शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

Saif Ali Khan: धावत्या ट्रेनमध्ये ज्याला ताब्यात घेतले त्याला गुन्हाच नव्हता माहिती, काय केला...; त्याला वाटत होते...

By नरेश डोंगरे | Updated: January 19, 2025 19:51 IST

कथित संशयीताला दुर्ग आरपीएफने धावत्या गाडीत पकडले आणि शनिवारी रात्री देशभरात हे वृत्त प्रसिद्ध झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला करण्याच्या आरोपात संशयीत म्हणून पकडला गेलेला आणि विनाकारण बदनाम झालेल्या आकाश नामक तरुणाचा या प्रकरणाशी काडीचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तोपर्यंत झालेल्या चाैकशीने त्याची पुरती त्रेधातिरपट उडवली होती. आपण केले काय अन् झाले काय, अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे आता पुन्हा 'डब्ल्यूटी' जाणार नाही, असे तो वारंवार ओरडून सांगत होता. खरा आरोपी पोलिसांच्या हाती लागेपर्यंतच्या घटनाक्रमाची शिर्षस्थ सूत्रांकडून मिळालेली माहिती पुढीलप्रमाणे आहे.

देशभर चर्चेला आलेल्या या प्रकरणातील संशयीत ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने कोलकाताकडे पळून जात असल्याचा मेसेज शनिवारी दुपारी मुंबई पोलिसांकडून नागपूर, रायपूर विभागातील रेल्वे पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाला मिळाला. त्यामुळे रेल्वेची यंत्रणा खडबडून कामाला लागली होती. कथित संशयीताला दुर्ग आरपीएफने धावत्या गाडीत पकडले आणि शनिवारी रात्री देशभरात हे वृत्त प्रसिद्ध झाले. तिकडे संशयीत आरोपी सापडल्याची माहिती कळताच मुंबई पोलिसांचे विशेष पथक तडकाफडकी विमानाने रायपूरला पोहचले. त्यानंतर दुर्ग आरपीएफच्या ताब्यातून त्याला उशिरा रात्री ताब्यात घेऊन हे पथक मुंबईला पोहचले. त्यानंतरच्या काही तासातच दुसरा घटनाक्रम घडला. ज्या गुन्ह्यात संशयीत म्हणून आकाशची चाैकशी सुरू होती, त्यातील खरा गुन्हेगार पोलिसांनी जेरबंद केला. नंतर मात्र संशयीत आकाश 'दयेचा पात्र' ठरला.

गुन्ह्याची जाण, मात्र...आकाशला 'त्याने' केलेल्या गुन्ह्याची जाण होती. त्यामुळे दुर्ग आरपीएफच्या ताब्यात असताना त्याने कान पकडून पुन्हा असे करणार नाही, वगैरे सांगितले. केलेल्या गुन्ह्याची 'शिक्षा म्हणून दंड' भरण्याचीही त्याची मानसिकता होती. मात्र, थेट मुंबई पोलिसांनीच येऊन त्याला ताब्यात घेतल्यानंतर तो हादरला. आपण केलेला गुन्हा एवढा गंभीर कधीपासून झाला, हेच त्याला कळेना.

काय होता गुन्हाआरपीएफच्या सूत्रांनुसार, आकाश कुलाबा, मुंबई भागात राहतो. तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याची आजी बिलासपूर (छत्तीसगड) मध्ये राहते. तिला भेटण्यासाठी तो शनिवारी ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने नागपूर मार्गे बिलासपूरला जाणार होता. मात्र, रेल्वेतून प्रवास करताना त्याने तिकिटच काढले नव्हते. अर्थात तो विनातिकिट (डब्ल्यूटी) प्रवास करीत होता. दुर्ग आरपीएफने ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला 'विनातिकिट प्रवासाच्या आरोपात पकडले असावे', असा आकाशचा समज झाला.

प्रश्नांची सरबत्ती अन् कानशेकणीही

विनातिकिटचा गुन्हा सोडून पोलीस भलत्याच गुन्ह्याच्या संबंधाने त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती होत होती. तो वारंवार अनभिज्ञता दर्शवित असल्याने त्याची 'कानशेकणीही' झाली. अखेर सैफ हल्ला प्रकरणातील खरा गुन्हेगार पकडला गेला अन् पोलिसांसकट आकाशनेही सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या आधारेच आम्ही त्याला ताब्यात घेतले होते, असे आरपीएफ दुर्गचे पोलीस निरीक्षक एस. के. सिन्हा यांनी 'लोकमत'ला सांगितले.

टॅग्स :Saif Ali Khanसैफ अली खान Crime Newsगुन्हेगारी