शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शिक्षकांना पुन्हा करावी लागणार ‘आरटीपीसीआर टेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:26 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग २६ नाेव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मागे घेत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग २६ नाेव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मागे घेत ते १४ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला हाेता. त्यामुळे साेमवार(दि. १४)पासून शाळा सुरू हाेणार असल्याने शिक्षकांना पुन्हा ‘आरटीपीसीआर टेस्ट’ करावी लागत आहे. दुसरीकडे पाल्यांना शाळेत पाठविण्यासंदर्भात पालकांचे संमतीपत्र अनिवार्य करण्यात आल्याने, या संमतीपत्राला पालकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती शिक्षकांनी दिली.

तालुक्यात इयत्ता नववी व दहावीचे एकूण ५,३४७ आणि अकरावी व बारावीचे ४,२४४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी ७६१ पालकांनी त्यांच्या नववी व दहावीच्या पाल्यांना तर २८५ पालकांनी त्यांच्या अकरावी व बारावीतील पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी संमतीपत्र दिले आहे. शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने नियाेजन करण्यात आले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या २६ नाेव्हेंबरपूर्वी ‘आरटीपीसीआर टेस्ट’ करण्यात आल्या हाेत्या. त्यानंतर १८ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, या १८ दिवसामध्ये कर्मचाऱ्यांनी केलेल्या ‘आरटीपीसीआर टेस्ट’ आता कुचकामी ठरल्या आहेत. या ५२९ कर्मचाऱ्यांच्या नव्याने टेस्ट कराव्या लागत असल्याने शासनाचा त्यावरील खर्च व कर्मचाऱ्यांचे काम वाढले आहे. वारंवार चाचण्या कराव्या लागत असल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

....

१२ कर्मचारी काेराेना संक्रमित

रामटेक तालुक्यात ४० माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण ५२९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती असून, इयत्ता नववी व दहावीच्या शिक्षकांची संख्या २२८ व इयत्ता अकरावी व बारावीच्या शिक्षकांची संख्या १३४ आहे. यातील २०४ माध्यमिक व १०० उच्च माध्यमिक शिक्षकांनी त्यांची ‘आरटीपीसीआर टेस्ट’ केली असून, आठ शिक्षक व चार शिक्षकेतर कर्मचारी काेराेना संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

...

सर्वच शिक्षकांना शाळेत जावे लागेल. त्यांना त्यांची ‘आरटीपीसीआर टेस्ट’ करणे अनिवार्य आहे. मागील चाचण्यांचा अहवाल ग्राह्य धरला जाणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करीत जुन्या आराखड्यानुसार उपाययाेजना केल्या जातील.

- संगीता तभाने,

गटशिक्षणाधिकारी, रामटेक.