शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

नागपूरसह विदर्भाच्या तापमानात वाढ; मार्च संपायचाच, पारा चाळीशीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 14:01 IST

हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत उष्ण वाऱ्यांचे चटके बसण्याची शक्यता आहे.

नागपूर : मार्चच्या मध्यातच नागपुरात भीषण उष्णतेने हजेरी लावली आहे. मंगळवारी दिवसाचे कमाल तापमान ३९.६ अंश नाेंदविण्यात आले. २४ तासांत पारा २.४ अंशांनी वाढला आहे. सरासरीपेक्षा ४ अंश अधिक असल्याने उष्ण वारे व सूर्यकिरणांनी नागपूरकरांचा त्रास वाढला आहे.

सध्या राजस्थान व गुजरातमध्ये उष्ण लहरींची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत उष्ण वाऱ्यांचे चटके बसण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात तापमान ४० अंशांच्या आसपास असेल. तसाही मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत पारा ४० अंशांवर पाेहोचून जाताे. मात्र या सीजनमध्ये मार्चच्या मध्यातच या आकड्यावर पाेहोचण्याचा अंदाज आहे. मागील तीन दिवसांत कमाल तापमान ३.२ अंशांनी वाढले आहे. येत्या दाेन दिवसांत यामध्ये एक किंवा २ अंशांची वाढ हाेण्याचा अंदाज आहे.

मंगळवारी ४१.१ अंश तापमानासह अकाेला विदर्भात सर्वात उष्ण ठरला. याशिवाय वर्धा ४० अंश, अमरावती ३९.८ अंश, ब्रह्मपुरी व चंद्रपुरात ३९.६ अंश, वाशिममध्ये तापमान ३९.५ अंश हाेते. नागपुरात सकाळपासून वातावरण काेरडे हाेते. सकाळी आर्द्रता ४० टक्के हाेती, जी सायंकाळी घसरून २८ टक्क्यांवर पाेहोचली. रात्रीचे तापमान २ अंशांनी वाढून १८.५ अंशांवर चढले.

टॅग्स :environmentपर्यावरणweatherहवामानVidarbhaविदर्भ