शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

महापुरुषांचा अपमान, सीमाप्रश्नावर हिवाळी अधिवेशन तापणार; पुर्वसंध्येलाच आरोप-प्रत्यारोपांचे सत्र

By योगेश पांडे | Updated: December 18, 2022 23:06 IST

विरोधक-सत्ताधारी आमनेसामने, पहिला दिवस गोंधळाचाच ठरण्याची चिन्हे

 

नागपूर: तीन वर्षांच्या कालावधीनंतर नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन चांगलेच तापणार असल्याची चिन्हे आहेत. महापुरुषांचा अपमान आणि सीमाप्रश्न या मुद्द्यांवर विरोधक व सत्ताधारी आमनेसामने आले असून सभागृहामध्येदेखील याचे पडसाद उमटणार आहेत. अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला विरोधकांनी केलेल्या आरोपांवर सभागृहात आकडेवारीसह उत्तरे देऊ अशी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतल्याने पहिला दिवस गोंधळाचाच ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विरोधकांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी रविवारी पत्रपरिषदेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. विरोधकांचे आरोप पद्धतशीरपणे फेटाळून लावत त्यांनी सभागृहात आकडेवारी मांडून विदर्भाचा अनुशेष कोणी वाढवला हे सांगितले जाईल, असे जाहीर केले. तर महापुरुषांबाबत बोलण्याचा महाविकासआघाडीला अधिकारच नसल्याचा दावा केला. हे खोके किंवा स्थगिती सरकार नसून कायदेशीर आणि बहुमताचे सरकार आहे. २०१९ चे सरकार अनैतिक होते. सोयरिक एकाशी, घरोबा दुसऱ्याशी केली होती. मागच्या सरकारमध्ये विदर्भातील मंत्र्यांनी, आमदारांनी नागपुरात अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. पण कोविडचे कारण देऊन नागपूरमध्ये अधिवेशन घेण्याचं टाळण्यात आले. हे अजितदादांनाही माहिती आहे. त्यामुळे ते त्यावर फारसे बोलणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

आता विदर्भाचा कळवळा कसा ?२०१९-२० मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात विदर्भातील ७ जिल्ह्यांच्या ‘डीपीसी’च्या निधीत कपात करण्यात आली होती. तेव्हापासूनच अन्यायाची शृंखला सुरू झाली. कोरोनाच्या नावावर ज्यांनी नागपुरात अडीच वर्षांत एकही अधिवेशन घेतले नाही, त्यांना आता विदर्भाचा कळवला कसा आला असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. विदर्भाचा अनुशेष कुणी व कसा वाढविला याचे आकडेच सभागृहात मांडू असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांना महापुरुषांवर बोलण्याचा अधिकार नाहीफडणवीस यांनी महापुरुषांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधकांना यासंदर्भात बोलण्याचा अधिकार नसल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्षाचे नेते वारकऱ्यांचा अपमान करत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला हे त्यांना माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हे सरकारसाठी पूजनीय आहेत. या संदर्भात राजकारण केल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे फडणवीस म्हणाले.

सरकारचे लव्हासा करायचे नाहीविरोधकांनी सरकारला खोके सरकार म्हटले. मात्र अजित पवारांची भाषा असंसदीय आहे. आता ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ असे प्रकार होत नाही. आम्हाला सरकारचे ‘लव्हासा’ करायचे नाही. महाविकास आघाडीने केलेले प्रकार उघड झाल्यास खोक्याचे उंच शिखर होईल व ते त्यावरून खाली पडतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

चार आठवड्यांचे अधिवेशन घेण्याची तयारीतीन आठवड्यांचे अधिवेशन घेण्याच्या विरोधकांच्या मागणीवर फडणवीस म्हणाले की, विरोधकांना नागपूरचे वातावरण आवडत असेल तर सरकार चार आठवड्यांचे अधिवेशन घेण्यासही तयार आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या प्रश्नांना न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.

शिवसेना की ‘नॅनो’सेना ?दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेचा (उद्धव ठाकरे गट) उल्लेख ‘नॅनो’सेना असा केला. विधीमंडळात शिवसेनेचे कार्यालय कुणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरू असताना त्यांनी कोणती शिवसेना म्हणायची आहे, असा उल्लेख करत ‘नॅनो’सेना असे म्हटले.

टॅग्स :nagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना