शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

...तर तीन महिन्यात महाराष्ट्रात ९ रेल्वे अपघात झाले असते! मध्य रेल्वेतील १० जणांचा पुरस्कार देऊन गौरव

By नरेश डोंगरे | Updated: December 5, 2023 20:37 IST

या सर्व १० कर्मचाऱ्यांना रेल्वे महाव्यवस्थापकांचा सुरक्षा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात नागपूर विभागातील तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

नागपूर : ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यात महाराष्ट्राच्या विविध भागात मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखविल्यामुळे ९ दुर्घटना टळल्या. तर, एका कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला. या सर्व १० कर्मचाऱ्यांना रेल्वे महाव्यवस्थापकांचा सुरक्षा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात नागपूर विभागातील तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले विलास राजेश्वर चाैरे १५ ऑक्टोबर २०२३ ला चितोडा रेेल्वे स्थानकावर ड्युटी करीत होते. त्यांना या मार्गाने धावणाऱ्या एका मालगाडीच्या जीडीआरची तपासणी करताना दोन वॅगनचे बाह्य हेलिकल कॉईल स्प्रिंग तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी गाडी तेथेच थांबवून दुरूस्तीचे काम करून घेतले. त्यांच्या या कर्तव्य तत्परतेमुळे रेल्वेचा संभाव्य अपघात टळला.

विजेश सदाशिव हे आमला येथे ट्रॅकमन म्हणून सेवारत आहेत. २४ ऑगस्ट २०२३ ला कर्तव्यावर असताना त्यांना रुळाच्या वेल्डिंगला तडा गेल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच वरिष्ठांना माहिती दिली आणि त्यांच्या मार्फतीने ट्रॅकची दुरूस्ती करून घेतली. त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले असते तर काही वेळेनंतर या ट्रॅकवरून जाणाऱ्या रेल्वेगाडीला अपघात झाला असता. मात्र, विजेश सदाशिव यांच्यामुळे तो संभाव्य अपघात टळला. २० नोव्हेंबर २०२३ रोजी मालगाडीचे इंजिन चालक अरुणकुमार सिंह यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे २० नोव्हेंबर २०२३ चा संभाव्य अपघात टळला.

त्याचप्रमाणे मुंबई विभागातील ईगतपूरीचे रेल्वे स्थानक उपव्यवस्थापक सीताराम कुमार, भायखळा येथील ट्रॅकमॅन चिदानंद आडोळे, कुर्ला कार शेड मुंबई येथील वरिष्ठ विभाग अभियंता दिनेश अनंतराम साखरे यांच्यामुळेही वेगवेगळ्या दुर्घटना टाळण्यास मदत झाली.

भुसावळ विभागातील कुंदनकुमार (ट्रॅकमन, माहेजी भुसावळ), मालगाडी इंजिन चालक महेंद्र सिंह (भुसावळ) आणि सोलापूर विभागातील सी. के. सिद्धेय (मालगाडी इंजिन चालक वाडी, सोलापूर) यांच्या प्रसंगावधानतेमुळेही वेगवेगळे अपघात टळले.या सर्वांच्या कर्तव्य तत्परतेची दखल घेत त्यांना रेल्वेच्या महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्काराने गाैरवान्वित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ५ डिसेंबरला आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांच्या हस्ते रोख, पदक आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.

भगवान विठ्ठल आंधळे बनले देवदूत!सत्कारमुर्तीत आसनगाव, मुंबईचे की-मॅन भगवान विठ्ठल आंधळे यांचाही समावेश आहे. आसनगाव रेल्वे स्थानकावर २२ ऑक्टोबर २०२३ ला रात्री ७.३५ वाजता एका लहान मुलासह एक व्यक्ती धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढत होता. त्याचे संतुलन बिघडल्याने तो व्यक्ती फरफटत जाऊ लागला. भगवान आंधळे यांनी लगेच धाव घेत त्या व्यक्तीला पकडून ओढून घेतले. त्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचविले.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूरAccidentअपघात