शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

रेल्वे स्टेशनवर बॅग विसरले, पण कुलींनी मालकाला शोधून काढले

By नरेश डोंगरे | Updated: November 13, 2023 18:22 IST

मुख्य रेल्वेस्थानक : प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय

नागपूर : तुफान गर्दीमुळे कुणाला कुणाकडे बघायला वेळ नाही. प्रत्येकाची नजर आपल्या गावाला जाणाऱ्या गाडीकडे आणि आलेल्या गाडीत आसन कसे मिळेल त्याकडे लागलेले. अशात रेल्वेस्थानकावर काही कुली मात्र ग्राहक सोडून एका बॅगमालकाला शोधत होते. अखेर त्यांची शोधाशोध फळाला आली आणि बॅगमालक भेटला. त्याला त्याची बॅग सोपवून कुली आपल्या कामात गुंतले. सोमवारी दुुपारी १.४५ वाजताच्या सुमारास येथील मुख्य रेल्वे स्थानकावर 'प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय' देणारी ही घटना घडली.

येथील एका सुखवस्तू कुटुंबाला दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्या दिल्लीतील नातेवाईकांकडे जायचे होते. त्यांची गाडी विशाखापट्टनम - दिल्ली वेळेवर म्हणजेच दुपारी २.१५ ला येणार होती. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता हे कुटुंबं आज अर्धा तास अगोदरच रेल्वेस्थानकावर पोहचले. दुसऱ्या अन्य गाड्या फलाटावर येणे जाणे सुरू असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्यामुळे या फलाटावरून त्या फलाटावर जाण्याच्या प्रयत्नात फलाट क्रमांक १ वर एका कुटुंबाची एक बॅग राहून गेली.

दरम्यान, दुसऱ्या गाड्या निघून गेल्यानंतर फलाटावरची गर्दी कमी झाली. एका कोपऱ्यात एक बॅग (सुटकेस) बराच वेळेपासून पडून असल्याचे फलाट क्रमांक १ वर असलेले सोनू गायकवाड, नफिस अहमद आणि अब्दुल मजिद नामक कुलींच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी बॅगजवळ जाऊन आजुबाजुच्या प्रवाशांना 'ही' बॅग कुणाची आहे, अशी विचारणा केली. प्रत्येकानेच अनभिज्ञता दाखविल्याने सोनू गायकवाड, नफिस अहमद आणि अब्दुल मजिद सक्रिय झाले. त्यांनी अनाऊंसमेंट रुममध्ये जाऊन बॅग बाबत माहिती दिली. उद्घोषणा झाली मात्र कुणीच प्रतिसाद दिला नाही.

ईकडे दुसऱ्या गाड्यांसह विशाखापट्टनम - दिल्ली एक्सप्रेस येण्याची वेळ जवळ आली होती. त्यामुळे फलाटावर प्रवाशांची गर्दी वाढत होती. परिणामी सोनू, नफिस आणि अब्दुल मजिद रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) ठाण्यात पोहचले. त्यांनी बेवारस बॅगबाबत माहिती दिली. त्याचवेळी आपली बॅग हरविल्याची तक्रार करण्यासाठी बॅगमालक तेथे आले. त्यांनी बॅगचे वर्णन सांगितले अन् सोनू, नफिस आणि अब्दुल मजिद या तिघांनी आरपीएफ जवानांच्या माध्यमातून त्यांची बॅग त्यांना परत केली. बॅगमालकाने कुलींप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना बक्षिस देण्याची तयारी दाखविली. त्यांचा नम्र नकार ऐकून त्यांना धन्यवाद दिले.

प्रसंगावधानामुळे दहशत नाही

एरव्ही गर्दीच्या ठिकाणी बेवारस बॅग आढळली की आजुबाजूची मंडळी अतिउत्साह दाखवत तर्कवितर्क लावतात. रेल्वे स्थानकासारखे ठिकाण असेल तर बघायलाच नको. येथे लगेच बॅगमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरते. परिणामी प्रवाशांमध्ये दहशत निर्माण होते. मात्र, सोनू, नफिस आणि अब्दुल मजिद यांनी प्रसंगावधान राखत योग्य ते पाऊल उचलल्याने आज अफवा पसरली नाही अन् प्रवाशांत दहशतही निर्माण झाली नाही.

टॅग्स :Socialसामाजिकrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर