शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

नागपूरच्या नदी-तलावात काेराेनाचे विषाणू तर नाहीत ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 07:00 IST

Nagpur News अहमदाबाद येथील नद्या व तलावांमध्ये काेराेनाचे विषाणू आढळल्याच्या सर्वेक्षणाने देशात खळबळ उडविली आहे. नागपूर शहरातही ही शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देअहमदाबादमधील सर्वेक्षणाने वाढविली भीती सिवेज हेच जलप्रदूषणाचे प्रमुख कारण

निशांत वानखेडे

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : अहमदाबाद येथील नद्या व तलावांमध्ये काेराेनाचे विषाणू आढळल्याच्या सर्वेक्षणाने देशात खळबळ उडविली आहे. नागपूर शहरातही ही शक्यता नाकारता येत नाही. कारण घराघरातून निघणारे सांडपाणी (सिवेज) हे नद्या व तलावांच्या प्रदूषणाचे सर्वात माेठे कारण आहे आणि दरवर्षीच्या सर्वेक्षणानुसार ‘काॅलिफाॅर्म’ हेच जलप्रदूषणाचे माेठे घटक असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे काेराेना काळात घराघरातून, रुग्णालयांमधून निघणाऱ्या सिवेजद्वारे काेराेनाचे विषाणू नदी, तलावांमध्ये मिसळण्याची शक्यता आहे.

काेराेनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांसह नागपूरही हायरिस्कवर हाेते. दुसऱ्या लाटेदरम्यान दरराेज पाॅझिटिव्ह निघणाऱ्या रुग्णांचा आकडा ८००० पर्यंत पाेहचला हाेता. आतापर्यंत ४.६० लाखांच्यावर रुग्णांवर उपचार करण्यात आला. यातील अनेकजन शासकीय व खासगी रुग्णालयात हाेते तर असंख्य हाेम आयसाेलेशनमध्ये हाेते. त्यामुळे रुग्णांच्या शाैचासह आंघाेळीचे सांडपाणी सिवेजद्वारे नद्या व तलावांमध्ये मिसळलेले आहे, हे निश्चित. त्यामुळे संक्रमितांकडून काेराेनाचे विषाणू नदी तलावांमध्ये पाेहचले आहेत, हे नाकारता येत नाही. मात्र सिवेजमधील विषाणू कितपत धाेकादायक आहेत, हा संशाेधनाचा विषय आहे.

सांडपाणी आणि प्रदूषणाची स्थिती

शहरातून दरराेज ६५० एमएलडी सांडपाणी घराघरातून व रुग्णालयातून बाहेर निघते. ३३० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून काेराडी थर्मल पाॅवर प्लांटला दिले जाते. उरलेले सांडपाणी थेट नागनदीवाटे कन्हान नदी व पुढे वैनगंगेला जाऊन मिळते तर काही शहरांतील तलावांमध्येही जाते.

- नीरीच्या २०१९-२० च्या तपासणीनुसार यापैकी नागनदीच्या पाण्यात ४२४ मिलिग्रॅम/लिटर काॅलिफाॅर्म (मानवी शरीरातील मलमूत्राचे घटक)चे प्रमाण आढळले आहेत. पिवळी व पाेहरा नदीमध्ये ते १४१ मिलिग्रॅम/लिटरपर्यंत आढळले. म्हणजे माेठ्या प्रमाणात या नद्या सिवेजमुळे प्रदूषित आहेत.

- नाईक तलावामध्ये अत्याधिक ४८० ते ४९० मिलिग्रॅम/लिटर काॅलिफाॅर्मचे घटक आढळले आहेत. गांधीसागर, अंबाझरी व फुटाळा तलावातही काॅलिफाॅर्मचे प्रदूषण आढळले आहे.

- शहरातील काही भागातील भूजल नमुन्यातही काॅलिफाॅर्मचे घटक आढळून आल्याचे निरीक्षण आहे.

नीरीच्या संशाेधकांचा अनाैपचारिक दुजाेरा

नीरीच्या वैज्ञानिकांनी अनाैपचारिकपणे शहरातील तलाव व नद्यांमध्ये काेराेनाचे विषाणू असल्याची शक्यता मान्य केली आहे. एका संशाेधकाने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले, नीरीद्वारे नदी व तलावातील पाण्याचे नियमित माॅनिटरिंग केले जात आहे आणि काहींच्या नमुन्यात विषाणू असल्याचे दिसून येत आहेत. मात्र प्रमाण किती आहे व ते किती धाेकादायक ठरू शकतील, हे सांगता येत नाही.

- काेराेना विषाणूचा हवेतून संसर्ग हाेताे हेच संशाेधन आतापर्यंत सांगितले गेले आहे. पाणी किंवा सांडपाण्यातून संसर्ग हाेत असल्याचे संशाेधन झाले नाही. सध्यातरी महापालिका किंवा इतर काेणत्याही यंत्रणेद्वारे नदी व तलावाच्या पाण्याची विषाणूसंबंधी तपासणी केल्याची माहिती नाही. त्यामुळे यावर निश्चित सांगणे शक्य नसल्याचे ग्रीन व्हिजिलचे काैस्तुभ चटर्जी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस