शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

नुसता घोषणांचा बाजार, औषधी व डॉक्टर नसल्याने रुग्ण बेहाल

By गणेश हुड | Updated: September 27, 2023 12:55 IST

जि.प. उपाध्यक्ष म्हणतात औषधी व मनुष्यबळ द्या, नंतर घोषणा करा

नागपूर :आरोग्य यंत्रणा बळकट करण्याची गरज असताना शासनाकडून आयुष्मान भारत, आयुष्मान भव, आपला दवाखाना अशा लोकप्रिय आरोग्य सुविधांच्या घोषणा केल्या जात आहेत. प्रत्यक्षात डॉक्टर व औषधी नसल्याने शासनाचा नुसता घोषणांचा बाजार सुरू असून ग्रामीण भागातील रुग्ण बेहाल असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष व आरोग्य समितीच्या सभापती कुंदा राऊत यांनी केला.

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात आरोग्य सेविका, आरोग्य सेवक नाही, औषधी उपलब्ध नसल्याने गरजू रुग्णांना ती मिळत नाही. याचा विचार करता ग्रामीण भागातील गरीब रुग्णांसाठी जि.प.च्या अखत्यारित पूर्वीच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आयुर्वेदिक व ॲलोपॅथिक दवाखाने कार्यरत आहेत. त्यातच गेल्या १ मे पासून आपला दवाखानाही सुरू झाला आहे. कळमेश्वर आणि काटोल तालुका वगळता उर्वरित अकराही तालुक्यांमध्ये हे दवाखाने सुरू झाले आहेत. येथे कंत्राटी डॉक्टर आहेत; परंतु परिचारिका नाही. वास्तविक शेतमजूर, कामगार वर्गांना या दवाखान्याचा लाभ होणे अपेक्षित आहे; परंतु येथे औषधसाठा उपलब्ध नाही. विशेष म्हणजे, शून्य ते १६ वयोगटातील बालकांसाठी आवश्यक लसींचाही येथे पुरवठा वेळेत होत नाही. जि.प.च्या आरोग्य समितीच्या बैठकीत यावर चिंता व्यक्त करण्यात आली; परंतु शासन याबाबत गंभीर नसल्याचे कुंदा राऊत यांनी सांगितले.

औषध साठा नसल्याने आपला दवाखाना आजारी

शहरासोबतच ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना ताप, सर्दी, खोकला, पोटदुखीसारख्या छोट्या आजारांसाठी घराजवळ मोफत उपचार मिळावेत, तसेच मधुमेह आणि रक्तदाबासह आवश्यक चाचण्यांची व औषधांची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारने ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उपक्रम सुरू केला आहे. जिल्ह्यात असे १२ दवाखाने सुरू करण्यात आले; परंतु येथे परिचारिका नाही, शासनाकडून औषध पुरवठा होत नसल्याने आपला दवाखानाच आजारी पडल्याचे कुंदा राऊत यांनी सांगितले.

मागणी करूनही औषधी मिळत नाही

औषधी उपलब्ध नसल्याने रुग्णसंख्या ओसरत असून, आगामी काळात आपला दवाखाना औषधी अभावी बंद पडण्याची श्क्यता आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातही आवश्यक औषधसाठा उपलब्ध नाही. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह रुग्णांना दर आठवड्याला औषधासाठी जावे लागते. आधी एक महिन्याचे औषध मिळत होते.

आयुष्मान भव उपयोग काय?

औषध तुटवडा असताना उपक्रमांच्या आरोग्य शिबिरात तपासणी करणाऱ्यांना आवश्यक औषधे उपलब्ध होत नाही. उपक्रम राबविण्यापूर्वी आरोग्य केंद्रांना आवश्यक औषधसाठा व मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राऊत यांनी केली.

टॅग्स :Healthआरोग्यzpजिल्हा परिषदdoctorडॉक्टरnagpurनागपूर