अब्ज कृषीप्राणी व २.६ ट्रिलियन सागरी जीव मारून खाल्ले जातात. मग ही गरज भागविण्यासाठी त्यांची कृत्रिमरित्या पैदास केली जाते. मग या प्राण्यांचा चारा व इतर गरजेसाठी जंगले कापली जातात. दरवर्षी एका फुटबाॅलच्या मैदानाएवढी जंगलांची कत्तल केली जात आहे.

पृथ्वीवरची ७० टक्के कृषीभूमी जनावरांच्या गरजेसाठी वापरली जाते. माणूस स्वत:च्या अन्नापेक्षा पाचपट अन्न कृषी जनावरांसाठी उत्पादित करताे. अत्याधिक वाढलेल्या कृषी जनावरांचा थेट हरितगृह वायूच्या उत्सर्जनाशी संबंध आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्या आता केवळ १.८ टक्के उरली आहे, जी २०२६ पर्यंत शून्य टक्क्यांवर येईल, असा दावा मंजुश्री अभिनव यांनी केला आहे. मानव आपल्या गरजेसाठी पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन बिघडवित असल्याचे त्या म्हणाल्या. यापुढे प्राणी आधारित अन्नाऐवजी केवळ वनस्पती आधारित अन्न हा एकमेव पर्याय शिल्लक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अनेक वन्यजीव कार्यकर्त्यांना या दाव्यात तथ्य वाटत नसले तरी अनियंत्रित जंगलताेडीबाबत त्यांचे एकमत आहे. वने व वन्यजीव संवर्धनाची गरज त्यांनीही व्यक्त केली आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणwildlifeवन्यजीवTigerवाघ