बाभुळगाव बस स्थानक खून प्रकरणातील तीन आरोपींची जन्मठेप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 20:35 IST2019-12-27T20:34:03+5:302019-12-27T20:35:32+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खून प्रकरणातील तीन आरोपींची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला. ही घटना बाभुळगाव, जि. यवतमाळ येथील आहे.

Three accused in Babulgaon bus station murder case get life imprisonment | बाभुळगाव बस स्थानक खून प्रकरणातील तीन आरोपींची जन्मठेप कायम

बाभुळगाव बस स्थानक खून प्रकरणातील तीन आरोपींची जन्मठेप कायम

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : यवतमाळ जिल्ह्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खून प्रकरणातील तीन आरोपींची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला. ही घटना बाभुळगाव, जि. यवतमाळ येथील आहे.
जाम्म्या ऊर्फ शेख जमीर शेख जब्बार (२७), शाहरुख खान बाबा खान पठाण (२३) व गोलू ऊर्फ सलीम गफ्फारखान पठाण (२२) अशी आरोपींची नावे आहेत. मयताचे नाव गणेश मेश्राम होते. तो बाभुळगाव बस स्थानक परिसरात पानठेला चालवित होता. घटनेच्या ७-८ महिन्यापूर्वी आरोपी व मेश्रामचा पानठेल्याच्या जागेवरून वाद झाला होता. दरम्यान, आरोपींनी मेश्रामला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यासंदर्भात मेश्रामने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर ११ डिसेंबर २०१६ रोजी आरोपींनी मेश्रामवर लोखंडी रॉड व चाकूने हल्ला करून त्याचा खून केला. सत्र न्यायालयाने आरोपींना जन्मठेप व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपींचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

Web Title: Three accused in Babulgaon bus station murder case get life imprisonment