शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नुसता घोषणांचा बाजार, औषधी व डॉक्टर नसल्याने रुग्ण बेहाल

By गणेश हुड | Updated: September 27, 2023 12:55 IST

जि.प. उपाध्यक्ष म्हणतात औषधी व मनुष्यबळ द्या, नंतर घोषणा करा

नागपूर :आरोग्य यंत्रणा बळकट करण्याची गरज असताना शासनाकडून आयुष्मान भारत, आयुष्मान भव, आपला दवाखाना अशा लोकप्रिय आरोग्य सुविधांच्या घोषणा केल्या जात आहेत. प्रत्यक्षात डॉक्टर व औषधी नसल्याने शासनाचा नुसता घोषणांचा बाजार सुरू असून ग्रामीण भागातील रुग्ण बेहाल असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष व आरोग्य समितीच्या सभापती कुंदा राऊत यांनी केला.

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात आरोग्य सेविका, आरोग्य सेवक नाही, औषधी उपलब्ध नसल्याने गरजू रुग्णांना ती मिळत नाही. याचा विचार करता ग्रामीण भागातील गरीब रुग्णांसाठी जि.प.च्या अखत्यारित पूर्वीच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आयुर्वेदिक व ॲलोपॅथिक दवाखाने कार्यरत आहेत. त्यातच गेल्या १ मे पासून आपला दवाखानाही सुरू झाला आहे. कळमेश्वर आणि काटोल तालुका वगळता उर्वरित अकराही तालुक्यांमध्ये हे दवाखाने सुरू झाले आहेत. येथे कंत्राटी डॉक्टर आहेत; परंतु परिचारिका नाही. वास्तविक शेतमजूर, कामगार वर्गांना या दवाखान्याचा लाभ होणे अपेक्षित आहे; परंतु येथे औषधसाठा उपलब्ध नाही. विशेष म्हणजे, शून्य ते १६ वयोगटातील बालकांसाठी आवश्यक लसींचाही येथे पुरवठा वेळेत होत नाही. जि.प.च्या आरोग्य समितीच्या बैठकीत यावर चिंता व्यक्त करण्यात आली; परंतु शासन याबाबत गंभीर नसल्याचे कुंदा राऊत यांनी सांगितले.

औषध साठा नसल्याने आपला दवाखाना आजारी

शहरासोबतच ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना ताप, सर्दी, खोकला, पोटदुखीसारख्या छोट्या आजारांसाठी घराजवळ मोफत उपचार मिळावेत, तसेच मधुमेह आणि रक्तदाबासह आवश्यक चाचण्यांची व औषधांची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारने ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उपक्रम सुरू केला आहे. जिल्ह्यात असे १२ दवाखाने सुरू करण्यात आले; परंतु येथे परिचारिका नाही, शासनाकडून औषध पुरवठा होत नसल्याने आपला दवाखानाच आजारी पडल्याचे कुंदा राऊत यांनी सांगितले.

मागणी करूनही औषधी मिळत नाही

औषधी उपलब्ध नसल्याने रुग्णसंख्या ओसरत असून, आगामी काळात आपला दवाखाना औषधी अभावी बंद पडण्याची श्क्यता आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातही आवश्यक औषधसाठा उपलब्ध नाही. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह रुग्णांना दर आठवड्याला औषधासाठी जावे लागते. आधी एक महिन्याचे औषध मिळत होते.

आयुष्मान भव उपयोग काय?

औषध तुटवडा असताना उपक्रमांच्या आरोग्य शिबिरात तपासणी करणाऱ्यांना आवश्यक औषधे उपलब्ध होत नाही. उपक्रम राबविण्यापूर्वी आरोग्य केंद्रांना आवश्यक औषधसाठा व मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राऊत यांनी केली.

टॅग्स :Healthआरोग्यzpजिल्हा परिषदdoctorडॉक्टरnagpurनागपूर