शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पाचा वनवास कायम प्रशासनाची उदासीनता

By admin | Updated: May 5, 2014 00:31 IST

बल्लारपूर तालुक्यातील दहा गावातील शेतकºयांना प्रगतीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पळसगाव - आमडी उपसा सिंचन योजना आकारास आली.

दोन कोटींचा प्रकल्प १० कोटींवर

अनेकश्वर मेश्राम

बल्लारपूर तालुक्यातील दहा गावातील शेतकºयांना प्रगतीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पळसगाव - आमडी उपसा सिंचन योजना आकारास आली. सन १९९९ मध्ये १ कोटी ९३ लाख १५ हजार रुपये किमतीच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली. मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे दोन कोटीचा प्रकल्प १० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तब्बल १४ वर्षापासून सिंचन प्रकल्पाचा वनवास कायमच असल्याचे वास्तव समोर आले आहे. पळसगाव - आमडी उपसा सिंचन योजना तालुक्यात एकमेव आहे. कळमना गावाजवळ वर्धा नदीच्या डाव्या तिरावर बांधकाम सुरु आहे. धानाचे पिक घेणाºया शेतकºयांना सदर प्रकल्प वरदान ठरणार आहे. मात्र लघु पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे प्रकल्पाचे काम तीन वर्षापासून कासवगतीने पुढे जात आहे. परिणामी प्रकल्पाचे दर सुधारित करण्याची पाळी दरवर्षी विभागावर येत आहे. या प्रकारामुळे प्रकल्पाची किंमत वाढत जात आहे. सदर योजनेचे लाभक्षेत्र दोन भागात विभागण्यात येणार आहे. यासाठी दोन ऊर्ध्वनलिका प्रस्तावित आहेत. ऊर्ध्वनलिका एकच्या माध्यमातून पळसगाव, आमडी, कळमना, कोर्टीमक्ता, कोर्टी तुकूम, जोगापूर, आष्टी येथील दोन हजार १७० हेक्टर जमिनीला सिंचन सुविधा देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ऊर्ध्वनलिका दोनच्या पाईप लाईनद्वारे लावारी, दहेली, व बामणी (दुधोली) गावातील ७२० हेक्टर जमिनीस सिंचन क्षमता उपलब्ध करुन देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. बल्लारपूर तालुक्यातील कृषी क्षेत्र मोठ्या प्रमाणात कोरडवाहू आहे. येथील शेतकºयांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकºयांना दरवर्षी सोसावा लागतो. परिणामी शेतकºयांना शेतीमधील उत्पादन खर्च व उत्पन्नातील तफावत या समस्येला नेहमी सामोरे जावे लागते. यावर उपयायोजना करण्याच्या अनुषंगाने व कृषी क्षेत्राला समृद्धीच्या दिशेने नेण्यासाठी पळसगाव- आमडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून २ हजार ८९० हेक्टर कृषी क्षेत्र ओलिताखाली येण्याचे स्वप्न उराशी बाळगणाºया शेतकºयांच्या नशिबी आजघडीला निराशा आली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय परवडणारा असल्याचे शेतकºयांना जाणवत नाही. शेतीला सिंचनाची सुविधा म्हणून उपसा सिंचन योजना आणली. मात्र योजना पूर्णत्वास नेण्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत आहे. लघु पाटबंधारे विभागातील अधिकारीही सुस्तावले आहेत. राजकीय जनप्रतिनिधी व अधिकारी वर्ग यांच्यातील समन्वयाअभावी पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजनेचा वनवास केव्हा संपणार तूर्तास सांगता येत नाही.