शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

सिंचन प्रकल्पाचा वनवास कायम प्रशासनाची उदासीनता

By admin | Updated: May 5, 2014 00:31 IST

बल्लारपूर तालुक्यातील दहा गावातील शेतकºयांना प्रगतीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पळसगाव - आमडी उपसा सिंचन योजना आकारास आली.

दोन कोटींचा प्रकल्प १० कोटींवर

अनेकश्वर मेश्राम

बल्लारपूर तालुक्यातील दहा गावातील शेतकºयांना प्रगतीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पळसगाव - आमडी उपसा सिंचन योजना आकारास आली. सन १९९९ मध्ये १ कोटी ९३ लाख १५ हजार रुपये किमतीच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली. मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे दोन कोटीचा प्रकल्प १० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तब्बल १४ वर्षापासून सिंचन प्रकल्पाचा वनवास कायमच असल्याचे वास्तव समोर आले आहे. पळसगाव - आमडी उपसा सिंचन योजना तालुक्यात एकमेव आहे. कळमना गावाजवळ वर्धा नदीच्या डाव्या तिरावर बांधकाम सुरु आहे. धानाचे पिक घेणाºया शेतकºयांना सदर प्रकल्प वरदान ठरणार आहे. मात्र लघु पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे प्रकल्पाचे काम तीन वर्षापासून कासवगतीने पुढे जात आहे. परिणामी प्रकल्पाचे दर सुधारित करण्याची पाळी दरवर्षी विभागावर येत आहे. या प्रकारामुळे प्रकल्पाची किंमत वाढत जात आहे. सदर योजनेचे लाभक्षेत्र दोन भागात विभागण्यात येणार आहे. यासाठी दोन ऊर्ध्वनलिका प्रस्तावित आहेत. ऊर्ध्वनलिका एकच्या माध्यमातून पळसगाव, आमडी, कळमना, कोर्टीमक्ता, कोर्टी तुकूम, जोगापूर, आष्टी येथील दोन हजार १७० हेक्टर जमिनीला सिंचन सुविधा देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ऊर्ध्वनलिका दोनच्या पाईप लाईनद्वारे लावारी, दहेली, व बामणी (दुधोली) गावातील ७२० हेक्टर जमिनीस सिंचन क्षमता उपलब्ध करुन देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. बल्लारपूर तालुक्यातील कृषी क्षेत्र मोठ्या प्रमाणात कोरडवाहू आहे. येथील शेतकºयांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकºयांना दरवर्षी सोसावा लागतो. परिणामी शेतकºयांना शेतीमधील उत्पादन खर्च व उत्पन्नातील तफावत या समस्येला नेहमी सामोरे जावे लागते. यावर उपयायोजना करण्याच्या अनुषंगाने व कृषी क्षेत्राला समृद्धीच्या दिशेने नेण्यासाठी पळसगाव- आमडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून २ हजार ८९० हेक्टर कृषी क्षेत्र ओलिताखाली येण्याचे स्वप्न उराशी बाळगणाºया शेतकºयांच्या नशिबी आजघडीला निराशा आली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय परवडणारा असल्याचे शेतकºयांना जाणवत नाही. शेतीला सिंचनाची सुविधा म्हणून उपसा सिंचन योजना आणली. मात्र योजना पूर्णत्वास नेण्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत आहे. लघु पाटबंधारे विभागातील अधिकारीही सुस्तावले आहेत. राजकीय जनप्रतिनिधी व अधिकारी वर्ग यांच्यातील समन्वयाअभावी पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजनेचा वनवास केव्हा संपणार तूर्तास सांगता येत नाही.