शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

५० लाखांची लाच घेताना जलसंधारण विभागाचे तीन बडे अधिकारी एसीबीच्या गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 17:58 IST

८१ लाख रुपयांची लाचेची मागणी करत ५० लाखांची लाच स्वीकारणाऱ्या मृद व जलसंधारण विभागाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध एसीबीची कारवाई. चंद्रपूरच्या दोन व नागपुरातील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे.

नागपूर : थकीत बिल अदा करण्यासाठी कंत्राटदाराकडून तब्बल ५० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी  जलसंधारण विभागातील तीन बड्या अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. 

कविजीत पाटील (३२), जिल्हा जलसंधारण अधिकारी आणि कार्यवाहक प्रादेशिक संवर्धन अधिकारी (नागपूर), श्रावण शेंडे (४६),  उपविभागीय अधिकारी जलसंधारण अधिकारी वर्ग-१ (चंद्रपूर) आणि रोहित गौतम (वय-३५) विभागीय लेखा अधिकारी (चंद्रपूर) अशी आरोपी अधिकाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार नागपूरच्या ४६ वर्षीय सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरने कोल्हापुरी बंधाऱ्याचे सर्वेक्षण केले होते. व त्याच्या देयकांची बिले सादर केली होती. सदर कामाच्या बिलाची व उर्वरित रक्कम वितरीत करण्याकरता तिन्ही अधिकाऱ्यांनी ८१ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ५० लाख देण्याचे ठरले. तक्रारदार लाच देण्यास तयार नसल्याने त्याने नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.

यानंतर मंगळवारी सापळा रचून शेंडे याला तक्रारदाराकडून ५० लाख रुपयांची लाच मागताना रंगेहात पकडण्यात आले. पाटील आणि गौतम यांच्यावतीने शेंडे याने लाचेची रक्कम स्वीकारल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणnagpurनागपूरchandrapur-acचंद्रपूरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग