शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात जंगलाजवळ वसली आहेत १५ हजार गावे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 13:43 IST

Nagpur News पेंच व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने शासनाच्या धाेरणांची काटेकाेर अंमलबजावणी करून वन्यजीव व स्थानिकांच्या उपजीविकेचा सुवर्णमध्य साधला आहे. पेंच अंतर्गत येणाऱ्या पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य तसेच पैनगंगा व टिपेश्वर अभयारण्यात त्याबाबत उपक्रम राबविले आहेत.

ठळक मुद्देशाश्वत विकासासाठी स्थानिकांच्या सक्षमीकरणावर भर पेंच व्याघ्र प्रकल्पाने साधला सुवर्णमध्य

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केवळ महाराष्ट्राचा विचार केल्यास येथील वनांमध्ये किंवा वनांजवळ १५ हजाराच्या जवळपास गावे वसलेली आहेत. येथील ग्रामस्थांच्या गरजा वनाेपजांवर अवलंबून आहेत. अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प घाेषित झाल्याने लाेकांना समस्यांना ताेंड द्यावे लागते आणि संघर्षही निर्माण हाेताे, जाे वनसंवर्धनासाठी चांगला नाही. त्यामुळे वनांचा शाश्वत विकास साधायचा असेल तर स्थानिकांच्या सक्षमीकरणावरही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने शासनाच्या धाेरणांची काटेकाेर अंमलबजावणी करून वन्यजीव व स्थानिकांच्या उपजीविकेचा सुवर्णमध्य साधला आहे. पेंच अंतर्गत येणाऱ्या पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प, उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य तसेच पैनगंगा व टिपेश्वर अभयारण्यात त्याबाबत उपक्रम राबविले आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डाॅ. रविकिरण गाेवेकर यांनी सांगितले, गेल्या पाच वर्षात पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत एकूण १५९ गावांमध्ये डॉ. श्यामाप्रसाद जन-वन-योजनेअंतर्गत सुमारे ४८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन १.८० लक्ष लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिले. एल पी जी गॅसची सुविधा, शौचालयाचे बांधकाम, सौरकुंपण, शेती उपयोगी साहित्य पुरविणे, दुधाळ जनावरांचे वाटप, सुधारित चुलीचा पुरवठा, सौरदिवे वाटप यांसह गावांमध्ये पाण्याची सोय करण्यासाठी शेततळी/बोअरवेल, ई-लर्निंग सुविधा शाळांमध्ये पुरविणे, शुध्द पाण्याचे फिल्टर्स पुरविणे, जल व मृद संवर्धनाची कामे करणे आदी कामे केली जात आहेत.

व्याघ्र संवर्धन फाऊंडेशनच्या माध्यमातून सुमारे १००० च्यावर युवक-युवतीना पेंच फाऊंडेशन व प्रथम यांच्या माध्यमातून आदरातिथ्याचे प्रशिक्षण देऊन नोकरी मिळवून देण्यांत आली आहे. त्याचप्रमाणे चालक, वीजतंत्री, गवंडी, तांत्रिक, कौशल्य आधारित कार्यशाळा, टेक्टस्टाईल आदीकरिता युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात आले. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात व बोर व्याघ्र प्रकल्प येथे मोबाईल आरोग्य वाहनांव्दारे डॉक्टर गावागावात जाऊन लोकांची तपासणी, मोफत औषधे आणि हेल्थ कॅम्प घेत तीन वर्षात ४१ हजार पेक्षा जास्त लोकांना लाभ दिला.

सफारी शुल्काचे हाेते काय

जागतिक वन्यजीव दिनाचे औचित्य साधून पेंच व्याघ्र संवर्धन फाऊंडेशनच्यावतीने ‘सफारी शुल्काचे हाेते काय’ या आशयाचे पाेस्टर लाॅन्च करण्यात आले. वनांचा शाश्वत विकास साधण्यासह स्थानिकांना राेजगार देऊन या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी या शुल्काचा उपयाेग केला जात असल्याचे याद्वारे सांगण्यात आले. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकाेडकर यांच्यासह पेंच प्रकल्प संचालक व मुख्य वनसंरक्षक डाॅ. रविकिरण गाेवेकर, उपसंचालक अमलेंदू पाठक प्रामुख्याने उपस्थित हाेते. सहायक वनसंरक्षक अतुल देवकर यांची ही संकल्पना हाेती.

टॅग्स :forest departmentवनविभाग