शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

थॅक्यू नागपूर! ईलेक्शन टू सिलेक्शन : कोणतीही अप्रिय घटना नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 10:30 PM

उभ्या देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघाची अखेर मतमोजणी आटोपली अन् निकालही हाती आले. मतदानाच्या तारखेची घोषणा ते मतदानाचा निकाल, अशी तब्बल अडीच महिन्यांची प्रक्रिया अत्यंत उत्साहात नागपुरात पार पडली. मात्र, ७५ दिवसांच्या या प्रक्रियेत कसलीही गडबड झाली नाही. आरोप-प्रत्यारोपाचा धुराळा उडाला मात्र कुठलीही हिंसक घटना घडली नाही. शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे अभ्यासपूर्ण नियोजन केल्यानेच सर्व कसे शांततेत पार पडले.

ठळक मुद्देसर्वांचीच समंजस भूमिका : चोख बंदोबस्त, पोलिसांनी घेतले अथक परिश्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उभ्या देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघाची अखेर मतमोजणी आटोपली अन् निकालही हाती आले. मतदानाच्या तारखेची घोषणा ते मतदानाचा निकाल, अशी तब्बल अडीच महिन्यांची प्रक्रिया अत्यंत उत्साहात नागपुरात पार पडली. मात्र, ७५ दिवसांच्या या प्रक्रियेत कसलीही गडबड झाली नाही. आरोप-प्रत्यारोपाचा धुराळा उडाला मात्र कुठलीही हिंसक घटना घडली नाही. शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे अभ्यासपूर्ण नियोजन केल्यानेच सर्व कसे शांततेत पार पडले. 

१८ मार्चपासून लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. देशातील हेवीवेट नेते म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढत असल्यामुळे या लढतीवर देशाचे लक्ष लागले होते. त्यामुळे येथील पोलिसांवर सुरक्षेचा मोठा ताण होता. परिणामी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मतदानाच्या एक आठवड्यापूर्वीपासूनच बंदोबस्ताची व्यूहरचना केली होती. मदतीला होमगार्डस्, केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि मुंबई, नाशिक, सांगली तसेच धुळ्यावरूनही अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेतले होते. त्यांना बंदोबस्तात तैनात करून गुंड तसेच अवैध दारू विक्री करणारे आणि धामधूम करणारे उपद्रवी समाजकंटक यांच्यावर कारवाईचा धडाका लावला होता. शहरातील सर्व संवेदशनशील वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावला होता. संवेदनशील, अतिसंवेदनशील भागातील मतदान केंद्रांवर सशस्त्र सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. विनाकारण वाद घालून शांतता भंग करण्याची सवय जडलेल्या गुन्हेगारांंना पोलिसांनी आधीच सज्जड दम दिला होता. अवैध धंदेवाल्यांवर विशेष छापेमारीचे सत्र राबविले. त्यामुळे गुन्हेगारांनी, उपद्रवींनी गप्प राहण्यात धन्यता मानली.नेत्यांशीही संवाद।पोलिसांनी समाजकंटकांना गप्प केले असले तरी निवडणुकीचा प्रचार टोकाला असताना एका मनोरुग्णाने सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह नारे लिहून खळबळ उडवून दिली. दुसरीकडे काही जणांनी बेताल वक्तव्य करून तर काहींनी आक्षेपार्ह्य पोस्ट करून प्रचार प्रक्रिया तापविण्याचे प्रयत्न केले.भाषणातून आक्षेपार्र्ह्य वक्तव्य करून, सोशल मिडियावरून उलटसुलट पोस्ट करून वातावरण दुषित करू पाहणा-यांसोबत तसेच त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी प्रत्यक्ष बोलणी करून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी संवाद साधला. लोकशाहीच्या उत्सवाला कसेलही गालबोट लागणार नाही, याची आपण सर्वच काळजी घेऊ, असे त्यांना आवाहन केले. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी समंजस भूमीका घेतली. त्यामुळे मतदान शांततेत पार पडले.मतमोजणीसाठी दोन दिवसांपूर्वीपासून पोलिसांनी बंदोबस्ताची त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था केली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, खुपिया, वॉचर अशा सर्वांचाच बंदोबस्तासाठी नियोजनपूर्वक वापर करून घेण्यात आला. रखरखत्या उन्हात पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर यांच्यासह सर्वच पोलीस उपायुक्त आणि सहायक आयुक्तांपासून तो पोलीस कॉन्स्टेबलपर्यंत प्रत्येकांनी रात्रंदिवस बंदोबस्ताच्या निमित्ताने परिश्रम घेतले. त्यामुळे ईलेक्शन टू सिलेक्शन प्रक्रियेदरम्यान उपराजधानीत कुठलाही गडबड गोंधळ झाला नाही.नागपूरकरांनो धन्यवादनागपूरकर जनतेने पोलिसांना केलेल्या सहकार्यामुळेच शहरात अत्यंत चांगल्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली आणि तेवढ्याच शांततेत मतमोजणी पार पडली. निकालही आला. कुठे, कसलीच अनुचित घटना घडली नाही. यासाठी नागपूरकर जनतेला आपण मनापासून धन्यवाद देतो.डॉ. भूषणकुमार उपाध्यायपोलीस आयुक्त, नागपूर.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालPoliceपोलिस