शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

महापुरुषांचा अपमान, सीमाप्रश्नावर हिवाळी अधिवेशन तापणार; पुर्वसंध्येलाच आरोप-प्रत्यारोपांचे सत्र

By योगेश पांडे | Updated: December 18, 2022 23:06 IST

विरोधक-सत्ताधारी आमनेसामने, पहिला दिवस गोंधळाचाच ठरण्याची चिन्हे

 

नागपूर: तीन वर्षांच्या कालावधीनंतर नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन चांगलेच तापणार असल्याची चिन्हे आहेत. महापुरुषांचा अपमान आणि सीमाप्रश्न या मुद्द्यांवर विरोधक व सत्ताधारी आमनेसामने आले असून सभागृहामध्येदेखील याचे पडसाद उमटणार आहेत. अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला विरोधकांनी केलेल्या आरोपांवर सभागृहात आकडेवारीसह उत्तरे देऊ अशी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतल्याने पहिला दिवस गोंधळाचाच ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विरोधकांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी रविवारी पत्रपरिषदेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. विरोधकांचे आरोप पद्धतशीरपणे फेटाळून लावत त्यांनी सभागृहात आकडेवारी मांडून विदर्भाचा अनुशेष कोणी वाढवला हे सांगितले जाईल, असे जाहीर केले. तर महापुरुषांबाबत बोलण्याचा महाविकासआघाडीला अधिकारच नसल्याचा दावा केला. हे खोके किंवा स्थगिती सरकार नसून कायदेशीर आणि बहुमताचे सरकार आहे. २०१९ चे सरकार अनैतिक होते. सोयरिक एकाशी, घरोबा दुसऱ्याशी केली होती. मागच्या सरकारमध्ये विदर्भातील मंत्र्यांनी, आमदारांनी नागपुरात अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. पण कोविडचे कारण देऊन नागपूरमध्ये अधिवेशन घेण्याचं टाळण्यात आले. हे अजितदादांनाही माहिती आहे. त्यामुळे ते त्यावर फारसे बोलणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

आता विदर्भाचा कळवळा कसा ?२०१९-२० मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात विदर्भातील ७ जिल्ह्यांच्या ‘डीपीसी’च्या निधीत कपात करण्यात आली होती. तेव्हापासूनच अन्यायाची शृंखला सुरू झाली. कोरोनाच्या नावावर ज्यांनी नागपुरात अडीच वर्षांत एकही अधिवेशन घेतले नाही, त्यांना आता विदर्भाचा कळवला कसा आला असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. विदर्भाचा अनुशेष कुणी व कसा वाढविला याचे आकडेच सभागृहात मांडू असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांना महापुरुषांवर बोलण्याचा अधिकार नाहीफडणवीस यांनी महापुरुषांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधकांना यासंदर्भात बोलण्याचा अधिकार नसल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्षाचे नेते वारकऱ्यांचा अपमान करत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला हे त्यांना माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हे सरकारसाठी पूजनीय आहेत. या संदर्भात राजकारण केल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे फडणवीस म्हणाले.

सरकारचे लव्हासा करायचे नाहीविरोधकांनी सरकारला खोके सरकार म्हटले. मात्र अजित पवारांची भाषा असंसदीय आहे. आता ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ असे प्रकार होत नाही. आम्हाला सरकारचे ‘लव्हासा’ करायचे नाही. महाविकास आघाडीने केलेले प्रकार उघड झाल्यास खोक्याचे उंच शिखर होईल व ते त्यावरून खाली पडतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

चार आठवड्यांचे अधिवेशन घेण्याची तयारीतीन आठवड्यांचे अधिवेशन घेण्याच्या विरोधकांच्या मागणीवर फडणवीस म्हणाले की, विरोधकांना नागपूरचे वातावरण आवडत असेल तर सरकार चार आठवड्यांचे अधिवेशन घेण्यासही तयार आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या प्रश्नांना न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.

शिवसेना की ‘नॅनो’सेना ?दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेचा (उद्धव ठाकरे गट) उल्लेख ‘नॅनो’सेना असा केला. विधीमंडळात शिवसेनेचे कार्यालय कुणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरू असताना त्यांनी कोणती शिवसेना म्हणायची आहे, असा उल्लेख करत ‘नॅनो’सेना असे म्हटले.

टॅग्स :nagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना