शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

शाळा आहेत, घंटा वाजते, पण शिक्षक नाहीत! शिक्षणाचं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 17:58 IST

Nagpur : राज्यात आधीच १४,९८५ शाळांची विद्यार्थी संख्या २० पेक्षा कमी आहे. शिवाय ३,४६६ शाळा एकाच शिक्षकावर चालतात.

बालाजी देवर्जनकरनागपूर : मार्च २०२४ मध्ये राज्यात तब्बल ६५ हजार सरकारने शिक्षक पदे रिक्त असल्याचं मान्य केलं होतं. त्यात २३,४३५ पदे फक्त जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त आहेत. तरीसुद्धा भरती थांबवून सरकारने बदल्यांचा खेळ सुरू ठेवला आहे. यात सेवानिवृत्तीमुळे निर्माण झालेल्या तुटीचा विचारच केला गेला नाही. परिणामी, काही शाळांत पटसंख्या कमी असूनही शिक्षक जास्त, तर अनेक दुर्गम शाळा अक्षरशः शिक्षकाविना आहेत. राज्यात आधीच १४,९८५ शाळांची विद्यार्थी संख्या २० पेक्षा कमी आहे. शिवाय ३,४६६ शाळा एकाच शिक्षकावर चालतात. आता कार्यमुक्तीच्या गोंधळामुळे त्या 'शून्य शिक्षकी' होण्याचीच भीती आहे.

वर्गात मुलं असतील, घंटा वाजेल, पण शिकवायला एकही शिक्षक नसेल हा शिक्षणाचा विध्वंस नाही तर काय? सरकारी शाळांची पटसंख्या आधीच कोसळली आहे. पालकांचा ओढा खासगी शाळांकडे वाढतोय, पण गरीब व वंचित पालकांना ती परवडणारी नाही. मग त्यांच्या मुलांचं काय? शिक्षकच नसतील तर डिजिटल शाळा, संकुल शाळा, शाळा एकत्रीकरण अशा योजनेचा उपयोग काय? प्रत्यक्षात या तथाकथित सुधारणा म्हणजे शाळा बंद करण्याची तयारीच वाटते.

ग्रामीण शाळा टिकल्या नाहीत तर गावांचा सामाजिक व शैक्षणिक कणा मोडेल. मुलं शिक्षणापासून वंचित राहतील, बेरोजगारी वाढेल आणि अज्ञानाचा अंधार पसरलेलाच राहील. खरंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर केलेला हा अन्यायच आहे.

शिक्षकांच्या बदल्या हा हक्क आहे, यात शंका नाही. पण त्या बदल्यांमुळे शाळा शिक्षकाविना झाल्या, तर त्याला न्याय्य म्हणता येईल का? बदल्यांचा हक्क जपताना विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवले जात आहेत. प्रश्न सरळ आहे सरकारला खरंच सरकारी शाळा वाचवायच्या आहेत का की, खासगी शिक्षणाला चालना देण्यासाठी जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जातंय?

घोषणांची फुगेबाजी थांबवून सरकारने कृती करायलाच हवी. कारण शिक्षक नसलेली शाळा म्हणजे केवळ उघडी इमारत आणि अशा इमारतीतून मुलांचं भविष्य कधीच घडत नाही. अशा धोरणांमुळे 'शाळा शिक्षकाविना, उद्या गाव अज्ञानाविना' असे व्हायला नको म्हणजे झालं.

सरकारच्या शिक्षण धोरणांचा गोंधळ आता मुलांच्या भविष्याशी थेट खेळ करतोय. बदल्यांची अफाट मोहीम, सेवानिवृत्तीचा गैरविचार आणि नियोजनाचा पूर्ण अभाव यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा एका मागोमाग शिक्षकाविना होत चालल्या आहेत. अनेक शाळा तर थेट 'शून्य शिक्षकी' होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. घोषणांमध्ये शिक्षण हा हक्क आहे, असं सांगणारं सरकार प्रत्यक्षात तो हक्क हिरावून घेतंय. हा केवळ निष्काळजीपणा नाही, तर ग्रामीण भागातील शाळा बंद करण्याचाच कट असल्याचा संशय वाढतोय.

टॅग्स :Educationशिक्षणTeachers Recruitmentशिक्षकभरतीTeacherशिक्षक