शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

कोरोनानंतर मधुमेहाने त्रस्त आहात? तुळशीचे पान अन् पनीर फूल घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 17:42 IST

शरीरातील मेदाचा नाश करणे, भूक वाढविणे, पाचनक्रिया उत्तम करणे, लंग्जची क्षमता वाढविणे, श्वसनाचे आजार दूर करणे, खोकला-सर्दी दूर होणे आदी अनेक उपयुक्त कार्य तुळशीने होतात. तर, पनीर फूल किंवा पनीर डोडा मधुमेही रुग्णांसाठी हे उत्तम मानले जाते.

ठळक मुद्देमधुमेहावर रामबाण उपाय आयुर्वेदात दडल्या आहेत सहज उपलब्ध होणाऱ्या औषधी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाचा काळ ओसरत असला तरी कोरोनाबाधितांमध्ये आफ्टर प्रॉब्लेम्स प्रकर्षाने जाणवत आहेत. त्यात मधुमेह हा कॉमन आजार असल्याचे दिसून येते. या आजारावर रामबाण उपाय म्हणून प्रत्येकाच्या घरी असलेली तुळस आणि किराणा दुकानात सहज उपलब्ध होणारे पनीर फूल अर्थात पनीर डोडा हे आहेत. मात्र, या औषधांची मात्रा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेणे गरजेचे आहे. अन्यथा, त्याचे दुष्परिणामही जाणवायला लागतात.

भारतीय संस्कृतीत तुळशीच्या रोपट्याला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. शिवाय, ऑक्सिजनचा अहोरात्र पुरवठा करणारे रोप म्हणूनही तुळस महत्त्वाची मानली जाते. शरीरातील मेदाचा नाश करणे, भूक वाढविणे, पाचनक्रिया उत्तम करणे, लंग्जची क्षमता वाढविणे, श्वसनाचे आजार दूर करणे, खोकला-सर्दी दूर होणे आदी अनेक उपयुक्त कार्य तुळशीने होतात. मधुमेहाचा स्तर कमी करणे, पॅनक्रियाजची ताकद वाढवणे आदी कार्य तुळशीमुळे होतात. तुळशी ही ॲण्टीडायबिटीक्स म्हणून सर्वोत्तम आहे.

तुळशीचा उपचार कसा घ्यावा

सकाळी तुळशीचे पान खुडून त्याचा रस तयार करावा. सकाळ-संध्याकाळ २० मिली.पर्यंत घेणे उत्तम. यामुळे, डायबिटिज कंट्रोल तर होतेच. त्याचे अन्य फायदेही आहेत.

मधुमेहावर कारगर पनीर फूल

पनीर फूल किंवा पनीर डोडा हे किराणा दुकानात सहज उपलब्ध होणारे आयुर्वेदिक औषध आहे. मधुमेही रुग्णांसाठी हे सर्वोत्तम मानले जाते. पांढऱ्या रंगाचे अतिशय हलके असे हे फुल आहे.

पनीर फूल कसे घ्यावे

रोज रात्री व सकाळी आठ ते दहा तास पेलाभर पाण्यात भिजू टाकावे. त्यानंतर ते फूल कुचकरून चाळणीने व्यवस्थित गाळून घ्यावे. गाळलेले पाणी प्यावे. ही प्रक्रिया ताजी असावी. रात्री भिजू टाकलेले फूल सकाळी व सकाळी भिजू टाकलेले फूल रात्री घ्यावे. यामुळे मधुमेह नियंत्रित होतो.

आवळा, हळद, गुडमार आदी उपयुक्त

यासोबत आवळा-हळद हे मेद कमी करणाऱ्या वस्तू आहेत. हे घेतल्याने मेद मुत्रावाटे निघून जाते. त्यामुळे, इन्शुलिनची प्रक्रिया सुलभ होते. शिवाय, गुडमार/विजेसारचे पेले मिळतात. यात रात्रभर पाणी ठेवून ते सकाळी पिल्याने आरोग्यासाठी उत्तम आहे. सप्तपर्ण, सप्तरंगी औषधीही मधुमेहावर उत्तम आहेत. कारले, जांभूळ, कर्कटश्रुंगी, मेथी दाणा, कुटकी याचा चूर्ण घेतल्यास मधुमेह मुळासकट घालवता येतो. यासाठी मात्र आहारतंत्र योग्य असणे गरजेचे आहे.

अति तेथे माती

कोरोनाकाळात अनेकांनी स्वयंपाक घरात तयार केलेला काढा घेतला. अनेकांना त्याचे लाभही झाले. मात्र, ते कसे घ्यावे, किती घ्यावे याचा अंदाज नसल्याने त्याचे दुष्परिणामही नंतर जाणवायला लागले. त्यामुळे, कुठलेही उपचार घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अन्यथा जास्त मात्रा झाली की दुष्परिणाम सुरू होतात.

- डॉ. नीतेश खोंडे, आयुर्वेद तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स