शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही रेशन दुकानातून घ्या धान्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:56 IST

रेशन कार्डधारकांना आता धान्यासाठी केवळ आपल्याच रेशन दुकानावर अवलंबून राहण्याची गरज नाही. केवळ शहरातीलच नव्हे तर राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्ती कुठल्याही जिल्ह्यातील रेशन दुकानातून आपल्या हक्काचे धान्य घेऊ शकतो. नागपूरने राबवलेला हा प्रयोग सध्या संपूर्ण राज्यात राबवला जात आहे, हे विशेष.

ठळक मुद्देरेशन कार्डधारकांसाठीही ‘पोर्टेबिलिटी’ : नागपूरने राबवलेला प्रयोग राज्यभरात

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेशन कार्डधारकांना आता धान्यासाठी केवळ आपल्याच रेशन दुकानावर अवलंबून राहण्याची गरज नाही. केवळ शहरातीलच नव्हे तर राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्ती कुठल्याही जिल्ह्यातील रेशन दुकानातून आपल्या हक्काचे धान्य घेऊ शकतो. नागपूरने राबवलेला हा प्रयोग सध्या संपूर्ण राज्यात राबवला जात आहे, हे विशेष.मोबाईल ग्राहकांना ज्याप्रमाणे मोबाईल नंबर न बदलता कंपनी बदलविता येते, त्याच प्रकारची ‘पोर्टेबिलिटी’ची सेवा आता रेशन कार्डधारकांसाठीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेमुळे कार्डधारक कोणत्याही रेशन दुकानातून आपल्या हक्काचे धान्य माफक दरात विकत घेऊ शकतो.सार्वजनिक वितरण व्यवस्थेत असलेल्या त्रुटी दूर व्हाव्यात, या उद्देशाने राज्य शासनाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी एईपीडीएस आणि आधार लिंक करण्यास सुरुवात केली. नागपूर शहरात ९९.९५ टक्के रेशनकार्ड आधारने जोडण्यात आले. नागपूर रेशन विभागाचे एकूण काम पाहता सरकारने नागपूर शहरात पायलट प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय घेतला. आधार आधारित सार्वजनिक वितरण व्यवस्था असे याला नाव देण्यात आले. यात नागपूर शहरातील रेशन कार्डचे डिजिटायझेशन करण्यात आले. प्रत्येक रेशन कार्डला आरसीआयडी (रेशन कार्ड आयडेन्टीफिकेशन नंबर) देण्यात आले. यासोबतच शहरातील सर्व ६६५ रेशन दुकानांना पॉस मशीन (पॉर्इंट आॅफ सेल) मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. या मशीनद्वारे धान्य विक्रीचे व्यवहार होऊ लागले. एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रत्येक व्यवहार अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून पाहता येत आहे. आधार लिंक व आरसीआयडी नंबरमुळे पोर्टेबिलिटीची सुविधाही उपलब्ध करून देता आली. ही प्रणाली आता संपूर्ण राज्यात अवलंबिली जात आहे. सार्वजनिक धान्य वितरणात पारदर्शकतासार्वजनिक अन्न पुरवठा विभागात नवीन आधुनिक प्रणाली विकसित झाल्याने धान्य वितरणात पारदर्शकता आली आहे. आम्ही एका ठिकणी बसून राज्यातील कुठल्याही रेशन दुकनातील व्यवहारांवर लक्ष ठेवू शकतो. तसेच पोर्टेबिलिटीमुळे ग्राहकांनाही आता अधिक सुविधा झाली आहे. त्याचा उपयोही सुरू झाला आहे.पी.एस. काळेजिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी 

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर