शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साठ्याच्या मर्यादेमुळे तूर व डाळीचे दर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2023 20:51 IST

Nagpur News यंदा देशातील उत्पादनात मोठी घट झाली, पण मागणी कायम आहे. त्यामुळे दरात मोठी तेजी आली. केंद्र सरकारने दरावर नियंत्रण आणण्यासाठी वितरक व व्यापाऱ्यांवर साठ्याची मर्यादा आणल्यामुळे तूर आणि तूर डाळीचे दर काही प्रमाणात उतरले आहेत.

नागपूर : देशात मागील काही वर्षांपासून तूर डाळीचा वापर वाढला. सर्वसामान्यांच्या ताटातील पौष्टिक खाद्यपदार्थ म्हणून या डाळीकडे पाहिले जाते. यंदा देशातील उत्पादनात मोठी घट झाली, पण मागणी कायम आहे. त्यामुळे दरात मोठी तेजी आली. केंद्र सरकारने दरावर नियंत्रण आणण्यासाठी वितरक व व्यापाऱ्यांवर साठ्याची मर्यादा आणल्यामुळे तूर आणि तूर डाळीचे दर काही प्रमाणात उतरले आहेत.

गेल्यावर्षी तूर डाळीचे दर दर्जानुसार ८५ ते ९८ रुपये किलो होते. यंदा दरात १५ टक्क्यांपेक्षा अधिक भाववाढ झालेली आहे. आता भाव १०९ ते १२४ रुपये असून आठवड्यापूर्वी भाव ११३ ते १२९ रुपये किलो होते. दरवाढीला कृत्रिम टंचाईचा गंध आहे. सरकारने वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर तूर डाळीचे भाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. केंद्राच्या आदेशानंतर प्रत्येक राज्य सरकारने डाळींचा काळाबाजार थांबविण्यासाठी आणि किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

तूरीवर आयात शुल्क शून्य!मोदी सरकारने संपूर्ण तूर डाळीवर १० टक्के आयात शुल्क लागू केले होते. आता हे शुल्क पूर्णपणे समाप्त करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने तूर डाळीवरील आयात शुल्क हटविण्याचे आदेश ३ मार्च २०२३ रोजी दिले. हे आदेश ४ मार्चपासून लागू झाले आहेत. त्यामुळे डाळीचे दर १५० रुपयांपर्यंत वाढण्याचे व्यापाऱ्यांचे संकेत फोल ठरले आहेत. शून्य आयात शुल्कामुळे तूर डाळीच्या दरवाढीवर नियंत्रण आणि भाव घसरल्याने महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

उत्पादन कमी; आयातही कमीचनागपुरात २५० पेक्षा जास्त दालमील असून उत्पादनासाठी तूरीची आवश्यकता असते. एरवी या दिवसांत व्यापाऱ्यांना गरजेपेक्षा जास्त तूर उपलब्ध असते. सध्या व्यापाऱ्यांना पुरेशी तूर मिळत नसल्यामुळे काही मील बंद पडल्या आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नागपूर, लातूर, सोलापूर, जालना आणि अकोला तसेच कर्नाटकातील प्रमुख बाजारांतही तुरीची आवक खूपच कमी आहे. कळमना धान्य अडतिया असोसिएशनचे कमलाकर घाटोळे म्हणाले, सध्या तूरीचे दर दर्जानुसार ७७ ते ८४ रुपये किलो आहेत. आठवड्यापासून भाव ३ ते ४ रुपयांनी कमी झाले. आवक कमीच आहे. दररोज १६०० ते १८०० क्विंटल तूर येत आहे. गेल्यावर्षी याच काळात दररोज ४ हजार क्विंटलहून अधिक आवक होती.

टॅग्स :foodअन्न