शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाने खासगी जमीन स्वतःची समजून रेल्वेला दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 11:15 IST

पीडित शेतकऱ्यांचा आरोप: हायकोर्टात धाव

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वन विभागाने यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यामधील सेवानगर येथील खासगी जमीन स्वतःची समजून रेल्वे विभागाला दिली, असा आरोप करीत दोन पीडित शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने रेल्वे विकास निगम, वन विभाग, जिल्हाधिकारी व इतर संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावून यावर येत्या ४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर मागितले आहे. तसेच, रेल्वे विभागाने वन विभागाला जमिनीच्या भरपाईपोटी दिलेली रक्कम जैसे थे ठेवा, असे निर्देश दिले आहेत.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उत्तम जाधव व श्यामराव राठोड अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत. वर्धा ते नांदेडपर्यंत ब्रॉडगेज रेल्वे लाईन टाकली जात आहे. त्यासाठी वन विभागाने याचिकाकर्त्यांची जमीन रेल्वेला दिली आहे. 

यासंदर्भात ३ जुलै, २०२३ रोजी आदेश जारी केला गेला आहे. ही जमीन आरक्षित वन जमीन असल्याचे आदेशात नमूद केले आहे. याशिवाय, या जमिनीचे आरक्षण रद्द करण्यासाठी सक्षम विभागाला प्रस्तावही सादर केला आहे. त्याविरुद्ध याचिकाकर्त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना तक्रार केली, पण त्याची दखल घेण्यात आली नाही, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. रेणुका सिरपूरकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :forest departmentवनविभागFarmerशेतकरीnagpurनागपूर