शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

मंजुरीनंतरही राज्यातील अभयारण्यासाठी झोनल मास्टर प्लॅन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:31 PM

राज्यात २०१६ पासून तर २०१९ या काळात २० इको सेन्सेटिव्ह झोन (इएसझेड) राज्य सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केले आहेत. यामुळे या सर्व वन क्षेत्रांना सुरक्षा कवच प्राप्त होण्याची अपेक्षा होती. यातील तरतुदीनुसार संबंधित सर्व अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पांसाठी दोन वर्षांच्या आत झोनल मास्टर प्लॅन तयार होणे अपेक्षित होते. नियमातच तशी तरतूद होती. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. परिणामत: राज्यातील अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पासमोर असलेल्या अडचणी आणि धोके कायमच आहेत.

ठळक मुद्दे२०१६ पासून २० प्रकल्प प्रतीक्षेत : अभयारण्ये आणि व्याघ्रप्रकल्पांपुढे अडचणी कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात २०१६ पासून तर २०१९ या काळात २० इको सेन्सेटिव्ह झोन (इएसझेड) राज्य सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केले आहेत. यामुळे या सर्व वन क्षेत्रांना सुरक्षा कवच प्राप्त होण्याची अपेक्षा होती. यातील तरतुदीनुसार संबंधित सर्व अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पांसाठी दोन वर्षांच्या आत झोनल मास्टर प्लॅन तयार होणे अपेक्षित होते. नियमातच तशी तरतूद होती. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. परिणामत: राज्यातील अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पासमोर असलेल्या अडचणी आणि धोके कायमच आहेत.वनसंवर्धनासोबतन त्यातील प्राण्यांना संरक्षण मिळावे, पर्यावरणाच्या दृष्टीनेही कायद्याचे सुरक्षा कवच मिळावे यासाठी राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने ही तरतूद केली आहे. त्या दृष्टीने कामही सुरू झाले होते. मात्र यातील अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता झाली नाही. परिणामत: प्रकल्पांचे काम म्हणावे तसे पुढे सरकले नाही. यातील तरतुदीनुसार, महाराष्ट्रातील अभयारण्ये व व्याघ्र प्रकल्पासभोवताल इको सेन्सेटिव्ह झोन घोषित करणे आवश्यक आहे. आतापर्यंत पर्यावरण मंत्रालयाकडून २० इएसझेड घोषित झाले आहेत. यातील तरतुदीनुसार संबंधित अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पाचे झोनल मास्टर प्लॅन तयार करून राज्य सरकारने त्यास मंजुरी प्रदान करणे आवश्यक होते. इएसझेडची अंतिम अधिसूनचा निघाल्यावर दोन वर्षाच्या आत हा झोनल मास्टर प्लॅन तयार करणे आवश्यक होते. मात्र २०१६ मध्ये अधिसूचना निघूनही याकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. संबंधित प्रकल्पांच्या संरक्षणाच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मॉनिटरिंग कमिटी तयार करण्याची तरतूद आहे. मात्र अनेक ठिकाणी अशा कमिट्या तयार नसल्याची बाब पुढे आली आहे.इएसझेड अंतर्गत पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रात शासनाच्या विविध विभागाकडून करण्यात येणारी कामे, विकासकामांना प्रतिबंध असेल तर या संदर्भात सर्व विभागांशी चर्चा करून झोनल मास्टर प्लॅन तयार करण्याची आणि त्यावर सर्वसंमतीने तोडगा काढण्याची तरतूद कमिटीच्या अधिकारात आहेत. स्थानिकांच्या उपजीविकेशी संबंधित बाबींचा विचार करण्याचे अधिकारही या कमिटीला आहे. मात्र या दृष्टीने काम पुढे सरकले नाही. यामुळे राज्य सरकारने यात पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाली चर्चादोन दिवसापूर्वी मुख्यंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव समितीच्या बैठकीत समितीचे चंद्रपुरातील सदस्य बंडू धोत्रे यांनी या विषयाकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे हा विषय आता वन आणि पर्यावरण विभागात चर्चेला झाला आहे. धोत्रे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांना अलिकडेच पत्र लिहून ही बाब निदर्शनास आणून दिली होती, हे विशेष !इएसझेड घोषित झालेली अभयारण्ये व व्याघ्र प्रकल्पकरानला वाईल्डलाईफ सेंच्युरी (रायगड), नागझिरा वाईल्डलाईफ सेंच्युरी (गोंदिया), पैनगंगा वाईल्डलाईफ सेंच्युरी (यवतमाळ), संजय गांधी नॅशनल पार्क (मुंबइ), गौताळा उत्तरामघाट वाईल्डलाईफ सेंच्युरी (औरंगाबादा), मेळघाट व्याघ्र प्रकल्प (अमरावती), लोणार वाईल्डलाईफ सेंच्युरी (बुलढाणा), उमरेड कºहांडला वाईल्डलाईफ सेंच्युरी (नागपूर), भामरागड वाईल्डलाईफ सेंच्युरी (गडचिरोली), कळसुबाइ हरिश्चंद्रगड वाईल्डलाईफ सेंच्युरी (अहमदनगर), संगमेश्वर वाईल्डलाईफ सेंच्युरी (सांगली), फणसाद वाईल्डलाईफ सेंच्युरी (रायगड), ज्ञानगंगा वाईल्डलाईफ सेंच्युरी (बुलडाणा), गंगेवाडी न्यू ग्रेट इंडियन बुस्टर्ड सेंच्युरी (सोलापूर), येडसी रामलिंग घाट वाईल्डलाईफ सेंच्युरी (उस्मानाबाद), जायकवाडी बर्ड सेंच्युरी (अहमदनगर), मानसिंगदेव वाईल्डलाईफ सेंच्युरी (नागपूर), टिपेश्वर वाईल्डलाईफ सेंच्युरी (यवतमाळ), अनेरडम वाईल्डलाईफ सेंच्युरी (धुळे), ताडोबा टायगर रिझर्व्ह आणि अंधारी वाईल्डलाईफ सेच्युरी (चंद्रपूर)

टॅग्स :forestजंगलMaharashtraमहाराष्ट्र