शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

साठ्याच्या मर्यादेमुळे तूर व डाळीचे दर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2023 20:51 IST

Nagpur News यंदा देशातील उत्पादनात मोठी घट झाली, पण मागणी कायम आहे. त्यामुळे दरात मोठी तेजी आली. केंद्र सरकारने दरावर नियंत्रण आणण्यासाठी वितरक व व्यापाऱ्यांवर साठ्याची मर्यादा आणल्यामुळे तूर आणि तूर डाळीचे दर काही प्रमाणात उतरले आहेत.

नागपूर : देशात मागील काही वर्षांपासून तूर डाळीचा वापर वाढला. सर्वसामान्यांच्या ताटातील पौष्टिक खाद्यपदार्थ म्हणून या डाळीकडे पाहिले जाते. यंदा देशातील उत्पादनात मोठी घट झाली, पण मागणी कायम आहे. त्यामुळे दरात मोठी तेजी आली. केंद्र सरकारने दरावर नियंत्रण आणण्यासाठी वितरक व व्यापाऱ्यांवर साठ्याची मर्यादा आणल्यामुळे तूर आणि तूर डाळीचे दर काही प्रमाणात उतरले आहेत.

गेल्यावर्षी तूर डाळीचे दर दर्जानुसार ८५ ते ९८ रुपये किलो होते. यंदा दरात १५ टक्क्यांपेक्षा अधिक भाववाढ झालेली आहे. आता भाव १०९ ते १२४ रुपये असून आठवड्यापूर्वी भाव ११३ ते १२९ रुपये किलो होते. दरवाढीला कृत्रिम टंचाईचा गंध आहे. सरकारने वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर तूर डाळीचे भाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. केंद्राच्या आदेशानंतर प्रत्येक राज्य सरकारने डाळींचा काळाबाजार थांबविण्यासाठी आणि किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

तूरीवर आयात शुल्क शून्य!मोदी सरकारने संपूर्ण तूर डाळीवर १० टक्के आयात शुल्क लागू केले होते. आता हे शुल्क पूर्णपणे समाप्त करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने तूर डाळीवरील आयात शुल्क हटविण्याचे आदेश ३ मार्च २०२३ रोजी दिले. हे आदेश ४ मार्चपासून लागू झाले आहेत. त्यामुळे डाळीचे दर १५० रुपयांपर्यंत वाढण्याचे व्यापाऱ्यांचे संकेत फोल ठरले आहेत. शून्य आयात शुल्कामुळे तूर डाळीच्या दरवाढीवर नियंत्रण आणि भाव घसरल्याने महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

उत्पादन कमी; आयातही कमीचनागपुरात २५० पेक्षा जास्त दालमील असून उत्पादनासाठी तूरीची आवश्यकता असते. एरवी या दिवसांत व्यापाऱ्यांना गरजेपेक्षा जास्त तूर उपलब्ध असते. सध्या व्यापाऱ्यांना पुरेशी तूर मिळत नसल्यामुळे काही मील बंद पडल्या आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नागपूर, लातूर, सोलापूर, जालना आणि अकोला तसेच कर्नाटकातील प्रमुख बाजारांतही तुरीची आवक खूपच कमी आहे. कळमना धान्य अडतिया असोसिएशनचे कमलाकर घाटोळे म्हणाले, सध्या तूरीचे दर दर्जानुसार ७७ ते ८४ रुपये किलो आहेत. आठवड्यापासून भाव ३ ते ४ रुपयांनी कमी झाले. आवक कमीच आहे. दररोज १६०० ते १८०० क्विंटल तूर येत आहे. गेल्यावर्षी याच काळात दररोज ४ हजार क्विंटलहून अधिक आवक होती.

टॅग्स :foodअन्न