शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

कोरोनानंतर मधुमेहाने त्रस्त आहात? तुळशीचे पान अन् पनीर फूल घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 17:42 IST

शरीरातील मेदाचा नाश करणे, भूक वाढविणे, पाचनक्रिया उत्तम करणे, लंग्जची क्षमता वाढविणे, श्वसनाचे आजार दूर करणे, खोकला-सर्दी दूर होणे आदी अनेक उपयुक्त कार्य तुळशीने होतात. तर, पनीर फूल किंवा पनीर डोडा मधुमेही रुग्णांसाठी हे उत्तम मानले जाते.

ठळक मुद्देमधुमेहावर रामबाण उपाय आयुर्वेदात दडल्या आहेत सहज उपलब्ध होणाऱ्या औषधी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाचा काळ ओसरत असला तरी कोरोनाबाधितांमध्ये आफ्टर प्रॉब्लेम्स प्रकर्षाने जाणवत आहेत. त्यात मधुमेह हा कॉमन आजार असल्याचे दिसून येते. या आजारावर रामबाण उपाय म्हणून प्रत्येकाच्या घरी असलेली तुळस आणि किराणा दुकानात सहज उपलब्ध होणारे पनीर फूल अर्थात पनीर डोडा हे आहेत. मात्र, या औषधांची मात्रा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेणे गरजेचे आहे. अन्यथा, त्याचे दुष्परिणामही जाणवायला लागतात.

भारतीय संस्कृतीत तुळशीच्या रोपट्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. शिवाय, ऑक्सिजनचा अहोरात्र पुरवठा करणारे रोप म्हणूनही तुळस महत्त्वाची मानली जाते. शरीरातील मेदाचा नाश करणे, भूक वाढविणे, पाचनक्रिया उत्तम करणे, लंग्जची क्षमता वाढविणे, श्वसनाचे आजार दूर करणे, खोकला-सर्दी दूर होणे आदी अनेक उपयुक्त कार्य तुळशीने होतात. मधुमेहाचा स्तर कमी करणे, पॅनक्रियाजची ताकद वाढवणे आदी कार्य तुळशीमुळे होतात. तुळशी ही ॲण्टीडायबिटीक्स म्हणून सर्वोत्तम आहे.

तुळशीचा उपचार कसा घ्यावा

सकाळी तुळशीचे पान खुडून त्याचा रस तयार करावा. सकाळ-संध्याकाळ २० मिली.पर्यंत घेणे उत्तम. यामुळे, डायबिटिज कंट्रोल तर होतेच. त्याचे अन्य फायदेही आहेत.

मधुमेहावर कारगर पनीर फूल

पनीर फूल किंवा पनीर डोडा हे किराणा दुकानात सहज उपलब्ध होणारे आयुर्वेदिक औषध आहे. मधुमेही रुग्णांसाठी हे सर्वोत्तम मानले जाते. पांढऱ्या रंगाचे अतिशय हलके असे हे फुल आहे.

पनीर फूल कसे घ्यावे

रोज रात्री व सकाळी आठ ते दहा तास पेलाभर पाण्यात भिजू टाकावे. त्यानंतर ते फूल कुचकरून चाळणीने व्यवस्थित गाळून घ्यावे. गाळलेले पाणी प्यावे. ही प्रक्रिया ताजी असावी. रात्री भिजू टाकलेले फूल सकाळी व सकाळी भिजू टाकलेले फूल रात्री घ्यावे. यामुळे मधुमेह नियंत्रित होतो.

आवळा, हळद, गुडमार आदी उपयुक्त

यासोबत आवळा-हळद हे मेद कमी करणाऱ्या वस्तू आहेत. हे घेतल्याने मेद मुत्रावाटे निघून जाते. त्यामुळे, इन्शुलिनची प्रक्रिया सुलभ होते. शिवाय, गुडमार/विजेसारचे पेले मिळतात. यात रात्रभर पाणी ठेवून ते सकाळी पिल्याने आरोग्यासाठी उत्तम आहे. सप्तपर्ण, सप्तरंगी औषधीही मधुमेहावर उत्तम आहेत. कारले, जांभूळ, कर्कटश्रुंगी, मेथी दाणा, कुटकी याचा चूर्ण घेतल्यास मधुमेह मुळासकट घालवता येतो. यासाठी मात्र आहारतंत्र योग्य असणे गरजेचे आहे.

अति तेथे माती

कोरोनाकाळात अनेकांनी स्वयंपाक घरात तयार केलेला काढा घेतला. अनेकांना त्याचे लाभही झाले. मात्र, ते कसे घ्यावे, किती घ्यावे याचा अंदाज नसल्याने त्याचे दुष्परिणामही नंतर जाणवायला लागले. त्यामुळे, कुठलेही उपचार घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अन्यथा जास्त मात्रा झाली की दुष्परिणाम सुरू होतात.

- डॉ. नीतेश खोंडे, आयुर्वेद तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स