शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

दरवर्षी थॅलेसेमियाच्या १ लाख रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 15:34 IST

थॅलेसेमिया ही एक प्रकारची रक्तव्याधी आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात सुमारे दीड कोटीवर रुग्ण आहेत. यातील दरवर्षी एक लाख रुग्णांचा मृत्यू होतो. भारतात या आजाराच्या वाहकांची संख्या तीन कोटीवर आहे. यातील थॅलेसेमियाचा घातक (मेजर) प्रकारातील एक लाख रुग्ण आहेत. या रुग्णांची मृत्यूसंख्या कमी करायची असले तर या आजाराच्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार, योग्य पद्धतीचा औषधे व सोयी मिळणे आवश्यक आहे, अशी माहिती थॅलेसेमिया व सिकलसेल सेंटरचे संचालक व बालरोग तज्ज्ञ डॉ.विंकी रुघवानी यांनी दिली.

ठळक मुद्देविंकी रुघवानी याची माहिती : देशात एक लाख थॅलेसेमिया मेजर रुग्णजागतिक थॅलेसेमिया दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : थॅलेसेमिया ही एक प्रकारची रक्तव्याधी आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात सुमारे दीड कोटीवर रुग्ण आहेत. यातील दरवर्षी एक लाख रुग्णांचा मृत्यू होतो. भारतात या आजाराच्या वाहकांची संख्या तीन कोटीवर आहे. यातील थॅलेसेमियाचा घातक (मेजर) प्रकारातील एक लाख रुग्ण आहेत. या रुग्णांची मृत्यूसंख्या कमी करायची असले तर या आजाराच्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार, योग्य पद्धतीचा औषधे व सोयी मिळणे आवश्यक आहे, अशी माहिती थॅलेसेमिया व सिकलसेल सेंटरचे संचालक व बालरोग तज्ज्ञ डॉ.विंकी रुघवानी यांनी दिली.जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या पूर्वसंध्येवर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद सांधला. डॉ. रुघवानी म्हणाले, ही आनुवंशिक व्याधी आहे. थॅलेसेमियाचे तीन प्रकार आहेत. या आजाराची व्यक्ती वाहक असते, इंटरमिडीया असते व मेजर (घातक) असते. दोन ‘थॅलेसिमिया मायनर’ पीडित स्त्री-पुरुष यांच्यापासून जन्म घेणारे अपत्ये अत्यंत थॅलेसीमिया मेजर पीडित होऊ शकते.लहान मुलांमध्ये हिमोग्लोबीनची निर्मिती थांबते व त्यांना वारंवार रक्त द्यावे लागते. अशा स्थितीतील हा आजार गंभीर असतो. यात प्रामुख्याने लोहाची कमतरता आढळते. दुसरीकडे वारंवार रक्त दिल्याने लोहाची मात्रा आवश्यक्तेपेक्षा जास्त वाढते. देशात काही जाती-जमातींमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येते. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत ३ ते ४ टक्के रुग्ण हे थॅलेसेमियाचे वाहक असतात. २५ लोकांमधून थॅलेसेमियाचा एक मेजर रुग्ण आढळून येतो. वर्षाला साधारण थॅलेसेमिा मेजर १२ हजार बाळ जन्माला येतात. हे थांबविणे सहज सोपे असलेतरी याबाबत फारसी जनजागृती नाही, अशी खंतही डॉ. रुघवानी यांनी बोलून दाखवली.-मेजर व्याधीचे स्वरूपअ‍ॅनेमियाचीच ही एक व्याधी आहे. या रुग्णांच्या शरीरात हिमोग्लोबीनची निर्मिती होत नाही. जन्मत:च अशी मुले सामान्यत: सारखीच असतात. वयाच्या तीन ते १८ व्या महिन्यात मुलांमध्ये या आजाराची लक्षणे दिसतात. या मुलांची त्वचा पिवळट दिसते. मुले नीट खात-पीत नाहीत. उलट्यांचे प्रमाण वाढते. परिणामी पुढील आठ वर्षांमध्ये रुग्णाला मृत्यू होऊ शकतो. या रोगावर ‘अस्थीमज्जा प्रत्यारोपण’ (बोनमॅरो ट्रान्सप्लांट) हा उपचार आहे. परंतु देशात मोजक्याच ठिकाणी हा उपचार होतो.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर