शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या - विजय वडेट्टीवार यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन

By कमलेश वानखेडे | Updated: December 5, 2023 16:50 IST

वडेट्टीवार म्हणाले, पूर्वी भाजप सत्तेत नसताना भाजप नेतेही ईव्हीएम बंद करण्याची भूमिका मांडत होते. ईव्हीएम भरवश्यावर काँग्रेस जिंकते, असा आरोप त्यावेळी करायचे.

नागपूर : अमेरिका सारख्या देशाने ईव्हीएम बंद केले आहे. भारतातही लोकांच्या मनात संभ्रम आहे. निवडणूक प्रामाणिकपणे घेतो असे तुम्ही सांगता, तर एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. उद्धव ठाकरे म्हणाले तसा प्रयोग झाला पाहिजे. त्यामुळे लोकांच्या मनातील संशय दूर होईल, अशी मागणी करीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएमबाबत मांडलेल्या भूमिकेचे समर्थन केले.

वडेट्टीवार म्हणाले, पूर्वी भाजप सत्तेत नसताना भाजप नेतेही ईव्हीएम बंद करण्याची भूमिका मांडत होते. ईव्हीएम भरवश्यावर काँग्रेस जिंकते, असा आरोप त्यावेळी करायचे. भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत नाना पाटोले हे पोटनिवडणूक ६७ हजार मतांनी निवडून आले. त्यानंतर सहा महिन्यात झालेल्यालोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार अडीच लाख मातांनी निवडून येतो. सहा महिन्यात इतके मतपरिवर्तन कसे घडून येते, असा प्रश्न उपस्थित करीत यामुळे जनतेच्या मनात संशय असल्याचे त्यांनी सांगितले.

शासन आपल्या दारीसाठी सरकारी तिजोरीतून खर्च

शासकीय पातळीवर प्रश्न सुटत नाहीत म्हणून लोक मंत्रालयात येतात. मंत्रालयापुढे मोठी रांग लागते. मात्र, आता मंत्रालयात प्रवेश नाकारला जातो. याचा अर्थ स्पष्ट आहे प्रश्न सुटत नाहीत तर मग शासन आपल्या दारी कार्यक्रम का घेता ? शासनाच्या तिजोरीतीन खर्च करून हे मेळावे घेणे सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसBJPभाजपा