शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

...तर भारत कधीच पारतंत्र्यात गेला नसता - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 16:23 IST

राजरत्न पुरस्कार वितरण सोहळा

नागपूर : हमरीतुमरीच्या प्रसंगी नागपूरकर भोसल्यांनी समंजसपणा दाखवत पेशव्यांसमोर माघार घेतली आणि वाद टळला. असा इतिहासाचा दाखला देत, तसाच समंजसपणा पुढे दाखविला गेला असता, तर भारत कधीच पारतंत्र्यात गेला नसता, अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली.

मंगळवारी महाल येथील सीनिअर भोंसला पॅलेसमध्ये श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (प्रथम) बहुद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या वतीने पार पडलेल्या राजरत्न पुरस्कार २०२३ वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानाहून भागवत बोलत होते. व्यासपीठावर श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (पंचम) व श्रीमंत डॉ.राजे मुधोजी भोसले उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयात दक्षिण भारत मुक्त झाला, तर नागपूकर भोसल्यांच्या काळात पूर्व भारत परकीय मुक्त झाला. अशाच भारतमुक्तीच्या प्रसंगात नागपूरकर भोसले आणि पेशवे आपापल्या मार्गाने बिहारकडे निघाले. दरम्यान, दोघेही समोरासमोर आले आणि पुढे कोण जाणार, बिहार कोण काबीज करणार, अशी वादाची स्थिती निर्माण झाली. दोन्हीही पक्ष शूर होते, परंतु नागपूरकर भोसल्यांनी वादाला वाव न देता स्वत: पुढाकार घेत पेशव्यांना बिहारवर स्वारी करण्यास मार्ग दिल्याने आपसी वादाला तेथेच शमविल्याचे भागवत यावेळी म्हणाले. संचालन सारंग ढोक यांनी केले, तर आभार किशन शर्मा यांनी मानले.

मुकेश कुकडे, वि.स. जोग यांना राजरत्न पुरस्कार प्रदान

- यावेळी ‘लोकमत’चे ज्येष्ठ छायाचित्रकार मुकेश कुकडे यांना पत्रकारिता क्षेत्रातील छायाचित्रणाकरिता श्रीमंत राजे अजितसिंह महाराज भोसले स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच ज्येष्ठ साहित्यिक डॉ.वि.स. जोग, ज्येष्ठ पत्रकार महेश उपदेव, वर्धा येथील ज्येष्ठ खेळाडू गिरीश उपाध्याय, मुंबई येथील शास्त्रीय संगीत साधक नरेंद्रनाथ मेनन, ज्येष्ठ रंगकर्मी अनिल पालकर आणि १८ वर्षांखालील वयोगटात मृदुल घनोटे व हितवी शाह यांना राजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे प्रा.डॉ.भालचंद्र हरदास व निकिता रमानी यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.

माझ्यावर कुणाचाच विश्वास नाही!

- तुम्ही माझी कितीही अतिशयोक्तीपूर्ण स्तुती केली, तरी त्यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही, कारण मी गेली १४ वर्षे नागपुरात आहे. इथला स्वभाव मला माहीत असल्याचा अप्रत्यक्ष टोला निवेदकाने केलेल्या स्तुतीवर कटाक्ष टाकताना डॉ.मोहन भागवत यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर