शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

...तर विदर्भातील वाघांची संख्या ४०० पार जाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 11:59 IST

२०२२ च्या गणनेनुसार देशात ३०८० वाघ : मध्य भारतात संख्या वाढल्याचा दावा

नागपूर : देशात व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नांना आलेले यश २०२२ च्या व्याघ्रगणनेत पुन्हा एकदा अधाेरेखित हाेत आहे. २०१८ मध्ये ते २९६७ हाेते. कॅमेरा ट्रॅपमध्ये २०२२ च्या गणनेत ही संख्या ३०८० माेजण्यात आली; पण ही संख्या ३१६७ पर्यंत असण्याचा अंदाज आहे. या अहवालात राज्यनिहाय आकडेवारी दिली नसली तरी महाराष्ट्रात वाघांची संख्या ४०० पार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि यात विदर्भाचा वाटा माेठा आहे.

२०१८ च्या गणनेत राज्यात वाघांची संख्या ३१२ वर हाेती आणि इतर राज्याच्या तुलनेत मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंडनंतर महाराष्ट्र चाैथ्या क्रमांकावर हाेता. नव्या अहवालानुसार चार वर्षांत मध्य भारतातील वनक्षेत्रात वाघांची संख्या वाढल्याचा दावा केला जात आहे. त्यानुसार राज्यात ३७५ वाघ असण्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र केंद्रीय आकडेवारीशी विदर्भातील व्याघ्र अभ्यासक सहमत नाही. अहवालातील माहिती अपूर्ण आहे, मात्र हे आकडे केवळ वनक्षेत्रातील कॅमेरा ट्रॅपच्या आधारावरचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. प्रत्यक्ष केवळ विदर्भातच ४०० हून अधिक वाघ असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातच ३०० हून अधिक वाघ

पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चाेपणे यांनी सांगितले, २०२० मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनात ताडाेबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची गणना करण्यात आली. यामध्ये २५० च्या जवळपास वाघ असल्याचे आढळून आले हाेते. हा केवळ वनक्षेत्रातील आकडा आहे. वनक्षेत्राबाहेर व जिल्ह्यात ३००हून अधिक वाघ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या वाघांची गणनाच हाेत नाही. ताडाेबातील वाघ गडचिराेली जिल्ह्यातही स्थलांतरित झाल्याचा अंदाज आहे.

उर्वरित क्षेत्रात सव्वाशे ते दीडशे वाघ

पेंच व्याघ्र प्रकल्पातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पेंच प्रकल्पात ४८ ते ५२ वाघ असण्याची शक्यता आहे. याशिवाय मेळघाटात ४७ ते ५० वाघ, नवेगाव-नागझिऱ्यात १० ते १२ वाघ, उमरेड-कऱ्हांडलात १० ते १२ वाघ, बाेर प्रकल्पात १० ते १५ वाघ, गडचिराेलीत १८ ते २० वाघ आणि सह्याद्री क्षेत्रात ५ ते ८ वाघ असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कॅमेरा ट्रॅपद्वारे वनक्षेत्रातील वाघांची गणना केली जाते; पण बाहेर पडणाऱ्या वाघांची गणना हाेत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात गणनेपेक्षा अधिक वाघ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या केंद्रीय प्राधिकरणाचा अधिकृत आकडा आल्याशिवाय अचूक संख्या सांगता येणार नाही.

- बंडू धाेत्रे, वन अभ्यासक

टॅग्स :TigerवाघVidarbhaविदर्भforest departmentवनविभाग