शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘टाटा-एअरबस’चा प्रकल्प नागपुरात येणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे सूतोवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2022 11:51 IST

राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू

नागपूर : वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यात वाद निर्माण झाला असताना नागपूरसाठी मात्र आशादायक बातमी आली आहे. नागपुरात टाटा-एअरबसचा प्रकल्प आणण्यासंदर्भात हालचाली सुरू असून, केंद्र शासनाशीदेखील चर्चा सुरू असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पामुळे ‘एव्हिएशन’ क्षेत्रात नागपूरचे नाव जागतिक पातळीवर जाणार असून, याचा फायदा निश्चितपणे विदर्भाला होईल, असे मानले जात आहे.

टाटा समूहातर्फे २०२७ पर्यंत देशात ९० बिलीयन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे. याअंतर्गतच टाटा-एअरबसचा प्रकल्प राहणार आहे. नागपुरातील मिहान येथे हा प्रकल्प आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. टाटा-एअरबसचा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये होणार आहे. यासंदर्भात उदय सामंत यांनी सरकारची भूमिका मांडली. राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. टाटा समूहाच्या सहकार्यानेच हा प्रकल्प होणार आहे. टाटाच्या ‘एव्हिएशन’ विभागातील अधिकाऱ्यांशीदेखील यासंदर्भात लवकरच विस्तृत चर्चा करण्यात येईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

राज्य शासनाला लावावा लागणार जोर

वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्य सरकार महाराष्ट्रात लष्करी विमानांच्या निर्मितीसाठी एअरबस-टाटाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशमधील भाजपच्या नेतृत्वाखालील इतर राज्य सरकारांकडूनदेखील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि अहमदनगर येथे संरक्षण केंद्रे आहेत. बोईंग, सोलर इंडस्ट्रीज आणि ब्रह्मोस एरोस्पेस यांसारख्या कंपन्यांमुळे नागपुराची ‘एअरोस्पेस हब’ म्हणून ओळख निर्माण होते आहे. मिहानमध्ये जागेचीदेखील उपलब्धता असल्यामुळे नागपूरकडे प्रकल्प आणण्याच्या हालचाली सुरू आहेत.

प्रकल्पासाठी नागपूरच योग्य पर्याय

- देशातील केंद्र स्थान

मिहानमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध

- एअर इंडियाच्या एमआरओसह ‘एव्हिएशन’ क्षेत्रातील काही कंपन्या अगोदरपासूनच कार्यरत

- भारतीय वायुसेनेचे ‘मेन्टेनन्स कमांड’

- कुशल मनुष्यबळाची उपलब्धता उपलब्ध

- पायाभूत सुविधादेखील उपलब्ध

- रस्ते, रेल्वे व हवाई मार्गाद्वारे दळणवळणाचे ‘नेटवर्क’

काय होईल फायदा

- नागपूरचे नाव संरक्षण व ‘एव्हिएशन’ क्षेत्रात जागतिक पातळीवर

- महाराष्ट्र व विदर्भाच्या औद्योगिक विकासाला गती

- मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती

- गुंतवणुकीसाठी मोठ्या कंपन्यांकडून पुढाकार

- नागपूरच्या सभोवतालच्या परिसराचा वेगाने विकास

रिफायनरीसाठीदेखील सकारात्मक संकेत, राज्य शासनाचा पुढाकार आवश्यक

नाणार पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण झाल्यानंतर नागपुरात पेट्रोकेमिकल रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली. यासंदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सकारात्मक संकेत दिले आहे. महाराष्ट्रातील रखडलेला वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याचा विचार सुरू आहे. मात्र, हा प्रकल्प केवळ किनारपट्टीवरच नव्हेतर, राज्यात कुठेही स्थापन केल्या जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पासंदर्भात राज्याकडून किंवा गुंतवणूकदारांकडून अद्याप कोणताही ठोस प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. वार्षिक ६० दशलक्ष टन क्षमतेचा प्रकल्प महाराष्ट्रात किंवा दक्षिणेकडील राज्यात कुठेही उभारला जाऊ शकतो. केवळ एकाच ठिकाणी प्रकल्प उभारण्याऐवजी दोन किंवा अधिक ठिकाणी त्याची उपकेंद्रे उभारण्यावरदेखील विचार सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नागपुरात रिफायनरी किंवा पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारायचे असेल तर राजकीय इच्छाशक्तीचीच आवश्यकता असल्याचा उद्योगक्षेत्राचा सूर आहे.

टॅग्स :businessव्यवसायTataटाटाMihanमिहानnagpurनागपूरUday Samantउदय सामंत