शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
4
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
5
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
6
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
7
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
8
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
9
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
10
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
11
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
12
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
13
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
14
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
15
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
16
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
17
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
18
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
19
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
20
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट

कटऑफचा फटका; दहावीत ८५-९० टक्के गुण घेतले तरीही अद्याप अकरावीत प्रवेश नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 16:55 IST

Nagpur : अकरावी प्रवेशात गोंधळ कायम; विज्ञान शाखेतील विद्यार्थी चिंतित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय पद्धतीने अकरावी प्रवेशाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून दुसऱ्या फेरीत जेमतेम ९६५५ प्रवेश निश्चित झाले आहेत. विद्यार्थी संख्या कमी आणि जागा भरपूर असूनही दोन फेऱ्याअंती केवळ ३२ हजार प्रवेश झाले असून हजारो विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.

जिल्ह्यात तिन्ही शाखेच्या २०० च्या जवळपास ९८,७९५ महाविद्यालयात जागांसाठी यंदा केंद्रीय पद्धतीने अकरावी प्रवेश होत आहेत. यासाठी ४२ हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रवेशाची पहिली फेरी ३० जूनपासून सुरू झाली. पहिल्या फेरीत २२,५७४ प्रवेश निश्चित झाले. पुढे रखडलेल्या प्रक्रियेनंतर १८ जुलैपासून दुसरी फेरी सुरू झाली. दुसऱ्या फेरीसाठी २२०४० विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले होते.

जागा असून प्रवेश का रखडले?

  • ५० टक्के जागा रिक्त राहणार असूनही दोन फेन्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्यापही रखडलेले आहेत.
  • विशेषतः विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ 3 इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या अनियमिततेचा फटका बसत आहे. महाविद्यालयांच्या व्यवस्थापन कोट्यातून ६०, ७० टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याचे समोर येते.
  • मात्र, ८५ ते ९० टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडलेले आहेत. कटऑफ अधिक लागल्याने प्रवेश थांबल्याचे सांगितले जाते आहे. विद्यार्थ्यांनी निवडलेल्या महाविद्यालयात त्यांचे प्रवेश झाले नाहीत. या ना त्या कारणाने प्रवेशाचा खोळंबा होत आहे.

बार्टीच्या शिष्यवृत्तीला मुकावे लागणारअनुसूचित जाती/जमातीच्या आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, मेडिकलच्या अभ्यासासाठी बार्टीकडून शिष्यवृत्त देण्यात येते.यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश झालेल्या महाविद्यालयाचे बोनाफाइड प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेशच झालेले नसल्याने त्यांना महाविद्यालयाचे बोनाफाइड मिळाले नाही. त्यामुळे बार्टीच्या शिष्यवृत्तीपासून मुकावे लागणार, ही भीती विद्यार्थी व पालकांना सतावत आहे. 

टॅग्स :Admissionप्रवेश प्रक्रियाEducationशिक्षणnagpurनागपूर