शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

सिंचन प्रकल्पाचा वनवास कायम प्रशासनाची उदासीनता

By admin | Updated: May 5, 2014 00:31 IST

बल्लारपूर तालुक्यातील दहा गावातील शेतकºयांना प्रगतीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पळसगाव - आमडी उपसा सिंचन योजना आकारास आली.

दोन कोटींचा प्रकल्प १० कोटींवर

अनेकश्वर मेश्राम

बल्लारपूर तालुक्यातील दहा गावातील शेतकºयांना प्रगतीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पळसगाव - आमडी उपसा सिंचन योजना आकारास आली. सन १९९९ मध्ये १ कोटी ९३ लाख १५ हजार रुपये किमतीच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली. मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे दोन कोटीचा प्रकल्प १० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तब्बल १४ वर्षापासून सिंचन प्रकल्पाचा वनवास कायमच असल्याचे वास्तव समोर आले आहे. पळसगाव - आमडी उपसा सिंचन योजना तालुक्यात एकमेव आहे. कळमना गावाजवळ वर्धा नदीच्या डाव्या तिरावर बांधकाम सुरु आहे. धानाचे पिक घेणाºया शेतकºयांना सदर प्रकल्प वरदान ठरणार आहे. मात्र लघु पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे प्रकल्पाचे काम तीन वर्षापासून कासवगतीने पुढे जात आहे. परिणामी प्रकल्पाचे दर सुधारित करण्याची पाळी दरवर्षी विभागावर येत आहे. या प्रकारामुळे प्रकल्पाची किंमत वाढत जात आहे. सदर योजनेचे लाभक्षेत्र दोन भागात विभागण्यात येणार आहे. यासाठी दोन ऊर्ध्वनलिका प्रस्तावित आहेत. ऊर्ध्वनलिका एकच्या माध्यमातून पळसगाव, आमडी, कळमना, कोर्टीमक्ता, कोर्टी तुकूम, जोगापूर, आष्टी येथील दोन हजार १७० हेक्टर जमिनीला सिंचन सुविधा देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ऊर्ध्वनलिका दोनच्या पाईप लाईनद्वारे लावारी, दहेली, व बामणी (दुधोली) गावातील ७२० हेक्टर जमिनीस सिंचन क्षमता उपलब्ध करुन देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. बल्लारपूर तालुक्यातील कृषी क्षेत्र मोठ्या प्रमाणात कोरडवाहू आहे. येथील शेतकºयांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकºयांना दरवर्षी सोसावा लागतो. परिणामी शेतकºयांना शेतीमधील उत्पादन खर्च व उत्पन्नातील तफावत या समस्येला नेहमी सामोरे जावे लागते. यावर उपयायोजना करण्याच्या अनुषंगाने व कृषी क्षेत्राला समृद्धीच्या दिशेने नेण्यासाठी पळसगाव- आमडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून २ हजार ८९० हेक्टर कृषी क्षेत्र ओलिताखाली येण्याचे स्वप्न उराशी बाळगणाºया शेतकºयांच्या नशिबी आजघडीला निराशा आली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय परवडणारा असल्याचे शेतकºयांना जाणवत नाही. शेतीला सिंचनाची सुविधा म्हणून उपसा सिंचन योजना आणली. मात्र योजना पूर्णत्वास नेण्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत आहे. लघु पाटबंधारे विभागातील अधिकारीही सुस्तावले आहेत. राजकीय जनप्रतिनिधी व अधिकारी वर्ग यांच्यातील समन्वयाअभावी पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजनेचा वनवास केव्हा संपणार तूर्तास सांगता येत नाही.