शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

... म्हणून अमरावती जिल्ह्यातल्या देऊरवाडात घरावर कौले लावीत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 16:24 IST

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: एखाद्या गावाला असलेला इतिहास आणि त्या गावाची परंपरा यांचे एकमेकांसोबतचे नाते काळासोबतच पावले टाकून चालत असते. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात असलेल्या देऊरवाडा या गावानेही इतिहासासोबतचे आपले नाते वर्तमानातही जपण्याचा वसा कायम राखला आहे.देऊरवाडा म्हणजेच देवळांचा वाडा अर्थात देवांचा वाडा. या गावातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या किनाऱ्यावर अनेक देवळे ...

ठळक मुद्देसाडेअकरा शिवलिंगांचे मंदीर

वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: एखाद्या गावाला असलेला इतिहास आणि त्या गावाची परंपरा यांचे एकमेकांसोबतचे नाते काळासोबतच पावले टाकून चालत असते. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात असलेल्या देऊरवाडा या गावानेही इतिहासासोबतचे आपले नाते वर्तमानातही जपण्याचा वसा कायम राखला आहे.देऊरवाडा म्हणजेच देवळांचा वाडा अर्थात देवांचा वाडा. या गावातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या किनाऱ्यावर अनेक देवळे पहावयास मिळतात.या गावातील नागरिक आपल्या घरांवर कौले लावीत नाहीत. कुठल्याही धर्मचा, जातीचा वा आर्थिक स्तराचा नागरिक असो, तो आपल्या घरावर त्याच्या ऐपतीनुसार छप्पर घालतो. मात्र त्यात कौलांचा समावेश कधीच नसतो.प्रथम ऐकताना अतिशय नवलाची वाटणारी ही बाब असली तरी त्याचे उगमस्थान हे पुराणकाळात दडले असल्याचे नंतर आख्यायिकेतून कळते.आपण सर्वांनी लहानपणी ऐकलेली हिरण्यकश्यपूची गोष्ट जर आठवली तर नरसिंहाने कसे त्याचे पोट फाडले हे आठवावे. तर त्या राक्षसाचे पोट फाडून त्याला ठार केल्यानंतर नरसिंहाने आताच्या देऊरवाडातून वाहणाऱ्या पूर्णा नदीत आपले हात धुतले होते असे सांगतात. त्याची ती रक्ताळलेली नखे ही कौलांसारखी दिसत होती. एका असुराचा नाश केलेली व रक्ताळलेली नखे आपल्या घरावर नको या भावनेमुळे तेथील गावकरी आपल्या घरांवर कौले लावीत नाहीत.या गावात नरसिंहाचे एक अतिशय सुंदर मंदिर आहे. नदीच्या काळावर एका काठावर नरसिंहाचे तर दुसऱ्या काठावर साडेअकरा शिवलिंगांचे मंदिर आहे. ही शिवलिंगे याच नदीच्या पात्रातून बाहेर आल्याचे सांगितले जाते.पुराणकाळातील ही कथा आजच्या विज्ञानयुगात सुसंगत वाटणारी नसली तरी देऊरवाडातील नागरिक तिला मान्यता देतात. जर या आख्यायिकेला विरोध करण्यासाठी कुणी आपल्या घरावर कौले लावलीच तर ते घर लवकरच भंगते, पडते वा त्या घरातील सदस्यांवर सतत अरिष्टे येतात अशीही वदंता आहे.चांदूरबाजार हा तालुका तसा अमरावती जिल्ह्यातील एक सधन तालुका. येथे पावसाचे प्रमाणही तुलनेत अधिक असते. सामान्यपणे जिथे पाऊस जास्त असतो तिथे कौलारू घरे अधिक पहावयास मिळतात. अपवाद फक्त एकच, अमरावती जिल्ह्यातले देऊरवाडा.

टॅग्स :cultureसांस्कृतिक