शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

कटऑफचा फटका; दहावीत ८५-९० टक्के गुण घेतले तरीही अद्याप अकरावीत प्रवेश नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 16:55 IST

Nagpur : अकरावी प्रवेशात गोंधळ कायम; विज्ञान शाखेतील विद्यार्थी चिंतित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय पद्धतीने अकरावी प्रवेशाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून दुसऱ्या फेरीत जेमतेम ९६५५ प्रवेश निश्चित झाले आहेत. विद्यार्थी संख्या कमी आणि जागा भरपूर असूनही दोन फेऱ्याअंती केवळ ३२ हजार प्रवेश झाले असून हजारो विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.

जिल्ह्यात तिन्ही शाखेच्या २०० च्या जवळपास ९८,७९५ महाविद्यालयात जागांसाठी यंदा केंद्रीय पद्धतीने अकरावी प्रवेश होत आहेत. यासाठी ४२ हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रवेशाची पहिली फेरी ३० जूनपासून सुरू झाली. पहिल्या फेरीत २२,५७४ प्रवेश निश्चित झाले. पुढे रखडलेल्या प्रक्रियेनंतर १८ जुलैपासून दुसरी फेरी सुरू झाली. दुसऱ्या फेरीसाठी २२०४० विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले होते.

जागा असून प्रवेश का रखडले?

  • ५० टक्के जागा रिक्त राहणार असूनही दोन फेन्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्यापही रखडलेले आहेत.
  • विशेषतः विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ 3 इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या अनियमिततेचा फटका बसत आहे. महाविद्यालयांच्या व्यवस्थापन कोट्यातून ६०, ७० टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याचे समोर येते.
  • मात्र, ८५ ते ९० टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडलेले आहेत. कटऑफ अधिक लागल्याने प्रवेश थांबल्याचे सांगितले जाते आहे. विद्यार्थ्यांनी निवडलेल्या महाविद्यालयात त्यांचे प्रवेश झाले नाहीत. या ना त्या कारणाने प्रवेशाचा खोळंबा होत आहे.

बार्टीच्या शिष्यवृत्तीला मुकावे लागणारअनुसूचित जाती/जमातीच्या आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, मेडिकलच्या अभ्यासासाठी बार्टीकडून शिष्यवृत्त देण्यात येते.यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश झालेल्या महाविद्यालयाचे बोनाफाइड प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेशच झालेले नसल्याने त्यांना महाविद्यालयाचे बोनाफाइड मिळाले नाही. त्यामुळे बार्टीच्या शिष्यवृत्तीपासून मुकावे लागणार, ही भीती विद्यार्थी व पालकांना सतावत आहे. 

टॅग्स :Admissionप्रवेश प्रक्रियाEducationशिक्षणnagpurनागपूर