शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

साठ्याच्या मर्यादेमुळे तूर व डाळीचे दर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2023 20:51 IST

Nagpur News यंदा देशातील उत्पादनात मोठी घट झाली, पण मागणी कायम आहे. त्यामुळे दरात मोठी तेजी आली. केंद्र सरकारने दरावर नियंत्रण आणण्यासाठी वितरक व व्यापाऱ्यांवर साठ्याची मर्यादा आणल्यामुळे तूर आणि तूर डाळीचे दर काही प्रमाणात उतरले आहेत.

नागपूर : देशात मागील काही वर्षांपासून तूर डाळीचा वापर वाढला. सर्वसामान्यांच्या ताटातील पौष्टिक खाद्यपदार्थ म्हणून या डाळीकडे पाहिले जाते. यंदा देशातील उत्पादनात मोठी घट झाली, पण मागणी कायम आहे. त्यामुळे दरात मोठी तेजी आली. केंद्र सरकारने दरावर नियंत्रण आणण्यासाठी वितरक व व्यापाऱ्यांवर साठ्याची मर्यादा आणल्यामुळे तूर आणि तूर डाळीचे दर काही प्रमाणात उतरले आहेत.

गेल्यावर्षी तूर डाळीचे दर दर्जानुसार ८५ ते ९८ रुपये किलो होते. यंदा दरात १५ टक्क्यांपेक्षा अधिक भाववाढ झालेली आहे. आता भाव १०९ ते १२४ रुपये असून आठवड्यापूर्वी भाव ११३ ते १२९ रुपये किलो होते. दरवाढीला कृत्रिम टंचाईचा गंध आहे. सरकारने वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर तूर डाळीचे भाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. केंद्राच्या आदेशानंतर प्रत्येक राज्य सरकारने डाळींचा काळाबाजार थांबविण्यासाठी आणि किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

तूरीवर आयात शुल्क शून्य!मोदी सरकारने संपूर्ण तूर डाळीवर १० टक्के आयात शुल्क लागू केले होते. आता हे शुल्क पूर्णपणे समाप्त करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने तूर डाळीवरील आयात शुल्क हटविण्याचे आदेश ३ मार्च २०२३ रोजी दिले. हे आदेश ४ मार्चपासून लागू झाले आहेत. त्यामुळे डाळीचे दर १५० रुपयांपर्यंत वाढण्याचे व्यापाऱ्यांचे संकेत फोल ठरले आहेत. शून्य आयात शुल्कामुळे तूर डाळीच्या दरवाढीवर नियंत्रण आणि भाव घसरल्याने महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

उत्पादन कमी; आयातही कमीचनागपुरात २५० पेक्षा जास्त दालमील असून उत्पादनासाठी तूरीची आवश्यकता असते. एरवी या दिवसांत व्यापाऱ्यांना गरजेपेक्षा जास्त तूर उपलब्ध असते. सध्या व्यापाऱ्यांना पुरेशी तूर मिळत नसल्यामुळे काही मील बंद पडल्या आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नागपूर, लातूर, सोलापूर, जालना आणि अकोला तसेच कर्नाटकातील प्रमुख बाजारांतही तुरीची आवक खूपच कमी आहे. कळमना धान्य अडतिया असोसिएशनचे कमलाकर घाटोळे म्हणाले, सध्या तूरीचे दर दर्जानुसार ७७ ते ८४ रुपये किलो आहेत. आठवड्यापासून भाव ३ ते ४ रुपयांनी कमी झाले. आवक कमीच आहे. दररोज १६०० ते १८०० क्विंटल तूर येत आहे. गेल्यावर्षी याच काळात दररोज ४ हजार क्विंटलहून अधिक आवक होती.

टॅग्स :foodअन्न