शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

-ते करताहेत मूक प्राण्यांची तृष्णातृप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:03 PM

अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच व राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच या संस्थांच्या भगवान महावीर वॉर्ड शाखांनी शहरात १५१ ठिकाणी पाण्याचे टाके ठेवण्याचा उपक्रम हातात घेतला आहे.

ठळक मुद्देपुलक जन चेतना मंचचा उपक्रमठिकठिकाणी ठेवले जाताहेत पाण्याचे टाके

राकेश घानोडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्यामध्ये अनेक सामाजिक संस्था पाणपोई सुरू करतात. त्यामुळे सोबत पाणी न घेता घरातून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींना तहान भागविण्यासाठी जास्त भटकंती करावी लागत नाही. त्यांना कोणत्याही ठिकाणी सहज पाणी मिळून जाते. अशी सोय मूक प्राण्यांसाठीही करणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेता अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच व राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच या संस्थांच्या भगवान महावीर वॉर्ड शाखांनी शहरात १५१ ठिकाणी पाण्याचे टाके ठेवण्याचा उपक्रम हातात घेतला आहे. आतापर्यंत विविध वस्त्यांमध्ये २५ टाके ठेवण्यात आले आहेत. टाके नि:शुल्क दिले जात आहेत.शरद मचाले, कुलभूषण डहाळे, नरेश मचाले, रमेश उदेपूरकर, अनंत शिवणकर व प्रकाश उदेपुरकर हे या उपक्रमाचे संयोजक आहेत. मूक प्राण्यांची सेवा हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे हा सेवाभाव जपण्याची मनातून इच्छा असणाऱ्यांनाच या संस्था टाके देत आहे. तसेच, संस्थांचे कार्यकर्ते वस्त्यावस्त्यांमध्ये फिरून इच्छुक व्यक्तीच्या घरापुढे टाके ठेवत आहेत. टाक्यात पाणी भरणे व टाक्याची नियमित सफाई करणे ही जबाबदारी संबंधित व्यक्तीकडे सोपविली जात आहे. व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक इत्यादी सोशल मीडियाच्या माध्यमातून या उपक्रमाचा प्रचार करण्यात आला आहे. त्यामुळे उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुलक सागर महाराज यांच्या जन्मदिवसापासून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. संस्थांच्या भगवान महावीर वॉर्ड येथील शाखा कार्यालयापुढे पहिले पाण्याचे टाके ठेवण्यात आले. त्यानंतर रमणा मारोती, शेषनगर, तुळशीबाग, झेंडा चौक महाल, गणेशपेठ, बजाजनगर इत्यादी वस्त्यांमध्ये टाके देण्यात आले. हा उपक्रम यशस्वी सिद्ध होत आहे. गायी, म्हशी, कुत्रे, बकºया इत्यादी मूक प्राणी टाक्यातील पाणी पिऊन तृष्णा तृप्त करीत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई