शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात गांधींना न्याय देणारा न्यायाधीश निपजला नाही : सुरेश द्वादशीवार यांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 20:50 IST

महाराष्ट्रात गांधींना न्याय देणारा एकही न्यायाधीश आजवर निपजला नसल्याची व्यथा लोकमतचे मुख्य संपादक सुरेश द्वादशीवार यांनी आज येथे व्यक्त केली.

ठळक मुद्दे‘महात्मा गांधी आणि मराठी साहित्य’ द्विदिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठी विचारकांनी जेवढा अन्याय महात्मा गांधींवर केला, तेवढा अन्याय इतर कुठेही झालेला नाही. मार्क्सवाद, समाजवाद, हिंदुत्ववाद, आंबेडकरवाद आणि खुद्द गांधीवाद्यांच्या अवडंबरात अडकलेल्या गांधीविचारांना न्याय देण्याची किमया महाराष्ट्रातील लेखकांना साधता आली नाही. खरं सांगायचे तर महाराष्ट्रात गांधींना न्याय देणारा एकही न्यायाधीश आजवर निपजला नसल्याची व्यथा लोकमतचे मुख्य संपादक सुरेश द्वादशीवार यांनी आज येथे व्यक्त केली.साहित्य अकादमी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभाग व गांधी विचारधारा विभागाच्यावतीने शंकरनगर येथील गांधीभवन येथे आयोजित ‘महात्मा गांधी आणि मराठी साहित्य’ या विषयावरील द्विदिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटन सोहळ्यात बीजभाषण करताना द्वादशीवार यांनी वैचारिक विभागणी असलेल्या महाराष्ट्रातील लेखकांची महात्मा गांधी यांच्याबाबतीतल्या भूमिकेवर प्रकाश टाकला. यावेळी साहित्य अकादमी मुंबईचे प्रादेशिक सचिव कृष्णा किंबहुने, मराठी सल्लागार मंडळाचे संयोजक रंगनाथ पठारे, प्रसिद्ध संशोधक डॉ. अभय बंग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, गांधी विचारधारा विभागप्रमुख प्रमोद वाटकर, डॉ. प्रमोद मुनघाटे उपस्थित होते.महात्मा गांधी यांच्यावर जगभरात एक लाखाहून अधिक पुस्तके लिहिल्या गेली आहेत. जगपातळीवरील सर्वच क्षेत्रात महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. सबंध गुजरातेतील साहित्यावर गांधींचा प्रभाव दिसून येतो. मात्र, गांधींना ओळखण्याचे जे सामर्थ्य लोकमान्य टिळकांमध्ये, विन्सेट चर्चिलमध्ये म्हणा वा अन्य पाश्चात्य जाणकारांमध्ये होते, ते सामर्थ्य महाराष्ट्रातील लेखकांमध्ये दिसून आले नसल्याची खंतही द्वादशीवार यांनी बोलून दाखविली. याला कारण म्हणजे, गांधींनी स्वत:चे विचार सूत्रबद्ध पद्धतीने कुठेच लिहून ठेवलेले नाही. माझे जीवन हीच माझी विचारपद्धती, असे त्यांचे म्हणणे होते. महाराष्ट्र मार्क्सवादी, समाजवादी, हिंदुत्ववादी, आंबेडकरवादी आणि गांधीवादी अशा वैचारिक प्रवाहात विभागला गेला आहे. गांधीवादी वगळता इतर सर्ववादी गांधींचे विरोधक ठरले आहेत. मार्क्सवादाचा पराभव गांधींनी लेनिनच्या हयातीतच केला.कामगार व शेतकऱ्यांचा विचार प्रबळ करणारा मार्क्सवाद भारतातील कामगार व शेतकऱ्यांनी गांधी विचारांमुळे नाकारला. समाजावाद्यांनी हवा तेवढा गांधी मंजूर करून, इतर तत्त्वे नाकारली. हिंदुत्ववाद्यांनी गांधीला फाळणीस जबाबदार धरून, मुस्लिमप्रेम म्हणून गांधींचा विरोध केला. तर, आंबेडकरवाद्यांनी गोलमेज परिषदेमध्ये गांधींनी स्वत:ला सबंध भारतीयांचा मी एकटाच प्रतिनिधी असल्याचे संबोधल्याने, गांधींचा विरोध केला. मात्र, एक कुटुंबप्रमुख म्हणून गांधींनी सगळ्यांना कुरवाळल्याचे द्वादशीवार म्हणाले.लोकमान्य टिळकांनी स्वत: महात्मा गांधी यांना काँग्रेसचे पुढचे नेतृत्व म्हणून पुढे केले होते. मात्र, त्या काळातील लेखक सवर्णीय विशेषत: ब्राह्मण वर्गातील असल्याने, प्रारंभी ते लोकमान्य टिळक, नंतर सावरकर आणि पुढे संघाच्या प्रभावातच राहिले आणि गांधी आपसुकच नाकारल्या गेला. त्या काळात बहुजनांच्या लेखनाला मान्यता नव्हती. महिलांनी गांधींवर लिहिलेली लोकगीते प्रसारित झाली नाहीत. जे आघाडीचे लेखक होते ते वेगवेगळ्या विचारांच्या प्रभावाखाली होते आणि गांधी दुर्लक्षिले गेल्याची भावना सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केली. एकूणच गांधींना समजण्याच्या चक्रात ब्राह्मण, सावरकर आणि संघ अडथळा बनल्याचे ते म्हणाले. संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले, तर आभार प्रमोद वाटकर यांनी मानले.नागपूर हे गांधी विचार आणि विरोधकांचे कुरुक्षेत्र - अभय बंगनागपूर हे गांधी विचार आणि गांधीविरोधकांचे कुरुक्षेत्र आहे. या क्षेत्रावर ८० वर्षे गांधी विचाराच्या काँग्रेसचे वर्चस्व राहिले आणि आता गांधींचा विरोध करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गड असल्याचे प्रतिपादन उद्घाटनीय भाषणात अभय बंग यांनी केले. महाराष्ट्रातील वैचारिक आणि ललित वाङ्मय क्षेत्रात गांधी दिसत नाहीत. ढोबळमानाने मराठी लेखकांनी गांधींची सुरुवातीला उपेक्षा केली, मग उपहास केला, नंतर उग्र विरोध केला आणि सरतेशेवटी गांधींचा खून करून मोकळे झाल्याची टीका बंग यांनी मराठी साहित्यिकांबाबत केली. १९०९ साली भारत भवनात जेव्हा गांधी आणि सावरकर आमने-सामने आले, तेव्हा सावरकरांच्या विचारांमुळे गांधी अस्वस्थ झाले. तेव्हापासून शंभर वर्षांहून अधिक काळ झाला... गांधी विरुद्ध सावरकर हा संघर्ष सुरू असल्याचे अभय बंग म्हणाले.नुसते गांधी नको, शिवाजी आणि सावरकरही हवेत - सिद्धार्थविनायक काणेसाहित्यिक हा खरा साहित्यिक असेल तर तत्त्वज्ञान समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचतो. गांधी एक स्वभावधर्म आहे आणि तो प्रत्येकातच वसतो. मात्र, नुसते गांधी होऊन चालणार नाही तर, कधी शिवाजी महाराज तर कधी सावरकरही व्हावे लागेल, अशी भावना डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केली. महाराष्ट्रातील लेखकांनी गांधींवर चिंतन केले नाही, असे म्हणणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. गांधींबद्दल लिहिणे म्हणजे गांधी विचार आत्मसात केला, असे होत नाही... असे चिंतनही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीmarathiमराठी