शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पावसानं रडवलं, पीक सडवलं; ३५.२२ लाख हेक्टर शेती पाण्याखाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 09:49 IST

अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापसाला सर्वाधिक फटका 

सुनील चरपे  नागपूर : मुसळधार व अति मुसळधार पावसामुळे, तसेच पुरामुळे जून ते १७ ऑक्टाेबर या काळात राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३८ लाख ४४ हजार ८२६ पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे ३५,२१,८६८.४९ हेक्टरमधील विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक हातचे गेल्याने शेतकरी  हेलावून गेला आहे. सर्वाधिक फटका कापूस व साेयाबीनच्या पिकाला बसला असून, फळबागा आणि भाजीपाल्याच्या पिकांचेही माेठे नुकसान झाले आहे. जून ते ३१ ऑगस्ट या काळातील भरपाईसाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे ४,६३४.४६ काेटींची मागणी केली आहे. 

काही जिल्ह्यांत गाेगलगायींचा प्रादुर्भाव झाला हाेता. यात बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांसाेबत नागपूर व अमरावती जिल्ह्यांचाही समावेश आहे. नुकसानीचे सर्वेक्षण करताना बीडच्या  १२,९५८ शेतकऱ्यांचे ३,८२२.३५ हेक्टर, लातूरमधील १,०८,६३६ शेतकऱ्यांचे ६८,३८५ हेक्टर तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ४०१ शेतकऱ्यांचे २८३.३३ हेक्टरमधील नुकसान झाल्याचे दाखविले आहे. बीड जिल्ह्यासाठी ५१९.८४ लाख, लातूरसाठी ९,३००.३६ लाख व उस्मानाबादसाठी ३८.६० लाखांची कृषी विभागाने मागणी केली. 

तातडीने पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देशअतिवृष्टी झालेल्या भागात तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले. सततच्या पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला असून, पावसामुळे मागील दोन ते तीन दिवसांत शेतीचे जे नुकसान झाले, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जून ते ऑगस्ट या काळातील नुकसानजून ते ३१ ऑगस्ट या काळात ३४ जिल्ह्यांमधील ३८,४४,८२६ शेतकऱ्यांचे ३१,७१,३३८.४९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. भरपाईसाठी ४,५३,५८८.८० लाखांची सरकारकडे मागणी केली आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे ३०,१६,४४२ शेतकऱ्यांच्या २६,२१,६९२.१६ हेक्टरमधील तर पावसामुळे ८,२८,३८४ शेतकऱ्यांच्या ५,४९,६४६.३३ हेक्टर पीक नुकसानीचा समावेश आहे. भरपाईसाठी ३,७८,०१९ लाख तर पावसाने झालेल्या भरपाईसाठी ७५,५६९.४३ लाखांची मागणी केली आहे.

सप्टेंबर व ऑक्टाेबरमधील नुकसान१ ते ३० सप्टेंबर काळात पावसामुळे १२ जिल्ह्यांमधील ५२ तालुक्यांतील २,३७,४३४ हेक्टरमधील तर १ ते १७ ऑक्टाेबर या काळात १६ जिल्ह्यांमधील ५२ तालुक्यांमधील १,१३,०९१ हेक्टरमधील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान कापूस, साेयाबीन, मका या पिकांसह संत्रा, माेसंबी व केळी या फळपिकांचे झाले आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी