शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 19:34 IST

Ajit Navale Bacchu Kadu Protest: बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलक रस्त्यावर बसले असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले. त्यानंतर बच्चू कडूंसह सर्वच शेतकरी नेते आक्रमक झाले.

Bacchu Kadu Morcha Nagpur: "भावानो कालचं माझं भाषण रेकॉर्डवर आहे. आपण सगळ्यांनी ऐकलं होतं. दगाफटका होऊ शकतो याची चुणूक काल मी तुम्हाला माझ्या भाषणात सांगितली होती. हे बरोबर न्यायालयाला पुढे करतील आणि न्यायालयाच्या माध्यमातून यापूर्वीचं मुंबईतील एक आंदोलन, जरांगे पाटलांचं आंदोलन ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्यावर दबाव आणला. तोच पॅटर्न शेतकरी आंदोलनासाठी वापरतील अशी शंका आम्हाला काल होती. आज कोर्टाचे आदेश आले. ती शंका खरी ठरलेली आपल्याला दिसत आहे", असे सांगत शेतकरी नेते अजित नवले यांनी महायुती सरकार गंभीर आरोप केला. आता जेलमध्ये जाणार पण माघार घेणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिला. 

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाचा आदेश आल्यानंतर आंदोलन स्थळी शेतकरी नेत्यांची भाषणे झाली. यावेळी बोलताना अजित नवले म्हणाले, "भावानो, ही लढाई जर आपण आता सोडली, आपण जर इथे चूक केली, तर यापुढे या महाराष्ट्रामध्ये लढा उभा राहणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. हा पॅटर्न बनले की, लोकांनी लढावं. संघर्ष करावा आणि सरकारच्या अंगलट आलं की मग त्यांनी न्यायालयाची मदत घ्यावी. आपले लोकशाही अधिकार, हे मातीत गाडावे. हे जर आता आपण सहन केलं, तर यापुढे कोणतेही आंदोलन उभे राहणार नाही." 

'जे जरांगेंच्या आंदोलनात झाले, तेच आज...'

"जे मुंबईला जरांगे पाटलांच्या आंदोलनात झाले. आज जे बच्चू कडूंच्या आंदोलनात होत आहे. तेच उद्या तुमच्या, आमच्या आणि प्रत्येकाच्या आंदोलनात होणार आहे. म्हणून हा शेतकऱ्यांचा लढा आहेच पण त्याचबरोबर हा लोकशाही वाचवण्याचा सुद्धा लढा आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे", असे अजित नवले म्हणाले.  

अजित नवले न्यायालयाच्या आदेशाबद्दल म्हणाले, "न्यायालयाचा आदेश आहे. न्यायालयाचा अवमान करायचा नाहीये. आम्ही कुणीच न्यायालयाचा अवमान करणार नाहीये. अर्थात ज्या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. तो शेतकऱ्याचा अवमान झाला, तो चालतो. माता-भगिनी विधवा झाल्या तरी चालतं. न्यायालयाचा आदेश पाळायचा आहे. शांतता पाळायची आहे. पण, लढ्यातून माघार घ्यायची नाही." 

पोलिसांनी गाड्या आणाव्यात...

"न्यायालयाचा अवमान करायचा नाही आणि लढा सुद्धा सोडायचा नाही. पोलिसांना आवाहन आहे. गाड्या बोलवा. आमची शेतकऱ्यांची पोरं जेलमध्ये जायला तयार आहेत. जेलभरो जो होईल, तो नाटकी जेलभरो होता कामा नये. आपल्यापैकी कुणीही जामीन स्वीकारणार नाही. लुटूपुटूची लढाई करायची नाही. जेलमध्ये जायचे म्हणजे जायचे. माघार घ्यायची नाही", असा इशारा अजित नवलेंनी सरकारला दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Navale alleges government using court pressure tactics like Jarange Patil case.

Web Summary : Ajit Navale accuses the government of using court pressure, mirroring tactics from Jarange Patil's movement, to suppress farmers' protests. He vows continued resistance, even if it means jail, urging unwavering commitment to safeguarding democracy and farmers' rights despite court orders.
टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूBachhu Kaduबच्चू कडूFarmerशेतकरीagitationआंदोलनChakka jamचक्काजाम