शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नागपूर विद्यापीठात दुसरा कोहचाडे आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:39 PM

कोहचाडे कांडामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अब्रूचे देशभरात धिंडवडे निघाले. शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहाराच्या या काळ्या रूपाने त्यावेळी सर्वांना हादरवून सोडले होते. त्या घटनेमुळे झालेले नागपूर विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचे नुकसान अद्याप भरून निघाले नाही. असे असले तरी, गैरप्रकार पूर्णपणे बंद झालेला नाही. अलीकडच्या एका अवैध गुणवाढ प्रकरणामुळे नागपूर विद्यापीठात दुसरा कोहचाडे असण्याचा संशय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला आला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाला संशय : अवैध गुणवाढ प्रकरणाची व्यापक दखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोहचाडे कांडामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अब्रूचे देशभरात धिंडवडे निघाले. शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहाराच्या या काळ्या रूपाने त्यावेळी सर्वांना हादरवून सोडले होते. त्या घटनेमुळे झालेले नागपूर विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचे नुकसान अद्याप भरून निघाले नाही. असे असले तरी, गैरप्रकार पूर्णपणे बंद झालेला नाही. अलीकडच्या एका अवैध गुणवाढ प्रकरणामुळे नागपूर विद्यापीठात दुसरा कोहचाडे असण्याचा संशय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला आला आहे. परिणामी, न्यायालयाने प्रकरणाची व्यापक दखल घेतली आहे. अवैध गुणवाढ प्रकरणांवरील निर्णयांची माहिती नागपूर विद्यापीठाला मागण्यात आली आहे. सदर माहिती मिळाल्यानंतर हे प्रकरण जनहित याचिका म्हणून चालवायचे की नाही याचा विचार उच्च न्यायालय करणार आहे.अवैध गुणवाढीचे अलीकडचे प्रकरण करण हांडा या विद्यार्थ्याशी संबंधित आहे. याप्रकरणात बडतर्फ झालेल्या सहायक कुलसचिव (पुनर्मूल्यांकन) संध्या चुनोडकर-हांडा यांचा करण हा चिरंजिव होय. सेंट विन्सेन्ट पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अभियांत्रिकी (मेकॅनिकल) अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असलेल्या करणने २०११ मधील हिवाळ्यात तृतीय सेमिस्टरची परीक्षा दिली होती. त्यात तो अनुत्तीर्ण झाला होता. त्यामुळे त्याने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल केला होता. पुनर्मूल्यांकनात गुण वाढल्यामुळे तो उत्तीर्ण झाला. दरम्यान, मुन्ना पटेल यांनी ही गुणवाढ बेकायदेशीरपणे झाल्याची तक्रार तत्कालीन कुलगुरूंकडे केली. कुलगुरूंनी त्याची दखल घेऊन शिस्तपालन समितीला चौकशी करण्याचा आदेश दिला. समितीने चौकशी करून २७ सप्टेंबर २०१३ रोजी अहवाल सादर केला. त्यात संध्या चुनोडकर यांनी करणचे गुण बेकायदेशीरपणे वाढविल्याचा ठपका ठेवण्यात आला. तसेच, चुनोडकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व करणचा तृतीय सेमिस्टरचा निकाल रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती.२ नोव्हेंबर २०१३ रोजी विद्यापीठाने करणचा तृतीय सेमिस्टरचा निकाल रद्द करण्याचा निर्णय दिला होता. त्याविरुद्ध करणने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्याची याचिका अंशत: मंजूर केली. त्यानंतर विद्यापीठाने ३ नोव्हेंबर २०१७ रोजी सुधारित निर्णय घेऊन करणला नव्याने तृतीय सेमिस्टरची परीक्षा देण्यास सांगितले आहे. त्या निर्णयालाही करणने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. परिणामी, न्यायालयाने याप्रकरणाची व्यापक दखल घेतली आहे. तसेच, करणच्या तक्रारीवर विद्यापीठाला १४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर मागितले आहे. करणतर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :universityविद्यापीठHigh Courtउच्च न्यायालय