शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठरावावेळी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव साधेच होते; रोहित पवार असं का म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 12:40 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक सरकारविरुद्ध सीमाप्रश्नी ठराव मांडला, तो मंजूरही झाला

नागपूर - कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील ३६ गावांवर दावा केला होता, हा मुद्दा आता हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजला. गेल्या दोन दिवसापासून अधिवेशनात विरोधी पक्षातील सदस्यांनी कर्नाटक विरोधातील ठराव आणण्याची मागणी केली होती. मंगळवारी हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने संमत करण्यात आला. मात्र, विरोधी पक्षांनी या ठरावात दम नसल्याचे म्हटले. आता, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ठराव संमत करतेवेळी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव साधेच होते, असे म्हटले आहे. तर, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर बोट ठेवले आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक सरकारविरुद्ध सीमाप्रश्नी ठराव मांडला, तो मंजूरही झाला. मात्र, ठराव मांडताना मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचे जे हाव भाव होते, ते अतिशय साधे होते. त्यांना तो ठराव अधिक आक्रमकपणे मांडता आला असता. पण, मुख्यमंत्र्यांकडे ती आक्रमता दिसून आली नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले. आपण ठराव मांडल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक होतात, पण आपण आक्रमक होऊ शकत नाही यामागचे कारण काय. म्हणजे अप्रत्यक्षपणे कर्नाटकमध्ये भाजप निवडून यावी, यासाठीच प्रयत्न करतोय का, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला. 

अधिकाऱ्यांचे निलंबन चुकीचे

आक्रमकता कशासाठी असावी हेही रोहित पवार यांनी सांगितले. महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राच्या विरोधात, महाराष्ट्राच्या लोकांच्या विरोधात कोण बोलत असेल तर आम्ही शांत बसणार नाहीत, असा संदेश आपल्या आक्रमक भूमिकेतून जात असतो, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच, कर्जत-जामखेड मतदारसंघातील तहसिलदार आणि प्रांत अधिकारी यांचे निलंबन केल्यावरही रोहित पवार यांनी भाष्य केलं. याच अधिकाऱ्यांनी गेल्या २ वर्षात चांगलं काम केलं. लाखो लोकांना मदतही त्यांच्यामुळेच मिळाली. केवळ मला अडचणीत आणण्यासाठी हा निर्णय घाईघाईने घेतला असून तो चुकीचा असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं. 

टॅग्स :nagpurनागपूरRohit Pawarरोहित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे