शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

...तर तीन महिन्यात महाराष्ट्रात ९ रेल्वे अपघात झाले असते! मध्य रेल्वेतील १० जणांचा पुरस्कार देऊन गौरव

By नरेश डोंगरे | Updated: December 5, 2023 20:37 IST

या सर्व १० कर्मचाऱ्यांना रेल्वे महाव्यवस्थापकांचा सुरक्षा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात नागपूर विभागातील तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

नागपूर : ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यात महाराष्ट्राच्या विविध भागात मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखविल्यामुळे ९ दुर्घटना टळल्या. तर, एका कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला. या सर्व १० कर्मचाऱ्यांना रेल्वे महाव्यवस्थापकांचा सुरक्षा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात नागपूर विभागातील तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले विलास राजेश्वर चाैरे १५ ऑक्टोबर २०२३ ला चितोडा रेेल्वे स्थानकावर ड्युटी करीत होते. त्यांना या मार्गाने धावणाऱ्या एका मालगाडीच्या जीडीआरची तपासणी करताना दोन वॅगनचे बाह्य हेलिकल कॉईल स्प्रिंग तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी गाडी तेथेच थांबवून दुरूस्तीचे काम करून घेतले. त्यांच्या या कर्तव्य तत्परतेमुळे रेल्वेचा संभाव्य अपघात टळला.

विजेश सदाशिव हे आमला येथे ट्रॅकमन म्हणून सेवारत आहेत. २४ ऑगस्ट २०२३ ला कर्तव्यावर असताना त्यांना रुळाच्या वेल्डिंगला तडा गेल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच वरिष्ठांना माहिती दिली आणि त्यांच्या मार्फतीने ट्रॅकची दुरूस्ती करून घेतली. त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले असते तर काही वेळेनंतर या ट्रॅकवरून जाणाऱ्या रेल्वेगाडीला अपघात झाला असता. मात्र, विजेश सदाशिव यांच्यामुळे तो संभाव्य अपघात टळला. २० नोव्हेंबर २०२३ रोजी मालगाडीचे इंजिन चालक अरुणकुमार सिंह यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे २० नोव्हेंबर २०२३ चा संभाव्य अपघात टळला.

त्याचप्रमाणे मुंबई विभागातील ईगतपूरीचे रेल्वे स्थानक उपव्यवस्थापक सीताराम कुमार, भायखळा येथील ट्रॅकमॅन चिदानंद आडोळे, कुर्ला कार शेड मुंबई येथील वरिष्ठ विभाग अभियंता दिनेश अनंतराम साखरे यांच्यामुळेही वेगवेगळ्या दुर्घटना टाळण्यास मदत झाली.

भुसावळ विभागातील कुंदनकुमार (ट्रॅकमन, माहेजी भुसावळ), मालगाडी इंजिन चालक महेंद्र सिंह (भुसावळ) आणि सोलापूर विभागातील सी. के. सिद्धेय (मालगाडी इंजिन चालक वाडी, सोलापूर) यांच्या प्रसंगावधानतेमुळेही वेगवेगळे अपघात टळले.या सर्वांच्या कर्तव्य तत्परतेची दखल घेत त्यांना रेल्वेच्या महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्काराने गाैरवान्वित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ५ डिसेंबरला आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांच्या हस्ते रोख, पदक आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.

भगवान विठ्ठल आंधळे बनले देवदूत!सत्कारमुर्तीत आसनगाव, मुंबईचे की-मॅन भगवान विठ्ठल आंधळे यांचाही समावेश आहे. आसनगाव रेल्वे स्थानकावर २२ ऑक्टोबर २०२३ ला रात्री ७.३५ वाजता एका लहान मुलासह एक व्यक्ती धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढत होता. त्याचे संतुलन बिघडल्याने तो व्यक्ती फरफटत जाऊ लागला. भगवान आंधळे यांनी लगेच धाव घेत त्या व्यक्तीला पकडून ओढून घेतले. त्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचविले.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूरAccidentअपघात