शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

हायप्रोफाईल मॅचवर हजारो कोटींचा सट्टा; टीम इंडियाची भारतीयांना दिवाळी भेट, पाकिस्तानमुळे अनेक बुकी बरबाद!

By नरेश डोंगरे | Updated: October 23, 2022 21:54 IST

विश्व चषक आणि त्यातल्या त्यात भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट सामना म्हणजे क्रिकेट बुकींसाठी पर्वणी असते. त्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा क्रिकेट सामना सट्टा बाजारात रेकॉर्डब्रेक करणारा असतो.

नागपूर - क्रिकेट विश्वातील परंपरागत प्रतिस्पर्धक मानल्या जाणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी रोमांचक टी-२० सामना बघायला मिळाला. यासामन्या दरम्यान शेवटच्या तीन चेंडूंपर्यंत क्रिकेट रसिकांची उत्कंठा ताणली गेली होती. मात्र, अखेर टीम इंडियाने हा सामना जिंकून भारताला दिवाळीची गोड भेट दिली. तर जिंकण्याची स्थिती असताना सामना गमावणाऱ्या पाकिस्तान संघाने बुकींना ऐन दिवाळीत बरबाद केले. पाकिस्तान जिंकणार, असा अंदाज बांधून बुकींनी नेहमीप्रमाणे डाव टाकला होता. मात्र, ज्या पद्धतीने आजचा सामना झाला ती पद्धत सटोड्यांना (लगवाडी करणाऱ्यांना) लक्ष्मी प्राप्ती करून देणारी ठरली.

विश्व चषक आणि त्यातल्या त्यात भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट सामना म्हणजे क्रिकेट बुकींसाठी पर्वणी असते. त्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा क्रिकेट सामना सट्टा बाजारात रेकॉर्डब्रेक करणारा असतो. आज रविवारी हा सामना असल्याने बुकींनी आधीच तयारी करून ठेवली होती. त्यासाठी पंटरसह विविध प्रकारचे अॅप (सॉफ्टवेअर) बुकींनी हाताशी ठेवले होते.

संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा दोन्ही टीम मैदानात आल्या. त्यावेळी बुकींनी भारताचा रेट ६० पैसे ठेवला होता. अर्थात भारताच्या बाजुने एक लाख लावल्यास आणि भारत जिंकल्यास ६० हजार रुपये मिळणार होते. पाकिस्तानची पहिली विकेट गेली तेव्हा हा रेट ४० पैशावर आला. त्यानंतर पहिला डाव संपला तेव्हा मध्यभारतातील सट्टा बाजारात दोन ते अडीच हजार कोटींची खयवाडी-लगवाडी झाली होती. उत्तरार्धात सामना रोमांचक मोडवर गेल्यानंतर बुकींनी वेगवेगळी डावबाजी करून सटोड्यांकडून पुन्हा हजारो कोटींची लगवाडी करून घेतली. मात्र, ही डावबाजी बुकींच्या तोंडचे पाणी पळविणारी ठरली. तीन षटकांचा खेळ बाकी असताना भारताची स्थिती चांगली नसल्यामुळे बुकींचे हाैसले बुलंद झाले होते. त्यामुळे मेलबोर्नच्या मैदानावर चेंडू आणि धावांची बरसात होत होती तर बुकी बाजारात लगवाडी खयवाडीच्या रुपात धन बरसत होते. मात्र, सामना संपला तेव्हा अनेक बुकींचे अवसान गळले. मोठमोठे बुकी शेकडो कोटी रुपये हरल्याने कमालीचे अस्वस्थ झाले होते.

असा होता भावफलक -प्रारंभी भारताचा भाव ६० पैसे होता. पाकिस्तानची पहिली विकेट गेली तेव्हा तो ४० पैशावर मध्यंतराच्या वेळी ३० आणि ३५ पैशांवर आला. नंतर पुन्हा भाव वाढला. परंतू, शेवटच्या षटकात भारतावर खयवाडी करणाऱ्या बुकींनी भारताचा भाव केवळ १० पैसे, ९ पैसे दिला. अनेक बुकींनी तर भारतीय संघाच्या बाजुने खयवाडी करण्याचे टाळले.

ते तीन षटकं अन् बाजीगर -जबरदस्त विजयी खेळी करून भारताला दिवाळी भेट देणारा विराट कोहली आजच्या सामन्याचा बाजीगर ठरला. सट्टा लावणाऱ्यांसाठीही तो हिरो ठरला. प्रचंड दडपण निर्माण करणाऱ्या या लढतीत विराटने ५३ चेंडूंवर चार षटकार आणि सहा चाैकाराच्या मदतीने ८२ धावा जोडल्या. शेवटच्या तीन षटकात विराटच्या खेळीमुळेच हा सामना टिम इंडियाला जिंकता आला. विराटच्या दमदार खेळीमुळे पाकिस्तानचा संघचे नव्हे तर देश-विदेशातील बुकीही गारद झाले. 

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानT20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२nagpurनागपूर