शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

विदर्भातील ९ जागांवर स्वाभिमानीचा दावा

By admin | Updated: July 20, 2014 23:30 IST

विधानसभा निवडणुकीत विदर्भातील ९ जागा लढण्यास स्वाभीमानी शेतकरी संघटना तयार आहे.

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीत विदर्भातील ९ जागा लढण्यास स्वाभीमानी शेतकरी संघटना तयार आहे. या जागांसाठी महायुतीकडे दावा केला जाईल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, खा. राजू शेट्टी यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. लोकसभा निवडणुकीनंतर खा. राजू शेट्टी हे चिखली येथील एल्गार मेळाव्यानिमित्त प्रथमच विदर्भाच्या दौर्‍यावर आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. विदर्भातील चिखली, खामगाव, बाळापूर, कारंजा लाड, वणी, वरूड, रामटेक, देवळी आणि काटोल हे ९ विधानसभा मतदारसंघ लढण्यास सक्षम उमेदवार संघटनेकडे असल्याचे खा. राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले. विदर्भातील ९ जागांसह राज्यातील ६५ विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थिती मजबूत आहे. त्यामुळे यासंदर्भातही संघटना महायुतीशी चर्चा करणार आहे. महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतरच कोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करायचे, याबाबत निर्णय घेण्यात येईल. लोकसभेप्रमाणे विधानसभेचाही जागा वाटपाचा तिढा सोडविला जाईल, असे ते म्हणाले. विदर्भातील शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्यांवर खा.शेट्टी यांनी चिंता व्यक्त केली. शेतकर्‍यांचे विज बिल माफ करावे, त्यांचा सातबारा कोरा करावा, डॉ. स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना ५0 हजार रूपये प्रति एकर नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यासाठी संघटना लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.कांदे, बटाटे यांचा जिवनावश्यक वस्तुंमध्ये समावेश केल्यामुळे, या उत्पादनाला हमी भाव देण्याची जबाबदारीही केंद्र सरकारची असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांचे ७२ हजार कोटी रूपये माफ केल्याचा दावा केंद्रातील युपीए सरकारकडून केला जातो. प्रत्यक्षात हा आकडा ५२ हजार कोटी रूपये असून, उद्योगपतींना मात्र २७ हजार कोटी रूपये शासनाने माफ केले असल्याचा आरोप त्यांनी केला. सिंचन घोटाळा, शेतकर्‍यांच्या मालास हमी भाव या मुद्यांवर विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.बुलडाणा जिल्हा बँकेच्या संचालकांवरिूध्द कारवाई करण्याची मागणी खा. शेट्टी यांनी यावेळी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कोणत्याही गावगुंडांना भित नाहीत. काँग्रेसने त्यांच्या आमदाराला आवरावे, अन्यथा काँग्रेसच्या नेत्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराही खा. शेट्टी यांनी दिला. यावेळी संघटनेचे स्थानिक तसेच प्रदेश स्तरावरील नेतेही उपस्थित होते.