शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या बाजूला फार बघू नका..., धोका आहे...!", भरसंसदेत उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांना नेमकं काय म्हणाले खर्गे?
2
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
3
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
4
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
5
परदेशी झगमगाट हवा होता, अन् झाली जैश-ए-मोहम्मदची कमांडर! डॉक्टर शाहीनची ३ निकाहानंतरही एक इच्छा अपूर्ण
6
500 km रेंज, टॉप क्लास फीचर्स; लॉन्चला एक दिवस बाकी; कशी आहे मारुतीची पहिली EV कार?
7
पत्नीने PUBG खेळू दिले नाही, पतीने बायकोची हत्या केली; सहा महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
8
मार्गशीर्ष भौम प्रदोष २०२५: मंगलदोष मुक्त, हनुमंत प्रसन्न; ‘असे करा’ शिवव्रत, शुभ-लाभ होतील!
9
५० वर्षांनी चतुर्ग्रही योग: ९ राशींना कल्पनेपलीकडे चौफेर लाभ; चौपट नफा-फायदा, मनासारखा काळ!
10
पराभवाच्या चर्चेने विरोधक संतप्त, नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेची आठवण करून दिली
11
उघडताच पूर्ण भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट प्रीमिअमवरुन बंपर लिस्टिंगची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Renuka Chaudhary: चक्क श्वानाला घेऊन काँग्रेस खासदार संसदेत पोहचल्या; सत्ताधारी भाजपानं घातला गोंधळ, काय घडलं?
13
मोठा निष्काळजीपणा! मध्य प्रदेशात ५० वर्षे जुना पूल कोसळला; १० जण जखमी
14
अर्थव्यवस्थेसाठी 'चिंताजनक' बातमी! रुपया डॉलरपुढे गडगडला, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट होणार परिणाम!
15
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
16
अफगाणिस्तानने उघडला नवा मार्ग, पाकिस्तानमध्ये हाहाकार; सीमेवरील व्यापार बंदीचा उलटाच झाला परिणाम
17
Holiday: डिसेंबरमध्ये शेअर बाजारात ९ दिवस कामकाज बंद! तुमचं ट्रेडिंग प्लॅनिंग आजच करा! ही घ्या सुट्टीची संपूर्ण यादी
18
यशस्वीची 'तेरे नाम' हेअर स्टाइल पाहून विराटमध्ये अवतरला सलमान; "लगन लगी.." स्टेप्सचा व्हिडिओ व्हायरल
19
Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
20
एका झटक्यात चांदीची किंमत ९३८१ रुपयांनी वाढली, सोन्यातही जोरदार वाढ; पाहा नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील ९ जागांवर स्वाभिमानीचा दावा

By admin | Updated: July 20, 2014 23:30 IST

विधानसभा निवडणुकीत विदर्भातील ९ जागा लढण्यास स्वाभीमानी शेतकरी संघटना तयार आहे.

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीत विदर्भातील ९ जागा लढण्यास स्वाभीमानी शेतकरी संघटना तयार आहे. या जागांसाठी महायुतीकडे दावा केला जाईल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, खा. राजू शेट्टी यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. लोकसभा निवडणुकीनंतर खा. राजू शेट्टी हे चिखली येथील एल्गार मेळाव्यानिमित्त प्रथमच विदर्भाच्या दौर्‍यावर आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. विदर्भातील चिखली, खामगाव, बाळापूर, कारंजा लाड, वणी, वरूड, रामटेक, देवळी आणि काटोल हे ९ विधानसभा मतदारसंघ लढण्यास सक्षम उमेदवार संघटनेकडे असल्याचे खा. राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले. विदर्भातील ९ जागांसह राज्यातील ६५ विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थिती मजबूत आहे. त्यामुळे यासंदर्भातही संघटना महायुतीशी चर्चा करणार आहे. महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतरच कोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करायचे, याबाबत निर्णय घेण्यात येईल. लोकसभेप्रमाणे विधानसभेचाही जागा वाटपाचा तिढा सोडविला जाईल, असे ते म्हणाले. विदर्भातील शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्यांवर खा.शेट्टी यांनी चिंता व्यक्त केली. शेतकर्‍यांचे विज बिल माफ करावे, त्यांचा सातबारा कोरा करावा, डॉ. स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना ५0 हजार रूपये प्रति एकर नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यासाठी संघटना लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.कांदे, बटाटे यांचा जिवनावश्यक वस्तुंमध्ये समावेश केल्यामुळे, या उत्पादनाला हमी भाव देण्याची जबाबदारीही केंद्र सरकारची असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांचे ७२ हजार कोटी रूपये माफ केल्याचा दावा केंद्रातील युपीए सरकारकडून केला जातो. प्रत्यक्षात हा आकडा ५२ हजार कोटी रूपये असून, उद्योगपतींना मात्र २७ हजार कोटी रूपये शासनाने माफ केले असल्याचा आरोप त्यांनी केला. सिंचन घोटाळा, शेतकर्‍यांच्या मालास हमी भाव या मुद्यांवर विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.बुलडाणा जिल्हा बँकेच्या संचालकांवरिूध्द कारवाई करण्याची मागणी खा. शेट्टी यांनी यावेळी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कोणत्याही गावगुंडांना भित नाहीत. काँग्रेसने त्यांच्या आमदाराला आवरावे, अन्यथा काँग्रेसच्या नेत्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराही खा. शेट्टी यांनी दिला. यावेळी संघटनेचे स्थानिक तसेच प्रदेश स्तरावरील नेतेही उपस्थित होते.