शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा घेणे म्हणजे जीव धोक्यात घालणे होय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनाने राज्यात भयावय स्थिती निर्माण केली आहे. राज्यात पॉझिटिव्हची संख्या ५० हजारांवर पोहोचली आहे. दररोज हजाराच्या जवळपास ...

नागपूर : कोरोनाने राज्यात भयावय स्थिती निर्माण केली आहे. राज्यात पॉझिटिव्हची संख्या ५० हजारांवर पोहोचली आहे. दररोज हजाराच्या जवळपास मृत्यूचा आकडा आहे. औषधांचा तुटवडा, बेडची अनुपलब्धता, लसीकरणाचा फज्जा ही सर्व परिस्थिती सरकार व प्रशासनासाठी डोईजड झाली आहे. अशात राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे आयोजन एप्रिल महिन्याच्या २३ आणि २९ पासून केले आहे. परीक्षेच्या आयोजनात लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लागणार आहेत. ३२ लाखांवर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यापुढे ठाकलेली परिस्थिती लक्षात घेता परीक्षेचे आयोजन म्हणजे जीव धोक्यात घालणे होय, असा सूर शिक्षण क्षेत्रातून उमटतो आहे. शिक्षकांच्या संघटनांकडून, आमदारांसोबतच शिक्षण तज्ज्ञांकडून बोर्डाकडे निवेदने पाठविली जात आहेत.

सरकारने जसे पहिली ते आठवी आणि नववी व अकराव्या वर्गातील विद्यार्थ्यांना वर्गोन्नती दिली, हाच नियम दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबतीत लावण्यात यावा, अशीही मागणी होत आहे. परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लागणार आहेत. शिक्षकांना प्रशासनाने कोरोनाच्या कामात सहभागी करून घेतले आहे. अनेक शिक्षक पॉझिटिव्हसुद्धा येत आहेत. शिक्षकांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे जिवाच्या भीतीने परीक्षेत सहकार्य करण्यास शिक्षक तयार नाहीत. त्याचबरोबर वर्षभर शाळा बंद असल्याने कर्मचारी उपलब्ध नाहीत. स्वयं अर्थसहायित शिक्षकांना घरी बसावे लागले आहे. संक्रमण इतके वाढले आहे की कोण कधी पॉझिटिव्ह निघेल सांगता येत नाही. त्यामुळे परीक्षा स्थगित कराव्यात, अथवा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी होत आहे.

- या परीक्षेसाठी लाखावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लागणार आहेत. ३० लाखांवर विद्यार्थी राज्यभरात परीक्षा देणार आहेत. सध्या परिस्थिती खूप वाईट आहे. अशात विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेण्याचा अट्टाहास शासनाने सोडायला हवा. परीक्षेचे आयोजन करून जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.

नागो गाणार, शिक्षक आमदार

- अशा परिस्थितीत हट्ट करून परीक्षा घेतल्यास परीक्षेदरम्यान काही अघटित प्रकार घडला व सुरू झालेली परीक्षा मध्येच थांबवावी लागली तर ते योग्य होणार नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व शैक्षणिक नियोजन आणि वेळापत्रक कोलमडले आहेच. त्यामध्ये सुधारणा करून जून महिन्यात त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षेचे आयोजन करावे. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आणि काही संस्थांनी एप्रिल व मे हे दोन महिने कोरोनाच्या दृष्टीने घातक असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे परीक्षा तूर्तास स्थगित करणे हे शहाणपणाचे ठरेल.

पुरुषोत्तम पंचभाई, अध्यक्ष, महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळ

- वर्षभरापासून शाळा बंद असल्याने खासगी अंदाजे तीन लाख विनाअनुदानित शिक्षक बेरोजगार झालेले आहेत. त्यांना शासनाने कुठलीही आर्थिक मद्त केलेली नाही. त्यामुळे दहावी व बारावी परीक्षेवर कोरोना संक्रमणाबरोबरच खासगी शाळा व शिक्षक यांच्या आर्थिक अडचणीमुळे ते शाळेत येण्यास तयार नाहीत. कोरोना वेगाने पसरत असल्याने शिक्षणमंत्र्यांनी तातडीने याचा विचार करून परीक्षा पुढे ढकलावी किंवा रद्द करून वर्गोन्नती द्यावी.

प्रा. सचिन काळबांडे, अध्यक्ष, आरटीई फाउंडेशन