शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

Corona Virus in Nagpur; -तर तबलिग जमातीच्या लोकांवर होणार गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 9:02 PM

पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी स्पष्ट केले की मरकजहून परतलेल्यांनी कोरोनाची तपासणी करणे अनिवार्य आहे. यासाठी तपासणी केंद्र सुरू केले आहे. मरकजच्या लोकांनी स्वत: पुढे येऊन आपली माहिती देऊन तपासणी करून घ्यावी.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांचा इशारा निजामुद्दीनला गेलेल्या प्रत्येक व्यक्तीने करावी कोरोनाची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज येथून आलेले तबलिगी जमातीचे लोक आपली माहिती पोलीस व प्रशासनापासून लपवित आहे. हे लोक लवकरात लवकर पुढे न आल्यास त्यांच्या विरुद्ध पोलीस कठोर कारवाई करणार आहे. अशा लोकांविरुद्ध पोलीस भा.दं.वि. च्या कलम १८८ अन्वये कारवाई करणार आहे. सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह वृद्धाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी कारवाईचे पाऊल उचलले आहे.निजामुद्दीनमध्ये आयोजित मरकज संमेलनात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातून ११ लोक गेले होते, ते परत आले आहेत. त्याचबरोबर ५२ लोक दिल्ली मरकज संमेलन सुरू होण्यापूर्वी परतले होते. या ५२ पैकी ८ लोक विदेशातील होते. या संमेलनात सहभागी झालेल्या शेकडो लोकांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाले आहे. देशभरात मरकजमध्ये सहभागी झालेले तबलिगी जमातीचे लोक कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. नागपुरातसुद्धा मरकजला गेलेले पॉझिटिव्ह निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी स्पष्ट केले की मरकजहून परतलेल्यांनी कोरोनाची तपासणी करणे अनिवार्य आहे. यासाठी तपासणी केंद्र सुरू केले आहे. मरकजच्या लोकांनी स्वत: पुढे येऊन आपली माहिती देऊन तपासणी करून घ्यावी. संमेलनात सहभागी झालेल्या शहरातील नागरिकांनी तात्काळ जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षाशी संपर्क करून कोरोनाची तपासणी करावी. असे जे करणार नाहीत पोलीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत. इच्छुक नागरिकांनी कोरोना तपासणी करण्यासाठी नियंत्रण कक्षाच्या ०७१२-२५६२६६८ तसेच मनपाच्या ०७१२-२५६७०२१ या क्रमांकावर संपर्क करावा.पोलीस आणि प्रशासनाकडून वारंवार विनंती केल्यानंतरही काही संदिग्ध लोक माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तीन दिवसात मध्य नागपूरमध्ये दोन जण कोरोना पॉझिटिव्ह मिळाले आहेत. ३ एप्रिलला तकिया परिसरातील एका टोपी विक्रेत्या युवकाला कोरोनाचे संक्रमण झाले आहे. तो १५ मार्च रोजी दिल्लीतून परतला होता. त्याचा मरकजशी संबंध नव्हता. त्यानंतरही तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. तो मूळचा बिहारचा आहे. तो पत्नी व मुलासोबत राहतो. त्याने प्रशासनाला पत्नी व मुले बिहारमध्ये असल्याचे सांगितले. पण प्रशासनाने त्याच्यावर विश्वास न ठेवता पोलीस व महापालिकाच्या अधिकाऱ्यांनी तो ज्या इमारतीत राहत होता, तिथे चौकशी केली असता त्याचे कुटुंबीय असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याचे कुटुंबीय व शेजारच्यांना क्वारंटाईन करण्यात आले. लोकांकडून असहकार्य मिळत असल्याने पोलिसांनी कारवाईचा निर्णय घेतला आहे.सहकार्य मिळत नाही, उलट विरोध होतोकोरोना संशयिताची माहिती गोळा करण्यासाठी घरोघरी जात असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना काही ठिकाणी विरोधाचा सामना करावा लागतो आहे. तीन दिवसापूर्वी मनपा रुग्णालयातील काही महिला कर्मचारी पूर्व नागपूरच्या काही वस्त्यांमध्ये गेल्या होत्या. त्यांनी लोकांना दिल्लीवरून कुणी आले का? यासंदर्भात विचारले असता लोक भडकले. लोकांनी त्यांचे कागदपत्र फाडण्याचा प्रयत्न केला. तसेच पूर्व नागपुरातील एका वस्तीत औषधांची फवारणी करणाºया फायलेरिया विभागाच्या एका पथकाला धमकी देऊन परत पाठविले. कर्मचाºयांनी समजविल्यानंतरही लोक शांत झाले नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात सुरू असलेल्या लढाईत लोकांकडून सहकार्य मिळत नसल्याने सेवा देणाºया आरोग्य कर्मचाºयांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस