शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

शाळा आहेत, घंटा वाजते, पण शिक्षक नाहीत! शिक्षणाचं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 17:58 IST

Nagpur : राज्यात आधीच १४,९८५ शाळांची विद्यार्थी संख्या २० पेक्षा कमी आहे. शिवाय ३,४६६ शाळा एकाच शिक्षकावर चालतात.

बालाजी देवर्जनकरनागपूर : मार्च २०२४ मध्ये राज्यात तब्बल ६५ हजार सरकारने शिक्षक पदे रिक्त असल्याचं मान्य केलं होतं. त्यात २३,४३५ पदे फक्त जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त आहेत. तरीसुद्धा भरती थांबवून सरकारने बदल्यांचा खेळ सुरू ठेवला आहे. यात सेवानिवृत्तीमुळे निर्माण झालेल्या तुटीचा विचारच केला गेला नाही. परिणामी, काही शाळांत पटसंख्या कमी असूनही शिक्षक जास्त, तर अनेक दुर्गम शाळा अक्षरशः शिक्षकाविना आहेत. राज्यात आधीच १४,९८५ शाळांची विद्यार्थी संख्या २० पेक्षा कमी आहे. शिवाय ३,४६६ शाळा एकाच शिक्षकावर चालतात. आता कार्यमुक्तीच्या गोंधळामुळे त्या 'शून्य शिक्षकी' होण्याचीच भीती आहे.

वर्गात मुलं असतील, घंटा वाजेल, पण शिकवायला एकही शिक्षक नसेल हा शिक्षणाचा विध्वंस नाही तर काय? सरकारी शाळांची पटसंख्या आधीच कोसळली आहे. पालकांचा ओढा खासगी शाळांकडे वाढतोय, पण गरीब व वंचित पालकांना ती परवडणारी नाही. मग त्यांच्या मुलांचं काय? शिक्षकच नसतील तर डिजिटल शाळा, संकुल शाळा, शाळा एकत्रीकरण अशा योजनेचा उपयोग काय? प्रत्यक्षात या तथाकथित सुधारणा म्हणजे शाळा बंद करण्याची तयारीच वाटते.

ग्रामीण शाळा टिकल्या नाहीत तर गावांचा सामाजिक व शैक्षणिक कणा मोडेल. मुलं शिक्षणापासून वंचित राहतील, बेरोजगारी वाढेल आणि अज्ञानाचा अंधार पसरलेलाच राहील. खरंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर केलेला हा अन्यायच आहे.

शिक्षकांच्या बदल्या हा हक्क आहे, यात शंका नाही. पण त्या बदल्यांमुळे शाळा शिक्षकाविना झाल्या, तर त्याला न्याय्य म्हणता येईल का? बदल्यांचा हक्क जपताना विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवले जात आहेत. प्रश्न सरळ आहे सरकारला खरंच सरकारी शाळा वाचवायच्या आहेत का की, खासगी शिक्षणाला चालना देण्यासाठी जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जातंय?

घोषणांची फुगेबाजी थांबवून सरकारने कृती करायलाच हवी. कारण शिक्षक नसलेली शाळा म्हणजे केवळ उघडी इमारत आणि अशा इमारतीतून मुलांचं भविष्य कधीच घडत नाही. अशा धोरणांमुळे 'शाळा शिक्षकाविना, उद्या गाव अज्ञानाविना' असे व्हायला नको म्हणजे झालं.

सरकारच्या शिक्षण धोरणांचा गोंधळ आता मुलांच्या भविष्याशी थेट खेळ करतोय. बदल्यांची अफाट मोहीम, सेवानिवृत्तीचा गैरविचार आणि नियोजनाचा पूर्ण अभाव यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा एका मागोमाग शिक्षकाविना होत चालल्या आहेत. अनेक शाळा तर थेट 'शून्य शिक्षकी' होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. घोषणांमध्ये शिक्षण हा हक्क आहे, असं सांगणारं सरकार प्रत्यक्षात तो हक्क हिरावून घेतंय. हा केवळ निष्काळजीपणा नाही, तर ग्रामीण भागातील शाळा बंद करण्याचाच कट असल्याचा संशय वाढतोय.

टॅग्स :Educationशिक्षणTeachers Recruitmentशिक्षकभरतीTeacherशिक्षक