शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

नागपुरात ज्येष्ठ नागरिकांना केले जातेय टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 10:14 AM

ते येतात, धाकदपट करतात. ‘पोलीस आहोत आम्ही’, असे सांगणाऱ्या या गुन्हेगारांनी उपराजधानीत प्रचंड दहशत निर्माण केली आहे.

ठळक मुद्देतोतया पोलिसांचा हैदोस सुरूचकुठे गेले स्मार्ट पोलिसिंग ?

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ते येतात, धाकदपट करतात. रहदारीच्या मार्गावर अनेकांसमोर ज्येष्ठांचे दागिने त्यांच्याच हाताने त्यांच्या अंगावरून काढून घेतात अन् पळून जातात. त्यांना ना कुणाचा धाक, न दरारा. ‘पोलीस आहोत आम्ही’, असे सांगणाऱ्या या गुन्हेगारांनी उपराजधानीत प्रचंड दहशत निर्माण केली आहे. आयुष्यभर काटकसर करून दागिन्यांच्या रुपात आपली कमाई जपणारे पीडित अशा प्रकारे लुटले गेल्यामुळे कमालीचे व्यथित झाले आहेत. वृद्धत्वामुळे आधीच हतबल झालेल्या या ज्येष्ठांना पोलिसांच्या नावाने लुटमार करणाऱ्या समाजकंटकांनी अक्षरश: हादरवून सोडले आहे.पोलीस असल्याचे सांगून अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना दोन आठवड्यांपूर्वी सीताबर्डी पोलिसांनी पकडले त्यामुळे आता पुन्हा ज्येष्ठ नागरिकांचे दागिने लुटण्याचे गुन्हे होणार नाही, असा गोड समज सर्वसामान्य नागरिकांसोबत काही पोलिसांनीही करून घेतला होता. मात्र, सोमवारी ४ जूनला एकाच दिवशी उपराजधानीत हुडकेश्वर, प्रतापनगर आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्येष्ठ नागरिकांचे दागिने लुटून नेण्याचे तीन गुन्हे घडले. त्यामुळे साऱ्यांनाच पुन्हा एकदा धसका बसला आहे.पोलिसांसारखे धडधाकट दिसणारे अन् पोलिसांसारखेच वर्तन करणारे हे गुन्हेगार ५० वर्षांपुढील महिला-पुरुषांना हेरतात. ज्येष्ठ नागरिक या गुन्हेगारांचे सॉफ्ट टार्गेट आहे. जास्त वर्दळ नसलेल्या ठिकाणी त्यांना अडवतात.त्यांच्या नजरेत आलेल्या व्यक्तीला ते स्वत:चा परिचय कधी सीबीआय, कधी सीआयडीचे अधिकारी तर कधी पोलीस आहोत म्हणून देतात. ‘समोर काही अंतरावर लुटमार झाली किंवा अन्य कोणता मोठा गुन्हा घडला, अशी थाप मारतात. तुम्हाला लुटमारीची भीती वाटत नाही का, असा प्रश्न करून तुम्ही तुमचे दागिने अंगावरून काढून पिशवीत ठेवा, असा सल्ला देतात. प्रसंगी जवळचा रुमाल किंवा कागद देतात. त्या रुमालात किंवा कागदात दागिने ठेवण्याचा बनाव करून रुमालाची ती पुठळी किंवा पुडी संबंधित व्यक्तीच्या हातात देऊन पळून जातात.कधी लुटमार झाल्याची किंवा अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे सांगूनही धाक दाखवता आणि त्यांची तपासणी करण्याच्या नावाखाली दागिने घेऊन पळून जातात. घटनेच्या काही वेळेनंतर संबंधित व्यक्तीला आपले दागिने लुटल्याचे आणि ते पोलीस नव्हे तर भामटे होते, हे लक्षात येते. विशेष म्हणजे, अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आंतरराज्यीय इराणी टोळीचा छडा तीन आठवड्यांपूर्वी सीताबर्डी पोलिसांनी लावला. १६ मे रोजी या टोळीतील हुमायूं जाफरी (वय ४३, रा. आम्बिवली मुंबई) आणि इमरान अली नाजिर अली (वय २५, रा. टिकरीटोला, शहाडोल, मध्य प्रदेश) या दोघांना सीताबर्डी पोलिसांनी अटक केली.त्यांच्याकडून पोलिसांनी १२ लाखांचे सोनेही जप्त केले. त्यांच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आल्यामुळे आता असे गुन्हे नागपुरात घडणार नाहीत, असा सर्वसामान्य नागरिक तसेच शहर पोलिसांनी भाबडा समज करून घेतला होता. मात्र, गुन्हेगारांनी तो खोटा ठरवला. सोमवारी हुडकेश्वर, प्रतापनगर आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तोतया पोलिसांनी तीन ज्येष्ठ नागरिकांचे लाखोंचे दागिने लुटून नेले.

टॅग्स :Policeपोलिस