शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

कोंढाळीलगतच्या गावांमध्ये वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 4:00 AM

नागपूर : जंगलव्याप्त भाग असलेल्या कोंढाळी ते न्यू बोरकडे जाणाऱ्या मार्गावरील लगतच्या गावांमध्ये मागील काही दिवसांपासून वाघाचा वावर ...

नागपूर : जंगलव्याप्त भाग असलेल्या कोंढाळी ते न्यू बोरकडे जाणाऱ्या मार्गावरील लगतच्या गावांमध्ये मागील काही दिवसांपासून वाघाचा वावर वाढला आहे. अनेक गावकऱ्यांनी वाघ पाहिल्याचा दावा केला आहे. यामुळे या परिसरामध्ये वाघाची दहशत पसरली आहे.

हा परिसर जंगलव्याप्त असून काही गावे अगदी जंगलाच्या काठावर आहेत. यापैकी मासोद, धोतीवाडा, गरमसूर आदी गावांचा जंगलाशी सतत संबंध येतो. अनेक दिवसानंतर या गावालगत वाघ सतत दिसत असल्याचे येथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ऐन हंगामाच्या दिवसात वाघोबा दर्शन देत असल्याने शेतकऱ्यांना शेतावर जाणेही आता धोकादायक होऊन बसले आहे. काही शेतकऱ्यांनी तर, आपल्या गाई वाघाने मारल्याचाही दावा केला आहे. या परिसरात काही वन्यजीव प्रेमी गेले असता ही बाब निदर्शनास आली. या संदर्भात वन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र खबरदारीसाठी काय पावले उचलणार, हे मात्र कळलेले नाही.