शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

अंदमान एक्सप्रेस रोखल्याने रेल्वे स्थानकावर तणाव

By नरेश डोंगरे | Updated: July 29, 2024 15:41 IST

किसान आंदोलनाचे कार्यकर्ते : जेवण न मिळाल्याने केला हंगामा

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिणेतून दिल्लीकडे निघालेल्या किसान आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर ट्रेन रोखली. सुमारे अर्धा ते पाऊण तास आक्रमकता दाखवत आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याने रेल्वेगाडीला विलंब झाला. परिणामी प्रवासीही संतप्त झाल्याने तणाव निर्माण झाला होता. शिर्षस्थ अधिकाऱ्यांनी आंदोलकांची मागणी समजून घेत ती पूर्ण केल्यानंतर वातावरण निवळले.

दक्षिणेतील किसान आंदोलनाचे शेकडो कार्यकर्ते दोन दिवसांपूर्वी दिल्लीला होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले होते. गाडीत त्यांच्या आंदोलक पवित्र्यामुळे त्यांना रविवारी नर्मदापूरममध्ये उतरून देण्यात आले. तेथे त्यांनी जोरदार हंगामा केल्याने नंतर त्यांना गाडी क्रमांक १६०३२ अंदमान एक्सप्रेसमध्ये बसविण्यात आले. आज सकाळी १०.३० च्या सुमारास ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचली. येथे त्यांनी आपल्याला गाडीत जेवण न मिळाल्याची तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचे पाहून आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी गाडीच्या इंजिनवर चढून, आडवे होऊन जोरदार घोषणाबाजी केली. 

सुमारे अर्धा ते पाऊणतास त्यांचे 'गाडी रोखो आंदोलन' सुरू होते. त्यांची रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी समजूत काढत होते. दुसरीकडे गाडीला विलंब होत असल्याने या गाडीतील प्रवासीही संतप्त झाले होते. तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोनोफ्रेण्ड करून आंदोलकांची मागणी समजून घेतली. त्यांना लगेच जेवण उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर गाडी पुढे मार्गस्थ झाली. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीnagpurनागपूरFarmerशेतकरी