शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

आष्टणकर यांना जिल्हाध्यक्षपदावरून हटविल्याने तेली समाज संघटना नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:41 IST

Nagpur : विविध तेली समाज संघटनांच्या प्रतिनिधींनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवून तेली समाजावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून बाबा आष्टणकर यांना हटविण्यात आल्यावर तेली समाज संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. विविध तेली समाज संघटनांच्या प्रतिनिधींनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवून तेली समाजावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे. तेली समाजाला प्रतिनिधित्व नाकारून काँग्रेस कशी मजबूत होणार, असा सवालही या संघटनांनी केला आहे.

संताजी युवक मंडळाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष विलास काचोरे, संताजी तेली संघटनेचे अरुण टिकले, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे बळवंतराव मरघडे, तेली समाज संघटना नागपूर जिल्ह्याचे राजू तुरणकर, संताजी युवक ब्रिगेड नागपूर जिल्ह्याचे राजेश झाडे, तेली बांधव समाज संघटना नागपूर जिल्ह्याचे जनार्धन मेहर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, बाबा आष्टणकर हे तेली समाजाचे प्रतिनिधी आहेत. त्यांना जिल्हाध्यक्ष म्हणून काम करायला फक्त सात महिनेच मिळाले. या काळात त्यांनी पक्षाचे सर्व कार्यक्रम राबविले. आंदोलने केली. त्यांनी कामाचा सपाटा लावल्यामुळे राजकीय द्वेषापोटी गटाचे राजकारण करणारे माजी मंत्री सुनील केदार यांनी अ. भा. संघटन महासचिव के. सी वेणुगोपाल यांच्या मदतीने आष्टनकर यांना हटविले. त्यामुळे जिल्ह्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. केदार यांनी जिल्हा बँक घोटाळ्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी भाजपाशी छुपी युती केली असल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे.

बैस यांच्या नियुक्तीवर केदार समर्थकही नाराज

आष्टणकर यांना हटविण्यात जिल्हाध्यक्षपदी नेमण्यात आलेले अश्विन बैस हे ३१ वर्षांचे युवक आहेत. त्यांना पक्ष संघटनेचा अनुभव नाही. ते साधी ग्रामपंचायतचीही निवडणूक लढलेले नाहीत. अशा अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या हाती जिल्हा काँग्रेसची धुरा दिल्यामुळे केदार समर्थकदेखील नाराज आहेत. पण, दबावापोटी कुणी उघडपणे बोलत नाही, असा दावाही तेली समाज संघटनांनी केला आहे. 

तेली समाज काँग्रेसपासून दुरावण्याचा धोका

नागपूर शहर व जिल्ह्यात तसेही तेली समाजाचे मोजकेच प्रतिनिधी काँग्रेस पक्षात आहे. तेली समाजाला पाहिजे त्या प्रमाणात काँग्रेस पक्षात वाव नसल्याने तेली समाज भाजपाकडे झुकलेला आहे. बाबा आष्टणकर यांनी तेली समाजाला काँग्रेस पक्षाशी जोडण्याचे काम सुरू केले होते. परंतु, कोणतेही कारण नसताना त्यांना पदावरून हटविणे म्हणजे तेली समाजाचा अपमान आहे, अशी नाराजी व्यक्त करीत असेच सुरू राहिले तर काँग्रेसला तेली समाजाची मते नको आहेत का, असा प्रश्न तेली समाज संघटनांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरcongressकाँग्रेस