शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
3
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
4
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
5
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
6
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
7
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
8
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
9
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
10
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
11
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
12
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
13
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
14
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
15
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
16
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
17
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
18
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
19
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
20
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम

"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 19:34 IST

Ajit Navale Bacchu Kadu Protest: बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलक रस्त्यावर बसले असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले. त्यानंतर बच्चू कडूंसह सर्वच शेतकरी नेते आक्रमक झाले.

Bacchu Kadu Morcha Nagpur: "भावानो कालचं माझं भाषण रेकॉर्डवर आहे. आपण सगळ्यांनी ऐकलं होतं. दगाफटका होऊ शकतो याची चुणूक काल मी तुम्हाला माझ्या भाषणात सांगितली होती. हे बरोबर न्यायालयाला पुढे करतील आणि न्यायालयाच्या माध्यमातून यापूर्वीचं मुंबईतील एक आंदोलन, जरांगे पाटलांचं आंदोलन ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्यावर दबाव आणला. तोच पॅटर्न शेतकरी आंदोलनासाठी वापरतील अशी शंका आम्हाला काल होती. आज कोर्टाचे आदेश आले. ती शंका खरी ठरलेली आपल्याला दिसत आहे", असे सांगत शेतकरी नेते अजित नवले यांनी महायुती सरकार गंभीर आरोप केला. आता जेलमध्ये जाणार पण माघार घेणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिला. 

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाचा आदेश आल्यानंतर आंदोलन स्थळी शेतकरी नेत्यांची भाषणे झाली. यावेळी बोलताना अजित नवले म्हणाले, "भावानो, ही लढाई जर आपण आता सोडली, आपण जर इथे चूक केली, तर यापुढे या महाराष्ट्रामध्ये लढा उभा राहणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. हा पॅटर्न बनले की, लोकांनी लढावं. संघर्ष करावा आणि सरकारच्या अंगलट आलं की मग त्यांनी न्यायालयाची मदत घ्यावी. आपले लोकशाही अधिकार, हे मातीत गाडावे. हे जर आता आपण सहन केलं, तर यापुढे कोणतेही आंदोलन उभे राहणार नाही." 

'जे जरांगेंच्या आंदोलनात झाले, तेच आज...'

"जे मुंबईला जरांगे पाटलांच्या आंदोलनात झाले. आज जे बच्चू कडूंच्या आंदोलनात होत आहे. तेच उद्या तुमच्या, आमच्या आणि प्रत्येकाच्या आंदोलनात होणार आहे. म्हणून हा शेतकऱ्यांचा लढा आहेच पण त्याचबरोबर हा लोकशाही वाचवण्याचा सुद्धा लढा आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे", असे अजित नवले म्हणाले.  

अजित नवले न्यायालयाच्या आदेशाबद्दल म्हणाले, "न्यायालयाचा आदेश आहे. न्यायालयाचा अवमान करायचा नाहीये. आम्ही कुणीच न्यायालयाचा अवमान करणार नाहीये. अर्थात ज्या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. तो शेतकऱ्याचा अवमान झाला, तो चालतो. माता-भगिनी विधवा झाल्या तरी चालतं. न्यायालयाचा आदेश पाळायचा आहे. शांतता पाळायची आहे. पण, लढ्यातून माघार घ्यायची नाही." 

पोलिसांनी गाड्या आणाव्यात...

"न्यायालयाचा अवमान करायचा नाही आणि लढा सुद्धा सोडायचा नाही. पोलिसांना आवाहन आहे. गाड्या बोलवा. आमची शेतकऱ्यांची पोरं जेलमध्ये जायला तयार आहेत. जेलभरो जो होईल, तो नाटकी जेलभरो होता कामा नये. आपल्यापैकी कुणीही जामीन स्वीकारणार नाही. लुटूपुटूची लढाई करायची नाही. जेलमध्ये जायचे म्हणजे जायचे. माघार घ्यायची नाही", असा इशारा अजित नवलेंनी सरकारला दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Navale alleges government using court pressure tactics like Jarange Patil case.

Web Summary : Ajit Navale accuses the government of using court pressure, mirroring tactics from Jarange Patil's movement, to suppress farmers' protests. He vows continued resistance, even if it means jail, urging unwavering commitment to safeguarding democracy and farmers' rights despite court orders.
टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूBachhu Kaduबच्चू कडूFarmerशेतकरीagitationआंदोलनChakka jamचक्काजाम