शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

वाघाचे रखवालदार वेतनाच्या प्रतीक्षेत

By admin | Published: June 20, 2017 2:08 AM

रात्रंदिवस जंगलात वाघाची सुरक्षा करणाऱ्या वन विभागातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या (एसटीपीएफ) जवानांचे मागील तीन महिन्यांपासून पगार अडले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

एसीटीपीएफचे पगार अडले : उपाशीपोटी कशी करणार सुरक्षा ?जीवन रामावत । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रात्रंदिवस जंगलात वाघाची सुरक्षा करणाऱ्या वन विभागातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या (एसटीपीएफ) जवानांचे मागील तीन महिन्यांपासून पगार अडले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पासह बोर, टिपेश्वर, मानसिंगदेव व उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात तैनात असलेल्या शेकडो जवानांवर उपासमारीची वेळ आली आहे. शिकाऱ्यांपासून वाघांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) च्या पुढाकारातून नागपूरसह संपूर्ण राज्यात या दलाची (एनटीसीए) विशेष भरती करण्यात आली आहे. यात नागपूर वन विभागात सुमारे १०५ जवानांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे, या दलात तरुणांसह अनेक तरुणींचाही समावेश आहे. ही सर्व फौज रात्रंदिवस रानावनात आपले कर्तव्य बजावत आहे, असे असताना जंगलात त्यांच्यासाठी सोई-सुविधांचा नेहमीच अभाव राहिला आहे. परंतु तरी या जवानांनी त्याविषयी कधीही ओरड न करता, वाघाच्या सुरक्षेला प्राथमिकता दिली आहे. त्यांची ही कर्तव्यदक्षता आणि जंगलातील नियमित गस्तीमुळे विदर्भातील वाघ सुरक्षित झाला आहे. शिवाय त्यामुळेच मागील काही वर्षांत विदर्भाच्या जंगलातील वाघांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र त्याचवेळी या जवानांचे मागील तीन महिन्यांपासून पगार थांबल्याने त्यांची फार मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश तरुण गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबातील आहेत. त्यामुळे अनेकजण प्रत्येक महिन्याला आपल्या पगारातील काही रक्कम गावातील वृद्घ आई-वडिलांना पाठवित असतात. तर काहीजणांना मुलाबाळांच्या शिक्षणासह कुटूंबाचे पालनपोषण करावे लागते. यापैकी एका जवानाच्या मते, मागील तीन महिन्यांपासून उसनवारी करून खर्च भागविला जात आहे. त्यामुळे अगोदरच डोक्यावर कर्ज झाल्याने आता कुणासमोर हात पसरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. पगारासंबंधी पेंच कार्यालयात चौकशी केली असता, पुन्हा दिवाळीपर्यंत पगार होणार नसल्याचे सांगितले जात आहे. अशा स्थितीत आम्ही जगावे कसे असा प्रश्न यावेळी त्याने उपस्थित केला. पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने या सर्व जवानांना पेंच व्याघ्र प्रकल्पासह बोर, मानसिंगदेव, टिपेश्वर व उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात तैनात केले आहे. शिवाय वन विभागाने या सर्व जवानांची जंगलात भोजनाची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे त्यांना स्वत:च आपल्या भोजनाची व्यवस्था करावी लागते. परंतु आता त्यांच्या हाती पगारच मिळत नसल्याने पोट कसे भरावे, अशी चिंता निर्माण झाली आहे. शिवाय हा जवान उपाशीपोटी वाघाची सुरक्षा कशी करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अधिकारी म्हणतात, पाठपुरावा सुरू ‘‘एसटीपीएफ जवानांचे मागील तीन महिन्यांपासून पगार अडले आहेत, हे खरे आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातर्फे त्यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे. या जवानांच्या पगारासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विशेष निधी दिला जातो. परंतु मागील काही महिन्यांपासून तो निधी मिळण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे या जवानांचे पगार होऊ शकले नाही. परंतु त्यासाठी वरिष्ठ कार्यालयासह मंत्रालयाशी सतत संपर्क साधला जात आहे. मंत्रालयाकडून निधी उपलब्ध होताच पगार दिले जाईल. ’’-माणिकराव कातकडे सहायक वनसंरक्षक, एसटीपीएफ