शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

‘त्या’ ठेवीदारांना संरक्षण देणार

By admin | Updated: December 13, 2014 02:52 IST

२००९ सालापासून नागपूर जिल्ह्यातील ११ सहकारी पतसंस्था बंद असल्यामुळे ६० हजार ठेवीदार वाऱ्यावर असल्याची तक्रार शासनाने गंभीरतेने घेतली आहे.

नागपूर : २००९ सालापासून नागपूर जिल्ह्यातील ११ सहकारी पतसंस्था बंद असल्यामुळे ६० हजार ठेवीदार वाऱ्यावर असल्याची तक्रार शासनाने गंभीरतेने घेतली आहे. यातील पाच पतसंस्थांच्या ७४ संचालक व ३ कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून ठेवीदारांना ठेवी देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. शिवसेनेच्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून अडचणीत आलेल्या ११ पतसंस्थांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. या पतसंस्थांबाबत ६ नोव्हेंबर रोजी ठेवीदार जेष्ठ नागरिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांकडे तक्रार केली होती. यातील एक पतसंस्था अडचणीतून बाहेर पडल्याने उर्वरित १० सहकारी पतसंस्थांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नुसार कार्यवाही करण्यात येत आहे. यातील पाच संस्थांची चौकशी सुरू असून कळमना अर्बन क्रेडिट सोसायटी व चैतन्यवाडी अर्बन क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या दोषी पदाधिकाऱ्यांवर सव्वा बारा कोटी व ६४ लाख ९२ हजार रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे असे राज्यमंत्र्यांनी सभागृहासमोर स्पष्ट केले. ठेवीदारांना संरक्षण देण्यासाठी राज्य शासन पूर्ण प्रयत्न करीत आहे. कर्जवसुली किंवा संचालकांकडील नुकसान भरपाई वसुलीतून ठेवी देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. संबंधित सदस्यांची लवकरच बैठकदेखील घेण्यात येईल अशी माहितीदेखील त्यांनी दिली. (प्रतिनिधी)