शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

तो' टाइपरायटर धूळखात ! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा टाइपरायटर अंधाऱ्या खोलीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:23 IST

Nagpur : बाबासाहेबांच्या वस्तू असलेले वस्तुसंग्रहालय अद्याप नवीन इमारतीत स्थलांतरित झालेले नाही.

योगेंद्र शंभरकर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या टाइपरायटरच्या आधारे संविधानाचा मसुदा तयार केला होता. तो टाइपरायटर चार वर्षांपासून बंद खोलीत धूळखात आहे. चिचोली शांतीवन येथील बाबासाहेब आंबेडकर स्मृती संग्रहालयातून टाइपरायटर रासायनिक प्रक्रियेसाठी बाहेर काढण्यात आले होते. त्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. परंतु अनुकूल वातावरण नसल्याने टाइपरायटर पुन्हा प्रदर्शनात ठेवता येत नाही. यामुळे २६ जानेवारीला राज्यघटनेच्या ७५ व्या वर्धापनदिनी हा ऐतिहासिक टाइपरायटर लोकांच्या नजरेपासून दूरच राहिले. 

संग्रहालय चालवणाऱ्या भारतीय बौद्ध परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या ऐतिहासिक टाइपरायटर आणि इतर वस्तूंच्या जतनासाठी आवश्यक तापमान राखण्यासाठी एअर कंडिशनर (एसी) यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. या वस्तूंच्या देखभालीसाठी शांतीवन, चिचोली येथील जागेत प्रयोगशाळा उभारणे आवश्यक आहे.

बाबासाहेब आंबेडकर स्मृती संग्रहालयातील मौल्यवान वस्तूंचे जतन करण्यासाठी निधीची भारतीय बौद्ध परिषदेकडून अनेक वर्षांपासून मागणी होत होती, अखेर २०११ मध्ये शासनाने ४० कोटी रुपये मंजूर केले. यातून बाबासाहेबांचे टाइपरायटर, कपडे, चष्मा, काठी, पेन, कंदील, कागदपत्रांसह सुमारे १३५८ वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे. एनआयटीने संग्रहालय इमारतीचे बांधकाम केले आहे. शासनाने १७ कोटींचा निधी देऊन इतर इमारती बांधल्या. मात्र या इमारतींमध्ये फर्निचर, शोकेस आणि इतर आवश्यक सुविधांचा अभाव आहे.

बाबासाहेबांच्या वस्तू असलेले वस्तुसंग्रहालय अद्याप नवीन इमारतीत स्थलांतरित झालेले नाही.रासायनिक प्रक्रिया करूनही गेल्या ४-५ वर्षांपासून वस्तू एका छोट्या खोलीत ठेवल्या आहेत. योग्य वातावरण तयार न झाल्यास हा वारसा पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे.

"बाबासाहेबांनी या टाइपरायटरवर २ वर्षे ११ महिने १८ दिवस संविधान टाइप केलेले टाइपरायटर चिचोली संग्रहालयात आहे. त्यावर रासायनिक प्रक्रिया आणि संग्रहालयाच्या इमारतीचे बांधकाम झाले आहे. परंतु ऐतिहासिक वस्तूसाठी अनुकूल वातावरण व सुविधा उपलब्ध नाहीत. विकासकामांसाठी १७४ कोटींचा प्रस्ताव परिषदेने दिला होता. मात्र शासनाने निधी दिला नाही. बाबासाहेबांच्या वस्तू एका खोलीत बंद आहेत. राज्य सरकारने किमान ६० कोटींचा निधी द्यावा, अन्यथा वस्तू पुन्हा खराब होतील." - संजय पाटील, भारतीय बौद्ध परिषद, शांतीवन, चिचोली

टॅग्स :nagpurनागपूर