शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांचा अपमान, सीमाप्रश्नावर हिवाळी अधिवेशन तापणार; पुर्वसंध्येलाच आरोप-प्रत्यारोपांचे सत्र

By योगेश पांडे | Updated: December 18, 2022 23:06 IST

विरोधक-सत्ताधारी आमनेसामने, पहिला दिवस गोंधळाचाच ठरण्याची चिन्हे

 

नागपूर: तीन वर्षांच्या कालावधीनंतर नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन चांगलेच तापणार असल्याची चिन्हे आहेत. महापुरुषांचा अपमान आणि सीमाप्रश्न या मुद्द्यांवर विरोधक व सत्ताधारी आमनेसामने आले असून सभागृहामध्येदेखील याचे पडसाद उमटणार आहेत. अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला विरोधकांनी केलेल्या आरोपांवर सभागृहात आकडेवारीसह उत्तरे देऊ अशी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतल्याने पहिला दिवस गोंधळाचाच ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विरोधकांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी रविवारी पत्रपरिषदेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. विरोधकांचे आरोप पद्धतशीरपणे फेटाळून लावत त्यांनी सभागृहात आकडेवारी मांडून विदर्भाचा अनुशेष कोणी वाढवला हे सांगितले जाईल, असे जाहीर केले. तर महापुरुषांबाबत बोलण्याचा महाविकासआघाडीला अधिकारच नसल्याचा दावा केला. हे खोके किंवा स्थगिती सरकार नसून कायदेशीर आणि बहुमताचे सरकार आहे. २०१९ चे सरकार अनैतिक होते. सोयरिक एकाशी, घरोबा दुसऱ्याशी केली होती. मागच्या सरकारमध्ये विदर्भातील मंत्र्यांनी, आमदारांनी नागपुरात अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. पण कोविडचे कारण देऊन नागपूरमध्ये अधिवेशन घेण्याचं टाळण्यात आले. हे अजितदादांनाही माहिती आहे. त्यामुळे ते त्यावर फारसे बोलणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

आता विदर्भाचा कळवळा कसा ?२०१९-२० मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात विदर्भातील ७ जिल्ह्यांच्या ‘डीपीसी’च्या निधीत कपात करण्यात आली होती. तेव्हापासूनच अन्यायाची शृंखला सुरू झाली. कोरोनाच्या नावावर ज्यांनी नागपुरात अडीच वर्षांत एकही अधिवेशन घेतले नाही, त्यांना आता विदर्भाचा कळवला कसा आला असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. विदर्भाचा अनुशेष कुणी व कसा वाढविला याचे आकडेच सभागृहात मांडू असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांना महापुरुषांवर बोलण्याचा अधिकार नाहीफडणवीस यांनी महापुरुषांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधकांना यासंदर्भात बोलण्याचा अधिकार नसल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्षाचे नेते वारकऱ्यांचा अपमान करत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला हे त्यांना माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हे सरकारसाठी पूजनीय आहेत. या संदर्भात राजकारण केल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे फडणवीस म्हणाले.

सरकारचे लव्हासा करायचे नाहीविरोधकांनी सरकारला खोके सरकार म्हटले. मात्र अजित पवारांची भाषा असंसदीय आहे. आता ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ असे प्रकार होत नाही. आम्हाला सरकारचे ‘लव्हासा’ करायचे नाही. महाविकास आघाडीने केलेले प्रकार उघड झाल्यास खोक्याचे उंच शिखर होईल व ते त्यावरून खाली पडतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

चार आठवड्यांचे अधिवेशन घेण्याची तयारीतीन आठवड्यांचे अधिवेशन घेण्याच्या विरोधकांच्या मागणीवर फडणवीस म्हणाले की, विरोधकांना नागपूरचे वातावरण आवडत असेल तर सरकार चार आठवड्यांचे अधिवेशन घेण्यासही तयार आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या प्रश्नांना न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.

शिवसेना की ‘नॅनो’सेना ?दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेचा (उद्धव ठाकरे गट) उल्लेख ‘नॅनो’सेना असा केला. विधीमंडळात शिवसेनेचे कार्यालय कुणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरू असताना त्यांनी कोणती शिवसेना म्हणायची आहे, असा उल्लेख करत ‘नॅनो’सेना असे म्हटले.

टॅग्स :nagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना