शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

जोरात वाजताहे जीर्ण झालेल्या रेल्वे पुलांच्या खतऱ्याची घंटी; विकासकामांचा रेल्वे महाव्यवस्थापकांचा दावा फोल

By नरेश डोंगरे | Updated: November 27, 2022 22:29 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याचा दावा करून महाव्यवस्थापक मुंबईत पोहचत नाही तोच ईकडे बल्लारपूर रेल्वेस्थानकावरील ओव्हर ब्रीज कोसळला.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याचा दावा करून महाव्यवस्थापक मुंबईत पोहचत नाही तोच ईकडे बल्लारपूर रेल्वेस्थानकावरील ओव्हर ब्रीज कोसळला. त्यामुळे दुर्घटनेचे हादरे चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या रेल्वे प्रशासनाला बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर, ठिकठिकाणच्या जीर्ण झालेल्या रेल्वे पुलांच्या खतऱ्याची घंटी पुन्हा एकदा जोराने वाजू लागली आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी शुक्रवारी २५ नोव्हेंबरला नागपूर रेल्वे विभागातील इटारसी, बैतूल, आमला आणि परासिया क्षेत्रांत रेल्वे पूल, रेल्वे लाईन, सिग्नल सिस्टमचे निरीक्षण केले. नंतर गँगमनपासून तो वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांशी चर्चा करून त्यांनी या भागातील विकासकामांचा आढावा घेतला. काय कमी, काय जास्त, कोणत्या अडचणी त्याचीही माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.

दरम्यान, त्यांनी कालाखार घोडाडोंगरी रेल्वेमार्गावर १३० किलोमीटर प्रतितास वेगाने जीएम एक्सप्रेस दाैडवली. त्यानंतर रात्री ते नागपुरात पोहचले. त्यांनी येथे पत्रकारांशी चर्चा करताना नागपूर विभागात रेल्वे लाईन, सिस्टम अपग्रेडेशन आणि पुलांचे मोठ्या प्रमाणावर (विकास) कामे झाल्याचे पत्रकारांना सांगितले. शनिवारी सकाळी महाव्यवस्थापक त्यांच्या ताफ्यासह मुंबईला पोहचले आणि एक दिवस लोटत नाही तोच आज रविवारी (२७ नोव्हेंबर) बल्लारपूर रेल्वेस्थानकावर पुल पडल्याची दुर्घटना घडली. यामुळे मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांच्या दाव्यातील फोलपणा आहे. सोबतच नागपूरसह वेगवेगळ्या ठिकाणच्या रेल्वे पुलांच्या अवस्थेचा मुद्दाही चर्चेला आला आहे.

नागपुरात कधीही घडू शकते दुर्घटना

नागपूरात सध्या सर्वात वाईट अवस्था असलेल्या रेल्वे पुलांमध्ये अजनीच्या रेल्वे पुलाची गणना होते. अजनीचा हा रेल्वे पुल ब्रिटिशकालिन आहे. तो वाहतुकीस धोकादायक असल्याचे नेहमीच ओरडून ओरडून सांगितले जाते. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून त्याची पाहिजे त्या गांभिर्याने आणि तत्परतेने दखल घेतली गेलेली नाही. अजनी पुलाप्रमाणेच लोहापुल, धंतोली आणि नरेंद्रनगरच्या रेल्वेपुलांचीही स्थिती धोकादायक आहे. या पुलांवरून कधीही दुर्घटना घडू शकतात.

थेट रेल्वेमंत्रीच आले होते अजनी पुलावर

दहा वर्षांपूर्वी तत्कालिन केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांनी अजनी पुलाची स्थिती दाखवण्यासाठी थेट तत्कालिन रेल्वेमंत्र्यांनाच या पुलावर आणले होते. त्यावेळी रेल्वे मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. अधिकाऱ्यांनी थातुरमातूर कारवाई केली. या संबंधाने वेळोवेळी होणाऱ्या तक्रारी आणि नागरिकांची ओरड बेदखल केली जात असल्याचा आरोप भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी केला आहे.

गंभीर जखमींना एक लाखाची मदत

बल्लारपूरच्या रेल्वेपुलावरून पडून गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला प्रत्येकी एक लाख रुपये तर किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५०हजार रुपयांची आर्थिक मदत रेल्वेतर्फे देण्यात येणार आहे. जखमीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च रेल्वे तर्फे केला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार (मुंबई) यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :nagpurनागपूर