शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

नागपूर जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या हातात आले टॅबलेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 11:36 IST

शून्य ते सहा वयोगटातील बालकांना अंगणवाडीचा लाभ देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीतच आधारकार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक अंगणवाडी पर्यवेक्षिकांना टॅबलेट देण्यात आले आहे.

ठळक मुद्देबालकांच्या आधार कार्डसाठी विभागाचा उपक्रम १२६ पर्यवेक्षिकांना टॅबचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधारकार्डशिवाय कुठलीही शासकीय योजना राबविण्यात येऊ नये, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. अंगणवाडीत लाभ घेणाऱ्या शून्य ते सहा वर्षे वयोगटाच्या बालकांचे तसेच ग्रामीण भागातील महिलांचे आजही आधारकार्ड नाही. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेली आधारकार्ड मोहीम शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे शून्य ते सहा वयोगटातील बालकांना अंगणवाडीचा लाभ देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीतच आधारकार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक अंगणवाडी पर्यवेक्षिकांना टॅबलेट देण्यात आले आहे.महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना राबविण्यात येते. शासनाने आधार सक्ती केल्याने या योजनेंतर्गतचा लाभ बंद होऊ नये म्हणून बालकांची आधार नोंदणी आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यात आधार नोंदणी केंद्रांची कमतरता असल्याने लाभार्थी बालक, मातांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या माध्यमातून बालकांचे आधारकार्ड काढण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी १२६ पर्यवेक्षिकांना टॅबलेट देण्यात आले आहे. लवकरच अंगणवाड्यांमध्ये बालकांच्या आधार नोंदणीला सुरुवात होणार आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पूरक पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी व संदर्भ सेवा पुरविण्यात येतात. या योजनेंतर्गतचा लाभ देताना बोगस लाभार्थी दाखविण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोगस लाभार्थीला चाप बसावा या दृष्टिकोनातून लाभार्थ्यांची आधार नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांची आधार नोंदणी झालेली आहे व त्यांचे आधारकार्ड योजनेशी जोडण्यात आले आहे. अंगणवाडीतील सर्व बालकांच्या आधार क्रमांकाची माहिती संकलित केली जात आहे. तसेच ज्यांनी आधार नोंदणी केली नाही किंवा ज्यांच्याकडे आधारकार्डच नाही अशा बालकांचे आधारकार्ड काढण्याचे काम पर्यवेक्षिकांना देण्यात आले आहे. या टॅबमध्ये आधार नोंदणी अ‍ॅपही डाऊनलोड केले आहे. त्यांना आधारकार्ड काढण्याचे प्रशिक्षण दिले आहे. शासनाकडून आधार नोंदणी आयडी येताच शहर व ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमध्ये नोंदणीला प्रारंभ होणार आहे.

ग्रामीण भागात ४० टक्के महिला आधारविनाअंगणवाडीतून बालकांबरोबरच किशोरवयीन मुली व स्तनदा मातांना सुद्धा लाभ देण्यात येतो. महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनास आले की, ४० टक्के युवती, महिलांजवळ अजूनही आधारकार्ड नाही. ग्रामीण भागात आधार नोंदणी केंद्र अत्यल्प असल्याने, शून्य ते सहा वयोगटातील बालकांचे आधार कार्डच नाही. त्यामुळे आधार नोंदणीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो आहे.- भागवत तांबे, महिला व बालविकास अधिकारी, जि.प.

टॅग्स :Governmentसरकारtabletटॅबलेट