शहरं
Join us  
Trending Stories
1
महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
3
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
4
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
5
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
6
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
7
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
8
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
9
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
10
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
11
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
12
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
13
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
14
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
15
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
16
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
17
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
18
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
19
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
20
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

...तर विदर्भातील वाघांची संख्या ४०० पार जाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 11:59 IST

२०२२ च्या गणनेनुसार देशात ३०८० वाघ : मध्य भारतात संख्या वाढल्याचा दावा

नागपूर : देशात व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नांना आलेले यश २०२२ च्या व्याघ्रगणनेत पुन्हा एकदा अधाेरेखित हाेत आहे. २०१८ मध्ये ते २९६७ हाेते. कॅमेरा ट्रॅपमध्ये २०२२ च्या गणनेत ही संख्या ३०८० माेजण्यात आली; पण ही संख्या ३१६७ पर्यंत असण्याचा अंदाज आहे. या अहवालात राज्यनिहाय आकडेवारी दिली नसली तरी महाराष्ट्रात वाघांची संख्या ४०० पार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि यात विदर्भाचा वाटा माेठा आहे.

२०१८ च्या गणनेत राज्यात वाघांची संख्या ३१२ वर हाेती आणि इतर राज्याच्या तुलनेत मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंडनंतर महाराष्ट्र चाैथ्या क्रमांकावर हाेता. नव्या अहवालानुसार चार वर्षांत मध्य भारतातील वनक्षेत्रात वाघांची संख्या वाढल्याचा दावा केला जात आहे. त्यानुसार राज्यात ३७५ वाघ असण्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र केंद्रीय आकडेवारीशी विदर्भातील व्याघ्र अभ्यासक सहमत नाही. अहवालातील माहिती अपूर्ण आहे, मात्र हे आकडे केवळ वनक्षेत्रातील कॅमेरा ट्रॅपच्या आधारावरचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. प्रत्यक्ष केवळ विदर्भातच ४०० हून अधिक वाघ असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातच ३०० हून अधिक वाघ

पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चाेपणे यांनी सांगितले, २०२० मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनात ताडाेबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची गणना करण्यात आली. यामध्ये २५० च्या जवळपास वाघ असल्याचे आढळून आले हाेते. हा केवळ वनक्षेत्रातील आकडा आहे. वनक्षेत्राबाहेर व जिल्ह्यात ३००हून अधिक वाघ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या वाघांची गणनाच हाेत नाही. ताडाेबातील वाघ गडचिराेली जिल्ह्यातही स्थलांतरित झाल्याचा अंदाज आहे.

उर्वरित क्षेत्रात सव्वाशे ते दीडशे वाघ

पेंच व्याघ्र प्रकल्पातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पेंच प्रकल्पात ४८ ते ५२ वाघ असण्याची शक्यता आहे. याशिवाय मेळघाटात ४७ ते ५० वाघ, नवेगाव-नागझिऱ्यात १० ते १२ वाघ, उमरेड-कऱ्हांडलात १० ते १२ वाघ, बाेर प्रकल्पात १० ते १५ वाघ, गडचिराेलीत १८ ते २० वाघ आणि सह्याद्री क्षेत्रात ५ ते ८ वाघ असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कॅमेरा ट्रॅपद्वारे वनक्षेत्रातील वाघांची गणना केली जाते; पण बाहेर पडणाऱ्या वाघांची गणना हाेत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात गणनेपेक्षा अधिक वाघ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या केंद्रीय प्राधिकरणाचा अधिकृत आकडा आल्याशिवाय अचूक संख्या सांगता येणार नाही.

- बंडू धाेत्रे, वन अभ्यासक

टॅग्स :TigerवाघVidarbhaविदर्भforest departmentवनविभाग