शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

...तर वयाच्या २५ वर्षांपर्यंत मिळणार नाही लायसन्स

By सुमेध वाघमार | Updated: November 20, 2024 15:56 IST

परिवहन विभागाच्या सारथी प्रणालीत बदल : पुणे येथील पोर्शे कार अपघाताचा संदर्भ

सुमेध वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अल्पवयीन मुलाने वाहन चालविल्यास त्याला वयाच्या २५ व्या वर्षांपर्यंत लायसन्स न देण्याचा कायदा आहे. परंतु या कायद्याची अंमलबजावणीच होत नव्हती. गुन्हा करूनही अल्पवयीन मुलांना लायसन्स मिळायचे. अखेर याची दखल परिवहन विभागाने घेतली. सारथी प्रणालीमध्ये नियमानुसार आवश्यक बदल करून घेतले. त्यामुळे आता अल्पवयीन मुलाने वाहन चालविल्यास लर्निंग लायसन्सच निघणार नाही.

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या पोर्शे या लक्झरी कारने दुचाकी चालवत असलेल्या दोघांना जोरदार धडक दिली, त्यात दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेने देशाचे लक्ष वेधले होते. मोटार वाहन कायद्यातील अल्पवयीन वाहनचालकांच्या संदर्भातील कायद्याच्या प्रश्नचिन्ह अंमलबजावणीवरही उपस्थित झाले होते. विशेष म्हणजे, मोटार वाहन कायदा १९८९ च्या कलम १९९ अ (५) नुसार १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यास मुलाचे पालक किंवा मोटार वाहनाचा मालक दोघांनाही दोषी मानले जाते. यात २५ हजारांचा दंडासह पालक किंवा मोटार वाहन मालकाला तीन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. तसेच अल्पवयीन मुलाला वयाच्या २५व्या वर्षापर्यंत वाहन परवाना न देण्याची तरतूद आहे. परंतु नागपुरात तरी या कायद्याची अंमलबजावणी केवळ दंडात्मक कारवाई पुरतीच मर्यादित राहायची. गुन्हा करूनही अनेकांना लायसन्स मिळायचे. याच्या तक्रारी झाल्याने अखेर परिवहन विभागाने पुणे येथील पोर्शे कारचा संदर्भ देत अल्पवयीन वाहन चालकांना वयाच्या २५व्या वर्षापर्यंत लायसन्स मिळणार नाही यासाठी सारथी प्रणाली ४.० मध्ये आवश्यक बदल करण्याकरिता पुण्याचा राष्ट्रीय सूचना केंद्र यांना कळविले. 

आरटीओच्या कारवाईकडे लक्ष परिवहन विभागाने सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सोमवारी पत्राद्वारे प्रणालीत केलेल्या बदलांची माहिती दिली. वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांना परवाना प्राप्त होऊ नये याबाबत कारवाई करावी, असे निर्देशही दिले. त्यामुळे आरटीओच्या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.

अल्पवयीन मुलांच्या हाती का नको वाहने? चौदा ते सतरा वर्षे वयापर्यंत मुलांमध्ये आक्रमक वृत्ती असते. या वयात हार्मोनमध्ये बदल होत असतात. त्यामुळे काहीतरी थ्रिलिंग, अतिसाहस, इतरांपेक्षा थोडे वेगळे करण्याची इच्छा होत असते. हार्मोन आणि मनावरील कंट्रोल यांची सांगड घालता येत नसल्याने अघटित घडण्याची शक्यता असते. या वयात कायद्याची विशेष भीती नसते. आपल्या हातून चूक झाल्यास त्याला काहीच वाटत नसल्याने बेदरकार वृत्ती निर्माण होते. त्यामुळे अल्पवयीन मुलांना वाहन नकोच, असे मनोविकार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :nagpurनागपूर