शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

...तर तीन महिन्यात महाराष्ट्रात ९ रेल्वे अपघात झाले असते! मध्य रेल्वेतील १० जणांचा पुरस्कार देऊन गौरव

By नरेश डोंगरे | Updated: December 5, 2023 20:37 IST

या सर्व १० कर्मचाऱ्यांना रेल्वे महाव्यवस्थापकांचा सुरक्षा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात नागपूर विभागातील तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

नागपूर : ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यात महाराष्ट्राच्या विविध भागात मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखविल्यामुळे ९ दुर्घटना टळल्या. तर, एका कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला. या सर्व १० कर्मचाऱ्यांना रेल्वे महाव्यवस्थापकांचा सुरक्षा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात नागपूर विभागातील तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले विलास राजेश्वर चाैरे १५ ऑक्टोबर २०२३ ला चितोडा रेेल्वे स्थानकावर ड्युटी करीत होते. त्यांना या मार्गाने धावणाऱ्या एका मालगाडीच्या जीडीआरची तपासणी करताना दोन वॅगनचे बाह्य हेलिकल कॉईल स्प्रिंग तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी गाडी तेथेच थांबवून दुरूस्तीचे काम करून घेतले. त्यांच्या या कर्तव्य तत्परतेमुळे रेल्वेचा संभाव्य अपघात टळला.

विजेश सदाशिव हे आमला येथे ट्रॅकमन म्हणून सेवारत आहेत. २४ ऑगस्ट २०२३ ला कर्तव्यावर असताना त्यांना रुळाच्या वेल्डिंगला तडा गेल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच वरिष्ठांना माहिती दिली आणि त्यांच्या मार्फतीने ट्रॅकची दुरूस्ती करून घेतली. त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले असते तर काही वेळेनंतर या ट्रॅकवरून जाणाऱ्या रेल्वेगाडीला अपघात झाला असता. मात्र, विजेश सदाशिव यांच्यामुळे तो संभाव्य अपघात टळला. २० नोव्हेंबर २०२३ रोजी मालगाडीचे इंजिन चालक अरुणकुमार सिंह यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे २० नोव्हेंबर २०२३ चा संभाव्य अपघात टळला.

त्याचप्रमाणे मुंबई विभागातील ईगतपूरीचे रेल्वे स्थानक उपव्यवस्थापक सीताराम कुमार, भायखळा येथील ट्रॅकमॅन चिदानंद आडोळे, कुर्ला कार शेड मुंबई येथील वरिष्ठ विभाग अभियंता दिनेश अनंतराम साखरे यांच्यामुळेही वेगवेगळ्या दुर्घटना टाळण्यास मदत झाली.

भुसावळ विभागातील कुंदनकुमार (ट्रॅकमन, माहेजी भुसावळ), मालगाडी इंजिन चालक महेंद्र सिंह (भुसावळ) आणि सोलापूर विभागातील सी. के. सिद्धेय (मालगाडी इंजिन चालक वाडी, सोलापूर) यांच्या प्रसंगावधानतेमुळेही वेगवेगळे अपघात टळले.या सर्वांच्या कर्तव्य तत्परतेची दखल घेत त्यांना रेल्वेच्या महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्काराने गाैरवान्वित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ५ डिसेंबरला आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांच्या हस्ते रोख, पदक आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.

भगवान विठ्ठल आंधळे बनले देवदूत!सत्कारमुर्तीत आसनगाव, मुंबईचे की-मॅन भगवान विठ्ठल आंधळे यांचाही समावेश आहे. आसनगाव रेल्वे स्थानकावर २२ ऑक्टोबर २०२३ ला रात्री ७.३५ वाजता एका लहान मुलासह एक व्यक्ती धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढत होता. त्याचे संतुलन बिघडल्याने तो व्यक्ती फरफटत जाऊ लागला. भगवान आंधळे यांनी लगेच धाव घेत त्या व्यक्तीला पकडून ओढून घेतले. त्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचविले.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूरAccidentअपघात