शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

५० लाखांची लाच घेताना जलसंधारण विभागाचे तीन बडे अधिकारी एसीबीच्या गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 17:58 IST

८१ लाख रुपयांची लाचेची मागणी करत ५० लाखांची लाच स्वीकारणाऱ्या मृद व जलसंधारण विभागाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध एसीबीची कारवाई. चंद्रपूरच्या दोन व नागपुरातील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे.

नागपूर : थकीत बिल अदा करण्यासाठी कंत्राटदाराकडून तब्बल ५० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी  जलसंधारण विभागातील तीन बड्या अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. 

कविजीत पाटील (३२), जिल्हा जलसंधारण अधिकारी आणि कार्यवाहक प्रादेशिक संवर्धन अधिकारी (नागपूर), श्रावण शेंडे (४६),  उपविभागीय अधिकारी जलसंधारण अधिकारी वर्ग-१ (चंद्रपूर) आणि रोहित गौतम (वय-३५) विभागीय लेखा अधिकारी (चंद्रपूर) अशी आरोपी अधिकाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार नागपूरच्या ४६ वर्षीय सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरने कोल्हापुरी बंधाऱ्याचे सर्वेक्षण केले होते. व त्याच्या देयकांची बिले सादर केली होती. सदर कामाच्या बिलाची व उर्वरित रक्कम वितरीत करण्याकरता तिन्ही अधिकाऱ्यांनी ८१ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ५० लाख देण्याचे ठरले. तक्रारदार लाच देण्यास तयार नसल्याने त्याने नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.

यानंतर मंगळवारी सापळा रचून शेंडे याला तक्रारदाराकडून ५० लाख रुपयांची लाच मागताना रंगेहात पकडण्यात आले. पाटील आणि गौतम यांच्यावतीने शेंडे याने लाचेची रक्कम स्वीकारल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणnagpurनागपूरchandrapur-acचंद्रपूरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग