शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Saif Ali Khan: धावत्या ट्रेनमध्ये ज्याला ताब्यात घेतले त्याला गुन्हाच नव्हता माहिती, काय केला...; त्याला वाटत होते...

By नरेश डोंगरे | Updated: January 19, 2025 19:51 IST

कथित संशयीताला दुर्ग आरपीएफने धावत्या गाडीत पकडले आणि शनिवारी रात्री देशभरात हे वृत्त प्रसिद्ध झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला करण्याच्या आरोपात संशयीत म्हणून पकडला गेलेला आणि विनाकारण बदनाम झालेल्या आकाश नामक तरुणाचा या प्रकरणाशी काडीचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तोपर्यंत झालेल्या चाैकशीने त्याची पुरती त्रेधातिरपट उडवली होती. आपण केले काय अन् झाले काय, अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे आता पुन्हा 'डब्ल्यूटी' जाणार नाही, असे तो वारंवार ओरडून सांगत होता. खरा आरोपी पोलिसांच्या हाती लागेपर्यंतच्या घटनाक्रमाची शिर्षस्थ सूत्रांकडून मिळालेली माहिती पुढीलप्रमाणे आहे.

देशभर चर्चेला आलेल्या या प्रकरणातील संशयीत ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने कोलकाताकडे पळून जात असल्याचा मेसेज शनिवारी दुपारी मुंबई पोलिसांकडून नागपूर, रायपूर विभागातील रेल्वे पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाला मिळाला. त्यामुळे रेल्वेची यंत्रणा खडबडून कामाला लागली होती. कथित संशयीताला दुर्ग आरपीएफने धावत्या गाडीत पकडले आणि शनिवारी रात्री देशभरात हे वृत्त प्रसिद्ध झाले. तिकडे संशयीत आरोपी सापडल्याची माहिती कळताच मुंबई पोलिसांचे विशेष पथक तडकाफडकी विमानाने रायपूरला पोहचले. त्यानंतर दुर्ग आरपीएफच्या ताब्यातून त्याला उशिरा रात्री ताब्यात घेऊन हे पथक मुंबईला पोहचले. त्यानंतरच्या काही तासातच दुसरा घटनाक्रम घडला. ज्या गुन्ह्यात संशयीत म्हणून आकाशची चाैकशी सुरू होती, त्यातील खरा गुन्हेगार पोलिसांनी जेरबंद केला. नंतर मात्र संशयीत आकाश 'दयेचा पात्र' ठरला.

गुन्ह्याची जाण, मात्र...आकाशला 'त्याने' केलेल्या गुन्ह्याची जाण होती. त्यामुळे दुर्ग आरपीएफच्या ताब्यात असताना त्याने कान पकडून पुन्हा असे करणार नाही, वगैरे सांगितले. केलेल्या गुन्ह्याची 'शिक्षा म्हणून दंड' भरण्याचीही त्याची मानसिकता होती. मात्र, थेट मुंबई पोलिसांनीच येऊन त्याला ताब्यात घेतल्यानंतर तो हादरला. आपण केलेला गुन्हा एवढा गंभीर कधीपासून झाला, हेच त्याला कळेना.

काय होता गुन्हाआरपीएफच्या सूत्रांनुसार, आकाश कुलाबा, मुंबई भागात राहतो. तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याची आजी बिलासपूर (छत्तीसगड) मध्ये राहते. तिला भेटण्यासाठी तो शनिवारी ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने नागपूर मार्गे बिलासपूरला जाणार होता. मात्र, रेल्वेतून प्रवास करताना त्याने तिकिटच काढले नव्हते. अर्थात तो विनातिकिट (डब्ल्यूटी) प्रवास करीत होता. दुर्ग आरपीएफने ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला 'विनातिकिट प्रवासाच्या आरोपात पकडले असावे', असा आकाशचा समज झाला.

प्रश्नांची सरबत्ती अन् कानशेकणीही

विनातिकिटचा गुन्हा सोडून पोलीस भलत्याच गुन्ह्याच्या संबंधाने त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती होत होती. तो वारंवार अनभिज्ञता दर्शवित असल्याने त्याची 'कानशेकणीही' झाली. अखेर सैफ हल्ला प्रकरणातील खरा गुन्हेगार पकडला गेला अन् पोलिसांसकट आकाशनेही सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या आधारेच आम्ही त्याला ताब्यात घेतले होते, असे आरपीएफ दुर्गचे पोलीस निरीक्षक एस. के. सिन्हा यांनी 'लोकमत'ला सांगितले.

टॅग्स :Saif Ali Khanसैफ अली खान Crime Newsगुन्हेगारी