शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

काऊंटडाऊन सुरू, उमेदवारांची धाकधूक वाढली

By कमलेश वानखेडे | Updated: May 24, 2024 18:28 IST

गडकरी - पारवे विजयाबद्दल आश्वस्त : ठाकरे, बर्वेंना परिवर्तनाची खात्री

नागपूर : लोकसभा निवणुकीच्या निकालाचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. आजपासून दहा दिवसांनी नागपूर व रामटेकचा खासदार कोण याचा फैसला होणार आहे. मतमोजणी जसजसी जवळ येत आहे तसतशी उमेदवारांसह समर्थकांमध्ये धाकधूक वाढली आहे. भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह रामटेकचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे हे विजयाबद्दल आस्वस्त आहेत. तर नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार आ. विकास ठाकरे यांच्यासह रामटेकचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना यावेळी निश्चित परिवर्तन घडेल, याची खात्री आहे.

नितीन गडकरी यांच्या उमेदवारीमुळे नागपूरच्या लढतीकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष आहे. आ. विकास ठाकरे यांच्या रुपात जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांने काँग्रेसचा किल्ला लढवला. नागपूरकर विकासाला पावती देतील. गडकरी हे गेल्यावेळपेक्षा जास्त मतांनी जिंकतील, असा दावा भाजपकडून केला जात आहे. तर ठाकरे समर्थकही जोशात आहे. यावेळी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजप विषयी नाराजी होती. मतदार शांत दिसत होता पण आतून धग कायम होती. त्यामुळे बाजी पलटेल व विकास ठाकरे बाजी मारतील, असा काँग्रेसजणांना विश्वास आहे.

मतदानानंतरचा पहिला आठवडा नेत्यांसह मतदारही शांत होते. पण दुसऱ्या आठवड्यात विजयाची समीकरणे मांडणे सुरू झाली. भाजप कार्यकर्ते सुरुवातीला काहीसे बॅकफूटवर दिसत होते. क्लोज फाईट होईल, असे दबक्या आवाजात मान्यही करीत होते. दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्ते खूप जोशात दिसत होते. या आठवड्यात भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांचा कॉन्फीडन्स वाढलेला दिसला. आता भाजपकडून गडकरी दोन लाखांवर मतांनी जिंकतील, असा दावा केला जात आहे. भाजपचा हा दावा काँग्रेसच्या पचनी पडलेला नाही. यावेळी काँग्रेस नेते एकसंघ होते, कार्यकर्ते गल्लोगल्लीत सक्रीय होते. उत्साहाने बूथवर होते. मतदान काढत होते. त्यामुळे परिवर्तन घडेल, ठाकरे नक्कीच विजयी होतील यावर काँग्रेसजण ठाम आहेत.

पारवे- बर्वे समर्थक आक्रमकरामटेक मतदारसंघात एकामागून एक पोलिटिकल ड्रामा घडत गेला. तसतसी येथील निवडणूक आक्रमक होत गेली. मतदान तर शांततेत आटोपले पण दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांचा जोश आणि रोष अद्याप शांत झालेला नाही. रामटेकमध्ये यावेळीही राजू पारवे हेच भगवा फडकवतील, असा दावा भाजप-शिंदेसेनेकडून केला जात आहे. पारवे हे किमान एक लाख मतांनी विजयी होतील, अशी मतदारसंघनिहाय समीकरणे मांडली जात आहेत. तर दुसरीकडे बर्वे यांचे कार्यकर्तेही तेवढ्यात ताकदीने यावेळी रामटेकचा गड काँग्रेसच सर करेल, असा दावा करीत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही कडील कार्यकर्ते आपला उमेदवार पराभूत होऊ शकतो, हे ऐकूण घेण्यासही तयार नाहीत. विजयांच्या दाव्यांवरून ग्रामीण भागात आता तर तू-तू मै-मै होऊ लागली आहे.

बूथनिहाय मतदानावरून बांधले अंदाजदोन्ही मतदारसंघातील उमेदवारांसह त्यांच्या पक्षांनी मतदानाचा बूथनिहाय आढावा घेतला. कोणत्या बूथवर किती मतदान झाले, गेल्यावेळी आपल्याला किती मते मिळाली, कोणत्या गावात आघाडी-पिछाडीवर राहू याची सर्व गोळाबेरीज करण्यात आली. बूथ स्तरावरील कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी, नेते यांचीही मते जाणून घेण्यात आली. या सर्वावरून विजयाचे अंदाज बाधले गेले आहेत. आता कुणाचे अंदाज सफल होतात आणि कुणाचे ‘हवा महल’ ठरतात, हे ४ जून रोजी मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४nagpurनागपूर